शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीच्या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता, येलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 06:25 IST

हवामान विभागाकडून सावधगिरीचा इशारा

नागपूर : होळीच्या दिवसात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याबाबतचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भातील जिल्ह्यांत हवामान कोरडे राहिले. नागपुरात गुरुवारी दुपारी उष्णतेच्या ज्वाळा जाणवल्या. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान होते, जे सामान्यपेक्षा जास्त होते. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस ते २४ अंश सेल्सिअसदरम्यान राहिले, जे सामान्यच्या जवळपास होते. 

अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यानंतर चंद्रपूर, ब्रह्मपुरी आदी ठिकाणी तापमान सर्वाधिक होते. पुढील दोन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. सुमारे २ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत विदर्भात २-३ अंश सेल्सिअसची हळूहळू घट होईल.

मात्र, हा दिलासा फार काळ राहणार नाही. उष्ण वाऱ्यांची मालिका सुरू झाली आहे. नागपूरचा उष्मा वाढू लागला आहे. उष्माघात टाळण्यासाठी सावधगिरी हाच उपाय आहे.

अशी घ्या काळजी

कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाणे टाळा

हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे घाला. 

टोपी किंवा छत्रीने डोके झाका. 

तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या. 

ओआरएस, लस्सी, मथ, लिंबूपाणी, ताक घ्या. 

दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत घराबाहेर काम करू नका. 

जनावरांना पाणीपुरवठा असलेल्या शेडमध्ये ठेवा. 

उन्हाळी हंगामात पिके, जनावरे आणि शेतकरी यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात सिंचन, सावली आणि जमिनीतील ओलावा याची खात्री करा. 

तसेच दुपारची कामे आणि जास्त खतांचा वापर टाळा. 

टॅग्स :nagpurनागपूरTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात