शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

कृषी कायदे का आवश्यक आहेत हे सांगण्यात सरकार ठरले अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोध करताना रद्द करण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर एका संकेतस्थळाला ...

नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोध करताना रद्द करण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रसिद्ध कृषी अर्थशास्त्रज्ञ, प्रोफेसर अशोक गुलाटी यांनी कृषी कायद्यांविषयी भाष्य केले.

गुलाटी म्हणाले, या कृषी कायद्यास इतका विरोध होत आहे हे पाहणे दुर्देवी आहे. या कायद्यासंदर्भात सरकारने शेतकऱ्यांंशी नीट संवाद साधला नाही आणि त्यामुळेच राजकीय पक्ष व कार्यकर्ते संवादातील अंतर पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरवित आहेत. या कायद्यांतर्गत मंडी संपुष्टात आणल्या जातील आणि त्यांच्या जमिनी मोठे व्यापारी घराणे ताब्यात घेतील, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यांच्यासाठी ही एक प्रकारची राजकीय लढाई आहे.

गुलाटी हे इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन (आयसीआरआयईआर) येथे शेतीविषयक इन्फोसिसचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, वाजपेयी सरकारच्या काळात २००३ मध्ये कृषी क्षेत्रातील विपणन सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा राज्य सरकारांना एक मॉडेल कायदा पाठवून कृषी विपणनाच्या उदारीकरणावर विचार करण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांना तंतोतंत माहिती देणाऱ्या आणि त्यांच्यासाठी काय चांगले आहे, हे सांगणारे अरुण जेटली यांच्यासारखे मातब्बर नेत्यांची केंद्र सरकारकडे कमतरता आहे. सर्वात मोठी सुधारणा १९९१ मध्ये करण्यात आली. त्यावेळी उद्योगांशी चर्चा करण्यात आली नव्हती. उद्योगांनी दहा वर्षे सुधारणांचा विरोध केला होता. त्याच्या मते त्याला आव्हान देण्याचा अधिकार विरोधकांना आहे. शेतकरी असो वा विरोधक, सरकारला योग्यरीत्या व्यवस्थापन करायचे आहे.

गुलाटी म्हणाले, सरकारने ही बाब चांगल्या प्रकारे हाताळली नाही. यावर चर्चा झाली नाही, असेही मी म्हणणार नाही. कारण गेल्या १७ वर्षांपासून हेच सुरू आहे. आपल्याला लाभकर्ते व विरोधांसोबत बसावे लागेल आणि पुरेशा बदल घडवून आणावा लागेल. लॉकडाऊनच्या काळात एपीएमसी कायदा रद्द करण्यात आला. त्यानंतरही कृषी उत्पादने मंडीत विकणाऱ्यांच्या पुरवठा साखळीवर काहीही परिणाम झाला नाही. मंडीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून एपीएमसी कायदा रद्द करण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत कृषी उत्पादनांची थेट विक्री आणि खरेदी कृषी क्षेत्राला टिकवून ठेवण्यास फायद्याची ठरली. कोरोना कालावधीत कठोर लॉकडाऊन असतानाही कृषी क्षेत्रावर परिणाम झाला नाही. थेट खरेदी आणि योग्य पुरवठा साखळी सुरळीस केल्यास मंडी प्रणालीपेक्षा ही यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्य करू शकते, असे सरकारला दिसून आल्याचे गुलाटी यांनी स्पष्ट केले.