शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

By सुनील चरपे | Updated: December 2, 2022 12:59 IST

कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा

नागपूर : थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याचा निवाडा राज्य अन्न आयाेगाने २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी दिला. राज्य माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. कृषिपंपांना राेज आठ तास वीजपुरवठा केला जाताे. भारनियमनामुळे आठवड्यातील केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेत असून, अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लाेकसंघर्ष माेर्चा जळगाव, भारतीय किसान संघ व शरद जाेशी विचार मंच शेतकरी संघटना यांनी राज्य अन्न आयाेगाकडे तक्रार केली हाेती. आयाेगाने यावर २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी निवाडा दिला. शेतमालाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सिंचन आणि सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे.

थकीत बिलांच्या वसुलीसाठी त्या भागातील ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद करणे, शेतातील वीजपुरवठा खंडित करणे, या बाबी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चे कलम १६ व ३१ चा भंग करणाऱ्या आहेत. राज्यातील अन्न सुरक्षा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३, कलम १६ (६) (ग) नुसार या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देत असल्याचे आयाेगाने निर्णयात नमूद केले आहे.

राज्यात सध्या राेज १६ तासांचे भारनियमन केले जात असल्याने केवळ आठ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात आहे. आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्रीला थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत असताे. त्यामुळे केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेते. उर्वरित तीन दिवस रात्री ओलित करण्यासाठी शेतात जाणे धाेकादायक ठरत आहे. वाढत्या भारनियमन आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अन्न सुरक्षा धाेक्यात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

भारनियमनाची अखंडित २४ वर्षे

राज्यात सन १९९८ पासून भारनियमन केले जात आहे. वर्षागणिक भारनियमनाच्या काळ व वेळेत बदल करण्यात आले. यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याऐवजी नागरिकांना भारनियमनाची झळ बसू नये म्हणून ग्रामीण भागात सिंगल फेज आणि थ्री फेजची स्वतंत्र विद्युत वाहिनी व ट्रान्सफाॅर्मरची व्यवस्था करण्यात आली.

शेतकऱ्यांचा मृत्यू

रात्रीच्या वेळी शेतात ओलित करण्यासाठी गेले वैजनाथ आबाजी आघाव (६०, रा. वाई, ता. सेलू, जिल्हा परभणी) यांचा साेमवारी (दि. २१ नाेव्हेंबर) शेतात आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. महावितरण कंपनी वीजदुरुस्तीची कामे वेळेवर करीत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ती कामे शेतकऱ्यांनाच करावी लागतात. ट्रान्सफाॅर्मर फ्यूज टाकताना शाॅक लागल्याने प्रवीण शालिग्राम परघरमाेर (३२, रा. देऊळगाव, जि. बुलढाणा) या तरुण शेतकऱ्याचा साेमवारी (दि. २८) सकाळी मृत्यू झाला.

राज्यातील पीक लागवड क्षेत्र

  • पेरणी क्षेत्र - १७४.८ लाख हेक्टर
  • रब्बी पिकांचे क्षेत्र - ७६.३६ लाख हेक्टर
  • फळबागांचे क्षेत्र - १३.५ लाख हेक्टर
  • उसाचे लागवड क्षेत्र - ८ लाख हेक्टर

राज्यातील शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • ग्राहक - ४४,६३,७५४
  • एकूण थकबाकी - ४५,८४२.६५ काेटी रु.
  • सुधारित थकबाकी - ३०,३३६.८७ काेटी रु.
  • चालू देयके - १४,४२८.४४ काेटी रु.
टॅग्स :Power ShutdownभारनियमनagricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीज