शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल  : गिरीश व्यास यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 9:19 PM

आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

ठळक मुद्देसरकारची गती थांबली, मती भ्रष्ट झाली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनकाळात राज्यातील विकास योजना थांबविल्या जात आहेत. या सरकारची गती थांबली असून मती भ्रष्ट झाली आहे. आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.हे सरकार सुरू होण्याच्या अगोदरच गडगडण्याच्या स्थितीत आले आहे. सरकार आले तेव्हाच हे किती दिवस चालेल याची चर्चा जनतेमध्ये होती. ज्या पद्धतीने सरकारचे काम सुरू आहे त्यावरुन हेच दिसून येत आहे. आम्ही विकासाच्या कामाला गती देऊ, विचारपूर्वक काम करु, सरकारचे काम द्वेषपूर्ण राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र यांनी ज्या पद्धतीने विकासाच्या योजनांना थांबविण्याचे काम केले आहे त्यावरुन एकप्रकारे ते महाराष्ट्राच्या विकासाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आम्हाला आॅपरेशन कमळ राबविण्याची आवश्यकता नाही. कर्नाटकचे राजकारण सर्वांनी पाहिले. लोकशाही पद्धतीने तेथे निर्णय आला. आता ईव्हीएमबाबत कुणीही बोलत नाही. जनतेने तेथे भाजपाला कौल दिला आहे, असे ते म्हणाले.महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणूमहाविकास आघाडीने सत्ता सोडली तर निश्चित निवडणुकांना सामोरे जाऊ व एकट्याच्या ताकदीने सरकार स्थापन करून दाखवू. निवडणुकीची स्थिती आली तर आमची नेहमीच तयारी आहे, असा विश्वासदेखील गिरीश व्यास यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Girish Vyasगिरीश व्यासPoliticsराजकारणMediaमाध्यमे