शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:25 IST

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती.

नरेश डोंगरे,नागपूर बिलासपूर-नागपूर-बिलासपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आला आहे. या पार्श्वभूमीवर, वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरातून सर्वात पहिली सुरू होणाऱ्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. प्रारंभी ही गाडी सुसाट होती. मात्र, नंतर या गाडीला प्रवासी मिळेनासे झाले होते. त्यामुळे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर मार्गावर रिकामी ठणठण धावत होती. 

आता मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली असून, वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची खच्चून भरून धावत आहे. या गाडीत बसायला जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तसेच संघटनांकडून या गाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. 

ती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ट्रेन नंबर २०८२५/२६ बिलासपूर-नागपूर-बिलासपूर ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही गाडी ८ कोचसह धावत आहे.

१ जूनपासून होणार सुधारणा

अशा प्रकारे आणखी आठ कोच जोडले जाणार असल्याने ही गाडी १६ कोचची होणार असून, त्यामुळे गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. १ जून २०२५ पासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. त्यासंबंधाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूर