शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सूर्याच्या नाही, ‘एलईडी’च्या झगमगाटात पिकेल शेती!

By जितेंद्र ढवळे | Updated: September 4, 2023 15:38 IST

ग्रीन हाउस आशेचा किरण : विद्यापीठ कॅम्पस अन् समुद्रपूरमध्ये होतोय प्रयोग

जितेंद्र ढवळे 

नागपूर : सूर्यदेवाचा अभ्यास करायला भारताचे आदित्य एल-१ यान निघाले आहे! मात्र सूर्याचे अवंलबित्व कमी करून एलईडी लाइटच्या बळावर शेती करता येईल का? यातून दर्जेदार उत्पादन घेता येईल का, यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आणि समुद्रपूर येथील विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये संशोधन सुरू आहे. 

‘एलईडी बेस्ड ग्रीन हाउस फॉर प्लांट कल्टिव्हेशन’ असे या संकल्पनेचे नाव आहे. एलईडी बेस ग्रीन हाउस ही संकल्पना जगासाठी नवी नाही! मात्र विदर्भात याचा वापर व्हावा. दुष्काळ आणि नापिकीच्या झळा सोसणारा येथील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून अत्यंत कमी खर्चात एलईडी बेस्ड ग्रीन हाउस तयार करून शेती करता येईल का, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे आणि समुद्रपूरच्या विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजच्या बॉटनी विभागाच्या प्रमुख डॉ. नयना शिरभाते गेल्या काही दिवसांपासून यावर संशोधन करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता यशही आले आहे. 

ग्रीन हाउस म्हणजे काय?

- ग्रीन हाउस शेतीत आपण हंगामी पिकांसोबत बिगरहंगामी पिके घेऊ शकतो. हे वर्षभर पिकाची वाढ आणि फळांचे उत्पादन समृद्ध करण्यास मदत करते.- हे पिकांचे संरक्षण करण्यास आणि त्यांना कीड तसेच रोगांपासून मुक्त ठेवण्यास आणि वाढ कायम ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे या शेतीसाठी पाणी कमी लागते.

यात एलईडीचा वापर कसा होणार?

- एलईडी ग्रोथ लाइट्स रोपांना ग्रीन हाउसमध्ये सूर्यप्रकाशाचे अनुकरण प्रदान करतात. हे दिवे विशिष्ट प्रकाश स्पेक्ट्रम (विशेषत: लाल आणि निळे) उत्सर्जित करतात जे वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करतात. - एलईडी हा ग्रीन हाउससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तो वनस्पतींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापक कस्टमायझेशन ऑफर करतो. कमी उष्णता उत्सर्जित करतो. 

कोणता रंग काय करतो?

ब्लू एलईडी (निळा रंग): ब्लू एलईडी हा झाडांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतो. रेड एलईडी (लाल रंग) : रेड एलईडीमुळे रोपांची वाढ होते. फार रेड एलईडी : फार रेड एलईडीमुळे झाडांना फळ धारणा होण्यास मदत होते.

एलईडी बेस्ड ग्रीन हाउसमध्ये औषधी वनस्पतीचे (मेडिकल प्लांट) संगोपन सहज शक्य आहे. इतकेच काय ज्या पिकांचे किंवा फळांचे उत्पादन आपल्याकडे होत नाही ते यातून साध्य करता येईल. कमी खर्चात हे युनिट तयार करता येते. यात ड्रिप वॉटर सिस्टीमचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा व्यापक स्वरूपात वापर झाल्यास शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येतील. आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. डिसेंबरमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यात येईल. 

- डॉ. संजय ढोबळे, शास्त्रज्ञ

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ