शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राष्ट्रवादीला दे धक्का ! काँग्रेसच्या रश्मी बर्वे अध्यक्ष अन् कुंभारे उपाध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 18:23 IST

नागपूर जि.प. निवडणुकीत राष्ट्रवादीला दे धक्का

नागपूर : नागपूरजिल्हा परिषदेत  मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची अध्यक्ष तर मनोहर कुंभारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीची सभापदी पदावर बोळवण करून जि.प.वर 1992 नंतर प्रथमच एकहाती सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसच्या धुरणींना यश आले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात शनिवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात अनुसूचित जाती (महिला) संवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी टेकाडी सर्कलमधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या रश्मी श्यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या संवर्गातून एकही उमेवार विजय झाला नसल्याने विरोधी पक्ष भाजपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

उपाध्यक्षपदासाठी केळवद सर्कल मधून विजयी झालेले काँग्रेसचे मनोहर कुंभारे, रायपूर सर्कलमधून विजयी झालेले राष्ट्रवादीचे दिनेश रमेश बंग आणि पारडसिंगा सर्कलमधून विजयी झालेले चंद्रशेखर कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी उपाध्यक्ष पदासाठी अखेरच्या क्षणार्पयत आग्रही होती. मात्र शनिवारच्या राजकारणाचे पॉवर सेंटर असलेल्या रविभवन येथून फोन आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी काँग्रेसच्या रश्मी बर्वेआणि मनोहर कुंभारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली.नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल 8 जानेवारी रोजी जाहीर झाला होता. यात काँग्रेसचे  30, राष्ट्रवादी काँग्रेस (10), भाजप (15), शिवसेना (1), शेकाप (1) आणि अपक्ष (1) असे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणूक पूर्व आघाडी असल्याने अपक्ष आणि शेकाप मिळून या आघाडीकडे 42 सदस्यांचे संख्याबळ सभागृहात होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माघार घेतल्याने सभागृहात हे संख्याबळ कायम राहीले. 

आघाडीत बिघाडी नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढले. या दोन्ही पक्षांना मतदारांनी मोठे यश मिळवून दिले. राष्ट्रवादीला सभापदीपद देण्याचे नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेत काँग्रेसच्या उमेदवारांना पाठींबा जाहीर झाला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली नसल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही जि.प.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केलीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर देशमुख यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदnagpurनागपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस