शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:25 IST

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती.

नरेश डोंगरे,नागपूर बिलासपूर-नागपूर-बिलासपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आला आहे. या पार्श्वभूमीवर, वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरातून सर्वात पहिली सुरू होणाऱ्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. प्रारंभी ही गाडी सुसाट होती. मात्र, नंतर या गाडीला प्रवासी मिळेनासे झाले होते. त्यामुळे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर मार्गावर रिकामी ठणठण धावत होती. 

आता मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली असून, वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची खच्चून भरून धावत आहे. या गाडीत बसायला जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तसेच संघटनांकडून या गाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. 

ती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ट्रेन नंबर २०८२५/२६ बिलासपूर-नागपूर-बिलासपूर ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही गाडी ८ कोचसह धावत आहे.

१ जूनपासून होणार सुधारणा

अशा प्रकारे आणखी आठ कोच जोडले जाणार असल्याने ही गाडी १६ कोचची होणार असून, त्यामुळे गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. १ जून २०२५ पासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. त्यासंबंधाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूर