शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

By सुनील चरपे | Updated: December 2, 2022 12:59 IST

कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा

नागपूर : थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याचा निवाडा राज्य अन्न आयाेगाने २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी दिला. राज्य माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. कृषिपंपांना राेज आठ तास वीजपुरवठा केला जाताे. भारनियमनामुळे आठवड्यातील केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेत असून, अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लाेकसंघर्ष माेर्चा जळगाव, भारतीय किसान संघ व शरद जाेशी विचार मंच शेतकरी संघटना यांनी राज्य अन्न आयाेगाकडे तक्रार केली हाेती. आयाेगाने यावर २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी निवाडा दिला. शेतमालाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सिंचन आणि सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे.

थकीत बिलांच्या वसुलीसाठी त्या भागातील ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद करणे, शेतातील वीजपुरवठा खंडित करणे, या बाबी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चे कलम १६ व ३१ चा भंग करणाऱ्या आहेत. राज्यातील अन्न सुरक्षा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३, कलम १६ (६) (ग) नुसार या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देत असल्याचे आयाेगाने निर्णयात नमूद केले आहे.

राज्यात सध्या राेज १६ तासांचे भारनियमन केले जात असल्याने केवळ आठ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात आहे. आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्रीला थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत असताे. त्यामुळे केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेते. उर्वरित तीन दिवस रात्री ओलित करण्यासाठी शेतात जाणे धाेकादायक ठरत आहे. वाढत्या भारनियमन आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अन्न सुरक्षा धाेक्यात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

भारनियमनाची अखंडित २४ वर्षे

राज्यात सन १९९८ पासून भारनियमन केले जात आहे. वर्षागणिक भारनियमनाच्या काळ व वेळेत बदल करण्यात आले. यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याऐवजी नागरिकांना भारनियमनाची झळ बसू नये म्हणून ग्रामीण भागात सिंगल फेज आणि थ्री फेजची स्वतंत्र विद्युत वाहिनी व ट्रान्सफाॅर्मरची व्यवस्था करण्यात आली.

शेतकऱ्यांचा मृत्यू

रात्रीच्या वेळी शेतात ओलित करण्यासाठी गेले वैजनाथ आबाजी आघाव (६०, रा. वाई, ता. सेलू, जिल्हा परभणी) यांचा साेमवारी (दि. २१ नाेव्हेंबर) शेतात आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. महावितरण कंपनी वीजदुरुस्तीची कामे वेळेवर करीत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ती कामे शेतकऱ्यांनाच करावी लागतात. ट्रान्सफाॅर्मर फ्यूज टाकताना शाॅक लागल्याने प्रवीण शालिग्राम परघरमाेर (३२, रा. देऊळगाव, जि. बुलढाणा) या तरुण शेतकऱ्याचा साेमवारी (दि. २८) सकाळी मृत्यू झाला.

राज्यातील पीक लागवड क्षेत्र

  • पेरणी क्षेत्र - १७४.८ लाख हेक्टर
  • रब्बी पिकांचे क्षेत्र - ७६.३६ लाख हेक्टर
  • फळबागांचे क्षेत्र - १३.५ लाख हेक्टर
  • उसाचे लागवड क्षेत्र - ८ लाख हेक्टर

राज्यातील शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • ग्राहक - ४४,६३,७५४
  • एकूण थकबाकी - ४५,८४२.६५ काेटी रु.
  • सुधारित थकबाकी - ३०,३३६.८७ काेटी रु.
  • चालू देयके - १४,४२८.४४ काेटी रु.
टॅग्स :Power ShutdownभारनियमनagricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीज