शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पहाटे ४ नंतर शेकडो रेतीच्या ट्रकची वाहतूक, प्रशासन असते साखरझोपेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 11:11 IST

रस्ता क्लिअर होण्याच्या प्रतीक्षेत ट्रकचालक देतात भिसी ते काम्पादरम्यान रात्रभर ठिय्या

नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातून होणारी अवैध रेती वाहतूक नागपुरात आणण्यासाठी ट्रक चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. काम्पा ते भिसी या मार्गावर सुपर एन्ट्री असल्याने ट्रक चालक व मोटार मालकही बिनधास्त असतात. पण उमरेड ते नागपूर दरम्यानच्या रस्त्यावर प्रशासन झोपी गेल्यावर भरधाव रेतीची वाहतूक करतात. ‘लोकमत’च्या पथकाने रेती चोरीचा हा खेळ कॅमेराबद्ध केला. या रेतीचोरीतून कोट्यवधी रुपयांचा सरकारचा महसूल बुडत आहे आणि अधिकाऱ्यांचे खिसे गरम होत आहेत.

नागपूर, भंडारा जिल्ह्यातील रेतीघाट बंद असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाटावरून रेती उचलली जात आहे. रेतीच्या या व्यवसायात रॉयल्टी ही केवळ नावाचीच राहिली आहे. फक्त रेतीची चोरी होत आहे. टिप्परच्या क्षमतेच्यावर रेतीची वाहतूक सुरू आहे. या चोरीला एसडीओ कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस निरीक्षक कार्यालय, आरटीओ, वाहतूक पोलिस, कुही फाटा चौकी अशा सर्वांचे पाठबळ मिळत आहे. या सर्वांचे एन्ट्री रेटही प्रति गाडी, प्रति महिना १० हजार रुपये ठरलेले आहेत. रेती चोरीचा हा सर्व प्रकार ‘लोकमत’च्या पथकाने मध्यरात्री उजेडात आणला.

काय टिपले कॅमेऱ्यात

रात्री १२ वाजता उमरेडकडून भिसीकडे जाणाऱ्या चौकात पोहोचलो. या चौकात भिवापूरच्या दिशेने बॅरिकेट लावलेले दिसले. त्यामुळे आम्ही भिसी मार्गाने काम्पाकडे निघालो. जे. बी. फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्याजवळ रेतीने भरून असलेल्या ट्रकांची रांग लागलेली होती. या रस्त्यावर संपूर्ण काळोख पसरलेला होता आणि ट्रकांचे लाईटसुद्धा बंद होते. काम्पाकडून रेती भरून येणारे ट्रक भिसी नाक्यापूर्वीच थांबून जात होते. त्यामुळे उमरेड-नागपूर रस्त्यावर रेतीच्या ट्रकची वाहतूक कमी झाली होती. दरम्यान, पोलिसांचे एक गस्ती पथक या रस्त्यावर दिसले. पोलिसांच्या वाहनामागे ओव्हरलोड रेती भरलेले ट्रकही होते. पण हे ट्रक सरळ नागपूरमार्गे निघून गेले. त्यानंतर सकाळपर्यंत प्रशासनाची कुठलीही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही. याचा फायदा घेत पहाटे ४ नंतर ८० च्यावर ट्रक अचानक उमरेड-नागपूर रस्त्यावर दिसून आले.

सकाळी ७ नंतर पाचगाव, खापरी परिसरात

रेतीचे ट्रक शहरात शिरण्यापूर्वी कळमना, पाचगाव येथे ५० ते ६० च्यावर गाड्या थांबल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार हे ट्रक ड्रायव्हर लाईन क्लिअर होण्याची वाट बघत होते. विशेष म्हणजे कुही फाटा चौकीची या रस्त्यावरून पेट्रोलिंग होत असतानाही त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही.

रेती चोरीत दलाल सक्रिय

अवैध रेतीची वाहतूक होत असेल तर कारवाई करण्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. परंतु या विभागांना चूप करण्यासाठी डझनभर दलाल सक्रिय आहेत. ते प्रशासनाला मॅनेज करतात. प्रत्येक मार्गावर सुपर एन्ट्री मिळवून देण्यासाठी दलाल मोटारमालक व प्रशासनात मध्यस्थी करतात. विशेष म्हणजे या दलालांमध्येही एन्ट्रीवरून वर्चस्वाची लढाई आहे.

वाहतूक पोलिसही करतात दुर्लक्ष

या मार्गावर सामान्य वाहनांवर ग्रामीण वाहतूक पोलिस कारवाई करतात. पण रेतीची चोरी करणाऱ्या या ट्रकला, ओव्हरलोड रेती घेऊन जाणाऱ्या, नंबर प्लेटही नसणाऱ्या या टिप्परकडे वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करतात. कारण एन्ट्री घेण्यात त्यांचाही विभाग सक्रिय असतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीnagpurनागपूरchandrapur-acचंद्रपूर