शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

भीषण पाणीटंचाई : धरणांमध्ये केवळ १० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:55 IST

नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.

ठळक मुद्देगोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात १८ तारखेपर्यंत केवळ ३४४ दलघमी (१० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोअर नांद ६० टक्के, वडगाव प्रकल्पात एक टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २५ टक्के, सिरपूर २३ टक्के, पुजारीटोला ३७ टक्के, कालीसरार ५१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये १९ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३४ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा, वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १४ टक्के, धाममध्ये १२ टक्के, पोथरामध्ये २ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ८ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडेनागपूर विभगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ २२ दरघमी म्हणजेच २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोसेखुर्द प्रकल्प टप्पा दोनची क्षमता ७४० इतकी आहे. ते पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यात आजच्याघडीला ० टक्के इतका पाणीसाठा आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणात केवळ १ टक्के इतके पाणी आहे. तर गडचिरोलीतील दिना प्रकल्पही कोरडा पडला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण