शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हायटेक वंदे भारत आता नागपूर ते हैदराबाद मार्गावर, मंत्री, खासदार यांच्या पाठपुराव्याला यश

By नरेश डोंगरे | Updated: May 26, 2023 14:33 IST

लवकरच मिळणार ग्रीन सिग्नल

नागपूर : देशातील हायटेक ट्रेन मानली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नागपूर - हैदराबादरेल्वे मार्गावर धावणार आहे. सत्तापक्षातील मंत्री, खासदार यांनी या संबंधाने पाठपुरावा केला होता. त्याला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

५१८ किलोमिटर अंतराच्या हैदराबाद शहरात जाण्यासाठी नागपूरहून सध्या १० ते ११ तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास सुमारे पाच तासांचा वेळ वाचेल.

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या नागपूर - हैदराबाद रेल्वेमार्गावर जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडी हाऊसफुल्ल असते. दक्षिण भारतातील प्रवाशांचा या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा असतो. त्यामुळे नागपूर मार्गे बऱ्याचशा रेल्वेगाड्या या लोहमार्गावर धावत असतात. मात्र, लांब पल्ल्याच्या या प्रवासाला प्रदीर्घ वेळ लागत असल्याने अनेक शहरातील प्रवासी रेल्वेऐवजी विमानाने प्रवास करने पसंत करतात. या पार्श्वभूमीवर, देशाचे मध्यस्थळ असलेल्या नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी वंदे भारत सारखी सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण रेल्वेगाडी सुरू व्हावी, अशी हजारो प्रवाशांची ईच्छा होती.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कागदोपत्री पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून लवकरच नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून या संबंधाने अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अनेक जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ

ही गाडी सुरू झाल्यास नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा विशेष फायदा होईल. कमी वेळेत तेलंगणाचा प्रवास करने सुविधाजनक होईल. सोबतच जबलपूर, रायपूरसाठीही रेल्वेची कनेक्टीव्हिटी मिळेल. सूत्रांच्या मते, नागपूर- हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे ठरले असले तरी ती कधीपासून धावणार त्याचा मुहूर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे समजते.

सेवाग्रामलाही मिळणार थांबा

तूर्त ही गाडी नागपूरहून बल्लारपूर, शिरपूर, रामगुंडम, काझीपेठ आदी स्थानकावर थांबे घेऊन हैदराबादला पोहचेल. मात्र, या स्थानकांसोबतच वंदे भारतचा थांबा सेवाग्राम आणि हिंगणघाट रेल्वेस्थानकावरही दिला जावा, अशी मागणी खास. तडस यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे.  सध्या नागपूर ते जबलपूर या मार्गावर वंदे भारत धावते. प्रस्तावित नागपूर हैदराबाद सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही दुसरी वंदे भारत ठरेल.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूरhyderabad-pcहैदराबादrailwayरेल्वे