दुर्गम भागातील आरोग्य सेवा चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST2021-09-14T04:11:35+5:302021-09-14T04:11:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. जिथे पोहोचल्या तेथील आरोग्यसेवेची दशा ...

दुर्गम भागातील आरोग्य सेवा चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. जिथे पोहोचल्या तेथील आरोग्यसेवेची दशा चिंताजनक असल्याची भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली.
सी.मो. झाडे फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या श्री. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने दिला जाणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार नांदेडच्या आदिवासी बहुल किनवट तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराला उत्तर देताना, ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. शिवाजीराव मोघे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, राजकीय विश्लेषक अशोक वानखडे, सर्वोदयी विचारक ॲड. मा.म. गडकरी, गिरीश गांधी व प्रसिद्ध लेखक लक्ष्मणराव शिरभाते उपस्थित होते.
उपस्थित होते.
दुर्गम भागातील व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्याला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. व्हेंटिलेटरवर असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. ही विसंगती कधी दूर होणार, असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी शासकीय सेवेत आलेले अनुभव, भ्रष्टाचार, सरकारी रुग्णालयात रुग्णांची होणारी परवड आदींवर त्यांनी प्रकाश टाकला.
.............