शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:07 IST

रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला.

ठळक मुद्देरेल्वे अपघातात प्रवाशाचे दोन्ही पाय कटले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. प्रवासी प्रमाणाबाहेर दारू पिला होता याचे पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.दारू प्यालेली व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नसल्याचे गृहित धरले जाऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्ती किती दारू पिली होती हे सिद्ध व्हायला पाहिजे. दारूचे प्रमाण निश्चित करण्याकरिता रासायनिक तपासणी करणे आवश्यक आहे. सामान्यत: कमी दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकते. परंतु, अधिक प्रमाणात दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नाही. परिणामी, व्यक्ती प्रमाणाबाहेर दारू प्यायली होती का याचा निष्कर्ष निघणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणातील अपघातग्रस्त प्रवाशाची अशी तपासणी करण्यात आल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत असेही उच्च न्यायालयाने सांगितले.अंकुश रामा अमझारे (३७) असे अपघातग्रस्त प्रवाशाचे नाव असून ते घोराड, ता. सेलू, जि. वर्धा येथील रहिवासी आहेत. १७ मे २०१४ रोजी ते वरोरा येथून वर्धेला जात होते. ते दाराजवळ बसले होते. भूगाव रेल्वे स्थानक येथे अचानक धक्का लागल्यामुळे ते खाली कोसळले. त्यांचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापल्या गेले. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने अमझारे यांच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही व ते दारू पिऊन रेल्वेत बसले होते या दोन कारणांवरून भरपाईचा अर्ज फेटाळून लावला. त्या निर्णयाविरुद्ध अमझारे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी ते अपील मंजूर केले व वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, अमझारे यांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असे निर्देश मध्य रेल्वेला दिले.तिकिटाचा मुद्दाही खोडलाअपघातानंतर प्रवाशाकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही म्हणून भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. या प्रकरणातील प्रवाशाने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. या परिस्थितीत त्याचे रेल्वे तिकीट हरवल्या जाऊ शकते. अपघातानंतर तो बेशुद्ध झाला होता असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वे