शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नागपूर विद्यापीठात चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:55 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘वॉच’ नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञान

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक पदव्युत्तर विभाग तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. नियमांना धाब्यावर बसवून पारंपरिक हजेरीपुस्तकात विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील दाखविण्यात येते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘हायटेक’ नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. विदर्भासोबतच राज्यातील विद्यापीठामधील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा विभागातर्फे करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फारच कमी असते. आश्चर्याची बाब म्हणजे काही पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित असतानादेखील हजेरीपुस्तकावर त्यांना हजर दाखविण्यात येते. वर्गांमध्ये उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असतो.वरील बाबी लक्षात घेऊन नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने ‘हायटेक’ हजेरीचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व या वर्षीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाने ‘फेस-रिकग्निशन’ मशीन लावली आहे. विद्यार्थ्यांचे चेहरे या ‘मशीन’मध्ये नोंदविण्यात आले आहे. विभागात आल्यानंतर विद्यार्थी तसेच शिक्षकांना या मशीनसमोर उभे राहावे लागणार आहे. ‘मशीन’मध्ये चेहऱ्यांची नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्याची हजेरी लागेल व त्यानंतरच विभागाचा दरवाजा उघडेल, अशी प्रणाली येथे अमलात येणार आहे.

देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावाआमचा विभाग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण असावा, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. विद्यापीठाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट क्लासरुम्स’, त्यांचे काम दर्शविणारी ‘एलईडी स्क्रीन’ अशा सुविधा आम्ही विकसित केल्या. मात्र विद्यार्थी विभागात उपस्थित राहणे सर्वात जास्त आवश्यक आहे. त्यांना शिस्त लागावी, तसेच उपस्थिती वाढावी आणि आमच्याकडेदेखील अधिकृत ‘डाटा’ उपलब्ध राहावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. पाश्चिमात्य देशांमधील विद्यापीठांमध्ये अशी प्रणाली दिसून येते. आपल्या देशातील विद्यापीठात अशी प्रणाली कुठेही नाही. देशातील विद्यापीठातील हा पहिला प्रयोग असल्याचा दावा विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी केला.

सुरक्षेसाठीदेखील महत्त्वाचे पाऊलविभागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही’देखील लागले आहेत. मात्र ‘फेस-रिकग्निशन’ मशीन ही विभागाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आली आहे. मशीनमध्ये नोंद झाल्यानंतरच दरवाजा उघडणार आहे. अभ्यागत व्यक्ती आल्यास विभागाच्या आतून विशिष्ट ‘कार्ड’द्वारे ‘पंचिंग’ करावे लागेल. तेव्हाच त्या व्यक्तीला आत प्रवेश घेता येईल. सोबतच त्याचा चेहरादेखील मशीनमध्ये नोंदविल्या जाईल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे महत्त्वाचे पाऊल मानण्यात येत आहे. विविध ‘कॉर्पोरेट’ कार्यालये, अतिसंवेदनशील आस्थापनांमध्ये अशाप्रकारचे तंत्रज्ञान लागले आहे. मात्र विद्यापीठातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ