शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 23:27 IST

Nagpur Crime Story: पोलिसांनी नावाची शहानिशा न करताच न्यायालयासमोर आरोपी म्हणून दाखविले. वकील ॲड.प्रीतम खंडाते व ॲड.संतोष चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर वास्तव मांडले व न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

योगेश पांडे - नागपूर१९८१ सालचे महिला अत्याचाराचे प्रकरण बंद करण्याच्या नादात पोलीस विभागाने चक्क न्यायालयासमोर आरोपीशी नावसाधर्म्य असलेल्या भलत्याच व्यक्तीला उभे केले. न्यायालयाने संबंधित व्यक्तीला १९ दिवस कारागृहात पाठविले. मात्र वास्तव समोर आल्यावर त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र महिला अत्याचार प्रकरणी कारागृहात गेल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली व निर्दोष व्यक्तीच्या कुटुंबाला गावाने वाळीत टाकले. पोलिसांच्या हलगर्जीमुळे निर्दोष व्यक्तीचे आयुष्य काळवंडले असून स्वत:ची इभ्रत परत मिळविण्यासाठी तो धडपड करत आहे.

मणीराम कारु ठाकरे (६२, तोतलाडोह, देवलापार) या व्यक्तीसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. १४ ऑक्टोबर १९८१ रोजी मणीराम काशीराम ठाकरे याच्याविरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला काही दिवसांनी जामीन मिळाला होता व त्यानंतर आरोपी फरार झाला. तो न्यायालयासमोर कधीच उभा झाला नाही. 

तो दावा करत राहिला, पोलिसांनी पडताळणी न करताच केली अटक

२०१० साली जेएमएफसी रामटेकने प्रकरणाला बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र काही कालावधीने प्रकरण परत सुरू झाले. जेएमएफसी रामटेककडून प्रोक्लेमेशन नोटीस जारी करण्यात आली. देवलापार पोलीस ठाण्यातील पथकाने ६ सप्टेंबर २०२४ रोजी मणीराम काशीराम ठाकरे ऐवजी मणीराम करुलाल ठाकरे याला ताब्यात घेतले. त्याने आधार कार्ड व इतर दस्तावेज दाखवून तो मी नव्हेच असा दावा केला. 

पोलिसांनी कुठलीही पडताळणी न करता त्याला न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठविले. त्याचे वकील ॲड.प्रीतम खंडाते व ॲड.संतोष चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर वास्तव मांडले व न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र तोपर्यंत गावात ही बातमी पसरली होती.

गावाने टाकले वाळीत

गावकऱ्यांनी त्याला वाळीत टाकले. त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. गावकरी त्यांना गाव सोडण्यास सांगत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मणीरामच्या वकिलांनी केली आहे. जर पोलीस अधीक्षकांनी नुकसानभरपाई दिली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे ॲड.प्रीतम खंडाते व ॲड.संतोष चव्हाण यांनी सांगितले.

पोलिसांवर कुणाचा दबाव ?

देवलापार पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीवरच या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९८१ साली निर्दोष मणीरामचे वय १९ वर्ष होते तर आरोपी मणीराम ४५ वर्षांचा होता. इतकी साधी बाबदेखील पोलिसांच्या लक्षात येऊ नये ही कोड्यात टाकणारी बाब आहे. सोबतच पोलिसांकडे मूळ आरोपीचे हस्ताक्षर होते. 

निर्दोष मणीरामसोबत हस्ताक्षर काहीही केल्या जुळत नव्हते. १९८१ साली निर्दोष मणीराम बालाघाटमध्ये राहत होता व त्याच्याकडे तसे दस्तावेजदेखील होते. मात्र पोलिसांनी ते तपासण्याचीदेखील तसदी घेतली नाही. प्रकरण लवकरात लवकर बंद करण्याच्या नादात पोलिसांनी एका निर्दोष व्यक्तीच्या आयुष्याशी खेळ केल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय