शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:07 IST

रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला.

ठळक मुद्देरेल्वे अपघातात प्रवाशाचे दोन्ही पाय कटले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. प्रवासी प्रमाणाबाहेर दारू पिला होता याचे पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.दारू प्यालेली व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नसल्याचे गृहित धरले जाऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्ती किती दारू पिली होती हे सिद्ध व्हायला पाहिजे. दारूचे प्रमाण निश्चित करण्याकरिता रासायनिक तपासणी करणे आवश्यक आहे. सामान्यत: कमी दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकते. परंतु, अधिक प्रमाणात दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नाही. परिणामी, व्यक्ती प्रमाणाबाहेर दारू प्यायली होती का याचा निष्कर्ष निघणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणातील अपघातग्रस्त प्रवाशाची अशी तपासणी करण्यात आल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत असेही उच्च न्यायालयाने सांगितले.अंकुश रामा अमझारे (३७) असे अपघातग्रस्त प्रवाशाचे नाव असून ते घोराड, ता. सेलू, जि. वर्धा येथील रहिवासी आहेत. १७ मे २०१४ रोजी ते वरोरा येथून वर्धेला जात होते. ते दाराजवळ बसले होते. भूगाव रेल्वे स्थानक येथे अचानक धक्का लागल्यामुळे ते खाली कोसळले. त्यांचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापल्या गेले. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने अमझारे यांच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही व ते दारू पिऊन रेल्वेत बसले होते या दोन कारणांवरून भरपाईचा अर्ज फेटाळून लावला. त्या निर्णयाविरुद्ध अमझारे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी ते अपील मंजूर केले व वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, अमझारे यांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असे निर्देश मध्य रेल्वेला दिले.तिकिटाचा मुद्दाही खोडलाअपघातानंतर प्रवाशाकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही म्हणून भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. या प्रकरणातील प्रवाशाने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. या परिस्थितीत त्याचे रेल्वे तिकीट हरवल्या जाऊ शकते. अपघातानंतर तो बेशुद्ध झाला होता असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वे