शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

गोंड राजघराण्याच्या ऐतिहासिक खुणा होत आहेत नामशेष ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:08 IST

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘ज्यांना आपल्या इतिहासाचे स्मरण नसते, त्यांना नंतर इतिहासही विसरतो’, ही म्हण ...

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘ज्यांना आपल्या इतिहासाचे स्मरण नसते, त्यांना नंतर इतिहासही विसरतो’, ही म्हण वास्तववादी आहे. गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा हा नागपूरचा लखलखता इतिहास आहे आणि त्याच इतिहासाच्या खाणाखुणा नागपूरकर विसरत चालले आहेत. याच राजाने १७०२ मध्ये सत्तासंघर्षाच्या सावटात बारा गावांचे मिळून नागपूर आकाराला आणले आणि गोंड राज्याची राजधानी म्हणून नेमले. मात्र, त्याच राजघराण्याच्या स्मृती नामशेष झाल्या आहेत.

---------------

पॉइंटर्स

गोंड राजांच्या राज्यकारभाराचा कालखंड

राजा जाटबा - १५९० ते १६२० (देवगडचे संस्थापक)

राजा कोकशाह - (कालावधी उपलब्ध नाही)

राजा बख्त बुलंद महिपत शहा - १६८६ ते १७०९ (१७०२ मध्ये नागपूर वसवले.)

राजा चांद सुल्तान - १७०९ ते १७३५ (जुम्मा तलाव अर्थात शुक्रवारी तलाव, जुम्मा दरवाजा अर्थात गांधी गेटची निर्मिती.)

राजा वली शाह - १७३५ ते १७३८

राजा बुरहान शाह - १७४३ ते १७९६

राजा बहराम शाह - १७९६ ते १८२१

राजा रहमान शाह - १८२१ ते १८५२

राजा सुलेमान शाह - १८५२ ते १८८५

राजा आजम शाह - १८८५ ते १९५५

राजा बख्त बुलंद शाह द्वितीय - १९५५ ते १९९३

राजा वीरेंद्र शाह - १९९३ पासून

--------------

सत्तासंघर्ष आणि नागपूरची स्थापना

राजा जाटबा यांच्यानंतर कोकशहा गादीवर आले. कोकशहानंतर महिपत शहा गादीवर बसले. मात्र, लहान भाऊ दीनदार शहाने महिपतशहा यांना पराभूत करून देवगडची गादी हडपली. दरम्यान, मराठे व औरंगजेबात प्रचंड संघर्ष सुरू होता. औरंगजेब देवगडकडून चौथ वसुली करत असे. त्यामुळे आंतरिक संघर्षात महिपत शहाने औरंगजेबाची मदत मागितली आणि त्याच्याकडून बख्त बुलंद हा खिताब घेऊन देवगडची गादी आपल्या भावाकडून हस्तगत केली. दरम्यान, साताऱ्याचे छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाच्या पवनार किल्ल्यावर हल्ला चढवून तो लुटला. यासाठी औरंगजेबाने महिपत शहा यांना जबाबदार ठरवले आणि देवगडवर हल्ला केला. त्यामुळे राज्य संरक्षणार्थ महिपत शहा यांनी आपल्याच प्रांतातील नागपूर येथे तळ ठोकला. सीताबर्डी, वाठोडा, गाडगा, हरिपूर, वानडे, भानखेडा आदी बारा गावे मिळून १७०२ साली नागपूर वसवले आणि पुढे नागपूर हीच गोंड राज्याची राजधानी झाली.

----------------

जन्म आणि मृत्यू

नागपूरचे संस्थापक असलेले गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा यांचा जन्म व मृत्यूविषयी निश्चित अशी आकडेवारी सापडत नाही. मात्र, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष व नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यांच्या समितीने संशोधनातून ३० जुलै १६६८ ही त्यांची जन्मतारीख शोधून काढली. त्यांचा मृत्यू १७०९ च्या आसपास झाल्याचे सांगितले जाते. मात्र, तारीख अजून निश्चित झालेली नाही.

------------------

पॉइंटर्स

* जगनाडे चौक, नंदनवन परिसराला आजमशहा ले-आऊट म्हणून ओळखले जाते. ते गोंड राजवंशातीलच होते.

* मेडिकल चौक येथील प्रसिद्ध राजाबाक्षा हनुमान मंदिराची स्थापना बख्त बुलंद महिपत शहा यांनीच केली. बख्त बुलंदचा अपभ्रंश होऊन पुढे राजाबाक्षा हेच नाव प्रचलित झाले.

* महाल हे नाव गोंड राजाच्या महालामुळेच पडले. कल्याणेश्वर मंदिराच्या पुढे झेंडा चौकाकडे जाताना उजव्या हातावर किल्ला वाॅर्डात पक्वासा रुग्णालयाच्या शेजारी आजही हा महाल उभा आहे.

* सध्या या महालात राजमाता राजेश्री देवी शहा, त्यांचे पुत्र राजे वीरेंद्र शहा, सून शुभदा शहा, नातवंड दिग्विजय व वात्सल्य शहा यांचे वास्तव्य आहे.

* या महालातील तीन बुरुज औरंगजेबाच्या युद्धाच्यावेळी खचले. एक बुरुज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. तेथे तत्कालीन युद्धात वापरली जाणारी तोफ आजही उभी आहे. मात्र, झाडांनी वेढल्यामुळे ती दिसत नाही.

* २००२ मध्ये नागपूरच्या स्थापनेला ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिव्हिल लाईन्स येथे विधानभवनापुढे गोंडराजे बख्त बुलंद शहा यांचा सिंहासनावर आरूढ असा पुतळा तत्कालीन महापौर माया इवनाते यांच्या प्रयत्नांनी उभारण्याच्या प्रस्तावाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली. आज तेथे हा पुतळा उभा आहे.

---------------

गोंडराज्याचा विसर

नागपूरच्या स्थापनेचे श्रेय आपले पूर्वज गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा यांना आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले. आता कुठे गोंडराज्याचा इतिहास पुढे येत आहे. अनेक स्थळे दुर्लक्षित आहेत तर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून, स्मारक म्हणून म्हणा वा ऐतिहासिक वारसा म्हणून ते विकसित होणे गरजेचे आहे.

- गोंडराजे वीरेंद्र शहा