शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:25 IST

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती.

नरेश डोंगरे,नागपूर बिलासपूर-नागपूर-बिलासपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आला आहे. या पार्श्वभूमीवर, वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरातून सर्वात पहिली सुरू होणाऱ्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. प्रारंभी ही गाडी सुसाट होती. मात्र, नंतर या गाडीला प्रवासी मिळेनासे झाले होते. त्यामुळे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर मार्गावर रिकामी ठणठण धावत होती. 

आता मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली असून, वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची खच्चून भरून धावत आहे. या गाडीत बसायला जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तसेच संघटनांकडून या गाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. 

ती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ट्रेन नंबर २०८२५/२६ बिलासपूर-नागपूर-बिलासपूर ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही गाडी ८ कोचसह धावत आहे.

१ जूनपासून होणार सुधारणा

अशा प्रकारे आणखी आठ कोच जोडले जाणार असल्याने ही गाडी १६ कोचची होणार असून, त्यामुळे गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. १ जून २०२५ पासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. त्यासंबंधाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूर