शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मनपाला ५०० कोटीचे विशेष अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 8:29 PM

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देराज्य सरकारकडे स्थायी समिती अध्यक्षांची मागणीकोरोनामुळे करवसुलीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी गुरुवारी दिली.महापालिकेची यंत्रणा कोरोना नियंत्रण व उपाययोजनात व्यस्त असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत मनपाचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार, नगररचना व अन्य विभागाचे उत्पन्न घटले आहे. त्यातच शासन अनुदानातही घट झाली आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर झाला आहे.मनपाला दर महिन्याला ११५ कोटींचा खर्च करावा लागतो. कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, वीज बिल, कच्चे पाणी आदींचा यात समावेश आहे.उत्पन्न व आवश्यक खर्च विचारात घेता फारसा निधी शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील विकास कामांवर याचा परिणाम होत आहे. सुरू असलेली विकास कामे व प्रस्तावित अत्यावश्यक विकासकामासाठी निधीची गरज आहे.बजेट ऑक्टोबरमध्येमनपाचे वर्ष २०२०-२१ या वर्षाचे बजेट सप्टेंबर महिन्यात मांडले जाणार होते. परंतु मनपाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात व्यस्त असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे ३० तारखेपर्यंत बजेट सादर होण्याची शक्यता नाही. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात बजेट सादर केले जाणार आहे. सभागृहात बजेट सादर केल्यानंतर आयुक्तांची मंजुरी आवश्यक असते. यात ऑक्टोबर महिना जाणार आहे. म्हणजेच स्थायी समितीचे बजेट नोव्हेंबरपासून अमलात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी