शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 07:00 IST

Nagpur News लेझर शस्त्रक्रिया झालेल्या २५० रुग्णांचा अभ्यास नागपुरातील एका पाइल्स सर्जनने केला असता ९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून आला नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेनंतर मूळव्याधीच्या रुग्णांत ३८ टक्क्यांनी वाढ

नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेत जवळपास १५ टक्के तर, दुसऱ्या लाटेत ३५ टक्क्यांनी मूळव्याधीच्या रुग्णांत वाढ झाली. यातील लेझर शस्त्रक्रिया झालेल्या २५० रुग्णांचा अभ्यास नागपुरातील एका पाइल्स सर्जनने केला असता ९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून आला नसल्याचे दिसून आले. हा शोधनिबंध नुकताच ‘इराणी जर्नल ऑफ कोलोरेक्टल रिसर्च’मध्ये प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये भारतातून मूळव्याधीवर प्रकाशित झालेले हे पहिलेच प्रकाशन असल्याचे बोलले जात आहे.

असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया (एएसआय) नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष व कोलोरेक्टल सर्जन डॉ. नीलेश जुननकर यांनी हा शोधनिबंध सादर केला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मूळव्याधीवर लेझर उपचार प्रणाली नवीन नाही. परंतु यात ‘लेझर हेमोरायडोप्लास्टी’ ही नवीन प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरत असल्याचे अभ्यासातून दिसून आले.

-अभ्यासात ११६ महिला व १३४ पुरुषांचा समावेश

डॉ. जुननकर म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विविध कारणांमुळे मूळव्याधीच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यातील १६ ते ८५ वयोगटातील ११६ महिला व १३४ पुरुषांवर अभ्यास केला. त्यांच्यावर ‘लेझर हेमोरायडोप्लास्टी’ उपचार करून एक वर्षाहून अधिक काळ त्याचा पाठपुरावा केला. त्यात १०० टक्के रुग्णांना शौचापूर्वीच्या आणि नंतरच्या वेदनांपासून सुटका झाली. ११.२ टक्के लोकांमध्ये शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव, इन्फेक्शन, फिस्टुला व फिशर यांसारख्या गुंतागुंत दिसून आल्या. तर ०.८ टक्के म्हणजे एका रुग्णाला पुन्हा मूळव्याध दिसून आला.

-काय आहे ‘हेमोरायॉइडल’उपचार पद्धती

डॉ. जुननकर म्हणाले, लेसरद्वारे पाइल्सला होणारा रक्तपुरवठा बंद केला जातो. यामुळे १५ ते २० दिवसांत पाइल्स आकुंचन पावतात. साधारण अर्ध्या तासाच्या या उपचार पद्धतीत कोणत्याही वेदना होत नाहीत.

-बद्धकोष्ठता व मसालेदार पदार्थांमुळे होतो मूळव्याध

मूळव्याधीचे रुग्ण वाढण्यामागे तिखट व मसालेदार पदार्थांचे अतिसेवन हे एक मुख्य कारण आहे. याशिवाय, बद्धकोष्ठता व अनुवांशिकपणा हेही एक कारण ठरते. या आजाराला दूर ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, जेवणाच्या वेळा पाळणे, शतपावली करणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे शौचास जाणे आदी उपायांची मदत होते, असेही डॉ. जुननकर म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य