शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

नागपूर विद्यापीठात चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:55 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘वॉच’ नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञान

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक पदव्युत्तर विभाग तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. नियमांना धाब्यावर बसवून पारंपरिक हजेरीपुस्तकात विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील दाखविण्यात येते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘हायटेक’ नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. विदर्भासोबतच राज्यातील विद्यापीठामधील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा विभागातर्फे करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फारच कमी असते. आश्चर्याची बाब म्हणजे काही पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित असतानादेखील हजेरीपुस्तकावर त्यांना हजर दाखविण्यात येते. वर्गांमध्ये उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असतो.वरील बाबी लक्षात घेऊन नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने ‘हायटेक’ हजेरीचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व या वर्षीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाने ‘फेस-रिकग्निशन’ मशीन लावली आहे. विद्यार्थ्यांचे चेहरे या ‘मशीन’मध्ये नोंदविण्यात आले आहे. विभागात आल्यानंतर विद्यार्थी तसेच शिक्षकांना या मशीनसमोर उभे राहावे लागणार आहे. ‘मशीन’मध्ये चेहऱ्यांची नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्याची हजेरी लागेल व त्यानंतरच विभागाचा दरवाजा उघडेल, अशी प्रणाली येथे अमलात येणार आहे.

देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावाआमचा विभाग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण असावा, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. विद्यापीठाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट क्लासरुम्स’, त्यांचे काम दर्शविणारी ‘एलईडी स्क्रीन’ अशा सुविधा आम्ही विकसित केल्या. मात्र विद्यार्थी विभागात उपस्थित राहणे सर्वात जास्त आवश्यक आहे. त्यांना शिस्त लागावी, तसेच उपस्थिती वाढावी आणि आमच्याकडेदेखील अधिकृत ‘डाटा’ उपलब्ध राहावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. पाश्चिमात्य देशांमधील विद्यापीठांमध्ये अशी प्रणाली दिसून येते. आपल्या देशातील विद्यापीठात अशी प्रणाली कुठेही नाही. देशातील विद्यापीठातील हा पहिला प्रयोग असल्याचा दावा विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी केला.

सुरक्षेसाठीदेखील महत्त्वाचे पाऊलविभागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही’देखील लागले आहेत. मात्र ‘फेस-रिकग्निशन’ मशीन ही विभागाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आली आहे. मशीनमध्ये नोंद झाल्यानंतरच दरवाजा उघडणार आहे. अभ्यागत व्यक्ती आल्यास विभागाच्या आतून विशिष्ट ‘कार्ड’द्वारे ‘पंचिंग’ करावे लागेल. तेव्हाच त्या व्यक्तीला आत प्रवेश घेता येईल. सोबतच त्याचा चेहरादेखील मशीनमध्ये नोंदविल्या जाईल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे महत्त्वाचे पाऊल मानण्यात येत आहे. विविध ‘कॉर्पोरेट’ कार्यालये, अतिसंवेदनशील आस्थापनांमध्ये अशाप्रकारचे तंत्रज्ञान लागले आहे. मात्र विद्यापीठातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ