शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

By सुनील चरपे | Updated: December 2, 2022 12:59 IST

कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा

नागपूर : थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याचा निवाडा राज्य अन्न आयाेगाने २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी दिला. राज्य माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. कृषिपंपांना राेज आठ तास वीजपुरवठा केला जाताे. भारनियमनामुळे आठवड्यातील केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेत असून, अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लाेकसंघर्ष माेर्चा जळगाव, भारतीय किसान संघ व शरद जाेशी विचार मंच शेतकरी संघटना यांनी राज्य अन्न आयाेगाकडे तक्रार केली हाेती. आयाेगाने यावर २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी निवाडा दिला. शेतमालाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सिंचन आणि सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे.

थकीत बिलांच्या वसुलीसाठी त्या भागातील ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद करणे, शेतातील वीजपुरवठा खंडित करणे, या बाबी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चे कलम १६ व ३१ चा भंग करणाऱ्या आहेत. राज्यातील अन्न सुरक्षा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३, कलम १६ (६) (ग) नुसार या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देत असल्याचे आयाेगाने निर्णयात नमूद केले आहे.

राज्यात सध्या राेज १६ तासांचे भारनियमन केले जात असल्याने केवळ आठ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात आहे. आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्रीला थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत असताे. त्यामुळे केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेते. उर्वरित तीन दिवस रात्री ओलित करण्यासाठी शेतात जाणे धाेकादायक ठरत आहे. वाढत्या भारनियमन आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अन्न सुरक्षा धाेक्यात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

भारनियमनाची अखंडित २४ वर्षे

राज्यात सन १९९८ पासून भारनियमन केले जात आहे. वर्षागणिक भारनियमनाच्या काळ व वेळेत बदल करण्यात आले. यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याऐवजी नागरिकांना भारनियमनाची झळ बसू नये म्हणून ग्रामीण भागात सिंगल फेज आणि थ्री फेजची स्वतंत्र विद्युत वाहिनी व ट्रान्सफाॅर्मरची व्यवस्था करण्यात आली.

शेतकऱ्यांचा मृत्यू

रात्रीच्या वेळी शेतात ओलित करण्यासाठी गेले वैजनाथ आबाजी आघाव (६०, रा. वाई, ता. सेलू, जिल्हा परभणी) यांचा साेमवारी (दि. २१ नाेव्हेंबर) शेतात आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. महावितरण कंपनी वीजदुरुस्तीची कामे वेळेवर करीत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ती कामे शेतकऱ्यांनाच करावी लागतात. ट्रान्सफाॅर्मर फ्यूज टाकताना शाॅक लागल्याने प्रवीण शालिग्राम परघरमाेर (३२, रा. देऊळगाव, जि. बुलढाणा) या तरुण शेतकऱ्याचा साेमवारी (दि. २८) सकाळी मृत्यू झाला.

राज्यातील पीक लागवड क्षेत्र

  • पेरणी क्षेत्र - १७४.८ लाख हेक्टर
  • रब्बी पिकांचे क्षेत्र - ७६.३६ लाख हेक्टर
  • फळबागांचे क्षेत्र - १३.५ लाख हेक्टर
  • उसाचे लागवड क्षेत्र - ८ लाख हेक्टर

राज्यातील शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • ग्राहक - ४४,६३,७५४
  • एकूण थकबाकी - ४५,८४२.६५ काेटी रु.
  • सुधारित थकबाकी - ३०,३३६.८७ काेटी रु.
  • चालू देयके - १४,४२८.४४ काेटी रु.
टॅग्स :Power ShutdownभारनियमनagricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीज