शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भीषण पाणीटंचाई : धरणांमध्ये केवळ १० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:55 IST

नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.

ठळक मुद्देगोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात १८ तारखेपर्यंत केवळ ३४४ दलघमी (१० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोअर नांद ६० टक्के, वडगाव प्रकल्पात एक टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २५ टक्के, सिरपूर २३ टक्के, पुजारीटोला ३७ टक्के, कालीसरार ५१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये १९ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३४ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा, वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १४ टक्के, धाममध्ये १२ टक्के, पोथरामध्ये २ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ८ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडेनागपूर विभगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ २२ दरघमी म्हणजेच २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोसेखुर्द प्रकल्प टप्पा दोनची क्षमता ७४० इतकी आहे. ते पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यात आजच्याघडीला ० टक्के इतका पाणीसाठा आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणात केवळ १ टक्के इतके पाणी आहे. तर गडचिरोलीतील दिना प्रकल्पही कोरडा पडला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण