शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

भीषण पाणीटंचाई : धरणांमध्ये केवळ १० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:55 IST

नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.

ठळक मुद्देगोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात १८ तारखेपर्यंत केवळ ३४४ दलघमी (१० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोअर नांद ६० टक्के, वडगाव प्रकल्पात एक टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २५ टक्के, सिरपूर २३ टक्के, पुजारीटोला ३७ टक्के, कालीसरार ५१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये १९ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३४ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा, वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १४ टक्के, धाममध्ये १२ टक्के, पोथरामध्ये २ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ८ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडेनागपूर विभगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ २२ दरघमी म्हणजेच २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोसेखुर्द प्रकल्प टप्पा दोनची क्षमता ७४० इतकी आहे. ते पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यात आजच्याघडीला ० टक्के इतका पाणीसाठा आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणात केवळ १ टक्के इतके पाणी आहे. तर गडचिरोलीतील दिना प्रकल्पही कोरडा पडला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण