शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खाणीतील स्फाेटांमुळे घर काेसळले, बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 10:43 IST

कांद्रीच्या हरीहरनगर येथील घटना : अधिक क्षमतेच्या स्फाेटांमुळे घरांना तडे

कन्हान (नागपूर) : वेकाेलीच्या काेळसा खाणीत करण्यात आलेल्या अधिक क्षमतेच्या स्फाेटामुळे कांद्री, कन्हान (ता. पारशिवनी) शहरातील हरीहरनगर भागात असलेल्या घरांना हादरे बसले आणि काैलारू घर काेसळले. या घराच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वडील व पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना साेमवारी (दि. २८) दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास घडली.

कमलेश गजानन कोठेकर (३२) व यादवी कमलेश कोठेकर (५, रा. हरीहरनगर, कांद्री, कन्हान) अशी मृतांची नावे आहेत. कमलेशने यादवीला दुपारी शाळेतून घरी आणले. यादवी ही कन्हान शहरातील धर्मराज शाळेतील केजी-टूची विद्यार्थिनी हाेती. जेवण केल्यानंतर दाेघेही काैलारू घरात गेले. तिथे कमलेश आराम करीत हाेता, तर यादवी घरात खेळत हाेती. काही वेळात संपूर्ण घर काेसळले आणि घराच्या ढिगाऱ्याखाली दाेघेही दबले गेले. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी कमलेश व यादवीला जखमी अवस्थेत बाहेर काढले व कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती दाेघांनाही मृत घाेषित केले. तहसीलदार दुसावार, ठाणेदार सार्थक नेहेते, सहायक पोलिस निरीक्षक पराग फुलझेले, चेतन चव्हाण, मंडळ अधिकारी गुडे, माजी सरपंच बलवंत पडोळे, बबलू बर्वे, योगेश वाडीभस्मे, शरद वाटकर, तलाठी शिरसागर, भांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

दुकान बंद असल्याने विश्रांती

कमलेश काेठेकर यांचे कांद्री येथे सलून आहे. या दुकानाच्या भरवशावर ताे कुटुंबीयांची उपजीविका करायचा. साेमवारी दुकान बंद ठेवले जात असल्याने ताे दुपारी घरी विश्रांती करीत हाेता. विशेष म्हणजे, त्याचे स्लॅबचे घर असून, शेजारी त्याच्याच मालकीचे मातीच्या बांधकामाचे काैलारू घर हाेते. त्या घरात विश्रांती करणे दाेघांच्या जीवावर बेतले. कमलेश घरातील कर्ता पुरुष हाेता.

काेळसा वाहतूक बंद पाडली

संतप्त नागरिकांनी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार डी. एम. रेड्डी, रश्मी बर्वे, गज्जू यादव यांच्या नेतृत्त्वात वेकोली सब एरिया मॅनेजर दीक्षित यांची भेट घेत त्यांना घेराव घातला. कमलेशचे घर खाणीतील स्फाेटामुळे काेसळले नाही, असा दावा दीक्षित यांनी केला. त्यामुळे घर नेमके कशामुळे काेसळले, हे कळायला मार्ग नाही. मुळात खाणीतील स्फाेटांच्या हादऱ्यांमुळे या भागातील प्रत्येक घराच्या भिंतींना तडे गेल्याचे स्पष्ट दिसून येते. यावेळी नागरिकांनी वेकाेलीची काेळसा वाहतूक बंद केली हाेती.

टॅग्स :AccidentअपघातBlastस्फोटnagpurनागपूरDeathमृत्यू