शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी त्यांनी सोडली आमदारकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:43 IST

मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या गंभीरतेने न घेता केवळ पदासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांची संख्या देशात कमी नाही. लोकांसाठी मोठ्या पदाला ठोकर मारणाऱ्यांचे उदाहरण मिळणे मात्र नगण्यच. अशा नकारात्मक स्थितीत एखादा नेता सामान्यांच्या न्यायासाठी पदावर पाणी सोडत असेल तर? होय, ओरिसा राज्यातील एका आमदाराने मात्र हे उदाहरण पुढे ठेवले आहे. मतदारसंघातील अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आमदारकीलाच लाथ मारली. क्रिष्णाचंद्र सागरीया असे या माजी आमदाराचे नाव.

ठळक मुद्देओरिसाचे आमदार क्रिष्णाचंद्र सागरीयांचे पाऊल : मुलीच्या आत्महत्येची खंत

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या गंभीरतेने न घेता केवळ पदासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांची संख्या देशात कमी नाही. लोकांसाठी मोठ्या पदाला ठोकर मारणाऱ्यांचे उदाहरण मिळणे मात्र नगण्यच. अशा नकारात्मक स्थितीत एखादा नेता सामान्यांच्या न्यायासाठी पदावर पाणी सोडत असेल तर? होय, ओरिसा राज्यातील एका आमदाराने मात्र हे उदाहरण पुढे ठेवले आहे. मतदारसंघातील अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आमदारकीलाच लाथ मारली. क्रिष्णाचंद्र सागरीया असे या माजी आमदाराचे नाव.ओरिसाच्या कोरापूट मतदारसंघाचे ते आमदार होते. मात्र आमदारकी सोडून आता ते रस्त्यावर आंदोलन आणि न्यायालयाच्या माध्यमातून पीडित मुलीचा लढा लढत आहेत. काही कामासाठी नागपूरला आलेल्या सागरीया यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने बातचीत केली. ऑक्टोबर महिन्यात कोरापूट जिल्ह्याच्या कुंदली येथील ९ व्या वर्गातील शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्याला ढवळून काढले होते. १० ऑक्टोबर २०१७ ची ही घटना. कोब्रा बटालियनच्या चार जवानांनी या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेकडून झाला होता. या पीडित मुलीच्या न्यायासाठी जिल्ह्यासह राज्यभरात आंदोलन पेटविण्यात आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आमदार क्रिष्णाचंद्र सागरीया यांनी संघर्ष केला. जिल्हा बंद केला, कुंदली ते कोरापूट पदयात्रा काढली. गुन्हे शाखेतर्फे चौकशीही बसली. यादरम्यान पीडित मुलीला पैसे देऊन गप्प करण्याचा प्रयत्न झाला व ही क्लीपिंग समोरही आली. त्यामुळे सागरीया यांनी भुवनेश्वर येथे राज्यपाल गृहासमोर उपोषण सुरू केल्यामुळे घटनेच न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाल्याचे सागरीया यांनी सांगितले. यादरम्यान पोलिसांकडून आलेल्या एका वक्तव्यामुळे पीडित मुलीने आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. मुलीच्या आत्महत्येमुळे ते प्रचंड निराश झाले.पुढे मुलीच्या न्यायासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि दिल्ली येथे जंतरमंतरवर धरणेही दिले. २०१८ ला घटनेच्या स्मृतिदिनी काळा दिवस पाळण्यात आला. मात्र घटनादत्त पदावर असूनही पीडित मुलीला न्याय देऊ शकत नाही, याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा शासनाकडे सोपविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा लढा आता पुढेही चालविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आधी आमच्यामध्ये जागृती नव्हती, पण आता समाज जागृत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बौद्ध धम्माच्या दीक्षेमुळे चर्चेत 

ओरिसामध्ये सागरीया हे अनुसूचित जातीमधून एकमेव आमदार होते. १२ व १३ मे रोजी कोरापूट येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजित करून समाजातील ५०० कुटुंबासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तेव्हापासून ते चर्चेत आले होते. त्यांनी सांगितले, विद्यापीठात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्याचा व साहित्याचा परिचय झाला. स्टुडंट युनियनचे महासचिव म्हणून काम करताना अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लढा दिला. १९९२ मध्ये त्यांच्या पुढाकाराने डॉ. आंबेडकर यांचा पहिला ब्रान्झचा पुतळा कोरापूट येथे उभा राहिला होता. ते म्हणाले की, देशात जातीभेद आहे आणि आम्हाला आताही सहन करावा लागतो आहे. मात्र अन्यायाची जाणीव होईपर्यंत तो अन्याय वाटत नाही आणि जाणीव झाली की अन्याय सहन होत नाही. त्यावेळी निर्णय घेऊन भदंत धम्मशिखर व त्यांच्या संघाकडून धम्मदीक्षा घेतली. वास्तविक हे धर्मपरिवर्तन नसून न्यायाचा संदेश देणाऱ्या स्वधम्मात परत येणे होय, अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :MLAआमदारOdishaओदिशा