शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

By सुनील चरपे | Updated: December 2, 2022 12:59 IST

कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा

नागपूर : थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याचा निवाडा राज्य अन्न आयाेगाने २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी दिला. राज्य माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. कृषिपंपांना राेज आठ तास वीजपुरवठा केला जाताे. भारनियमनामुळे आठवड्यातील केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेत असून, अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लाेकसंघर्ष माेर्चा जळगाव, भारतीय किसान संघ व शरद जाेशी विचार मंच शेतकरी संघटना यांनी राज्य अन्न आयाेगाकडे तक्रार केली हाेती. आयाेगाने यावर २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी निवाडा दिला. शेतमालाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सिंचन आणि सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे.

थकीत बिलांच्या वसुलीसाठी त्या भागातील ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद करणे, शेतातील वीजपुरवठा खंडित करणे, या बाबी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चे कलम १६ व ३१ चा भंग करणाऱ्या आहेत. राज्यातील अन्न सुरक्षा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३, कलम १६ (६) (ग) नुसार या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देत असल्याचे आयाेगाने निर्णयात नमूद केले आहे.

राज्यात सध्या राेज १६ तासांचे भारनियमन केले जात असल्याने केवळ आठ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात आहे. आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्रीला थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत असताे. त्यामुळे केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेते. उर्वरित तीन दिवस रात्री ओलित करण्यासाठी शेतात जाणे धाेकादायक ठरत आहे. वाढत्या भारनियमन आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अन्न सुरक्षा धाेक्यात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

भारनियमनाची अखंडित २४ वर्षे

राज्यात सन १९९८ पासून भारनियमन केले जात आहे. वर्षागणिक भारनियमनाच्या काळ व वेळेत बदल करण्यात आले. यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याऐवजी नागरिकांना भारनियमनाची झळ बसू नये म्हणून ग्रामीण भागात सिंगल फेज आणि थ्री फेजची स्वतंत्र विद्युत वाहिनी व ट्रान्सफाॅर्मरची व्यवस्था करण्यात आली.

शेतकऱ्यांचा मृत्यू

रात्रीच्या वेळी शेतात ओलित करण्यासाठी गेले वैजनाथ आबाजी आघाव (६०, रा. वाई, ता. सेलू, जिल्हा परभणी) यांचा साेमवारी (दि. २१ नाेव्हेंबर) शेतात आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. महावितरण कंपनी वीजदुरुस्तीची कामे वेळेवर करीत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ती कामे शेतकऱ्यांनाच करावी लागतात. ट्रान्सफाॅर्मर फ्यूज टाकताना शाॅक लागल्याने प्रवीण शालिग्राम परघरमाेर (३२, रा. देऊळगाव, जि. बुलढाणा) या तरुण शेतकऱ्याचा साेमवारी (दि. २८) सकाळी मृत्यू झाला.

राज्यातील पीक लागवड क्षेत्र

  • पेरणी क्षेत्र - १७४.८ लाख हेक्टर
  • रब्बी पिकांचे क्षेत्र - ७६.३६ लाख हेक्टर
  • फळबागांचे क्षेत्र - १३.५ लाख हेक्टर
  • उसाचे लागवड क्षेत्र - ८ लाख हेक्टर

राज्यातील शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • ग्राहक - ४४,६३,७५४
  • एकूण थकबाकी - ४५,८४२.६५ काेटी रु.
  • सुधारित थकबाकी - ३०,३३६.८७ काेटी रु.
  • चालू देयके - १४,४२८.४४ काेटी रु.
टॅग्स :Power ShutdownभारनियमनagricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीज