शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

By गणेश हुड | Updated: September 18, 2025 18:43 IST

शेतकरी संघटनेची मागणी :अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे खरीप पिक व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात शासनाने एनडीआरएफचे निकष बाजुला सारून एकरी ५० हजार रुपये मदत तातडीने जाहीर करावी.केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी  राज्य सरकारने तातडीने कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललीत बहाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. 

बहाळे म्हणाले की, “दरवर्षी नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात वाढ व बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले असून आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत. या परिस्थितीत  सरकारने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरची सर्व कर्जाची नोंद पुसून सातबारा कोरा करून कर्जमुक्ती जाहीर करावी. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा बहाळे यांनी दिला. 

शेतकरी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी महाराष्ट्रातील एसबीटी बियाण्यांवरील बंदीवर ताशेरे ओढले.एसबीटी बियाणे ही सुधारित बियाण्यांची श्रेणी आहे जी पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन देणारी आहे. "गुजरात-आंध्रात वापरास बंदी नाही, मग महाराष्ट्रातच अडथळा का? राज्य सरकारने प्रायोगिक वापरासाठी केंद्राकडे परवानगी मागावी," अशी त्यांनी मागणी केली. २९ सप्टेंबर २०२५ शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

यावेळी माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, शेतकरी युवा आघाडीचे अॅड. दिपक चटप, सतीश दाणी, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख राजाभाऊ पुसदेकर, राजकुमार धोटींग, श्रीकांत दौलतकर, अरुण केदार आदी उपस्थित होते. 

डिसेंबरमध्ये अधिवेशन

शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, युवा आघाडी, स्वतंत्र भारत पक्षातर्फे शेतकरी, शेतमजूर, युवक, व्यापारी, छोटे उद्योजक व महिलांचे व महिला बचत गटांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी १० ते १२ डिसेंबर २०२५ ला यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती ललीत बहाळे यांनी दिली. 

शेतकरी संघटनेच्या मागण्या

  • हवामान प्रतिरोधक, पौष्टीक व औषधी गुणधर्म असलेल्या बियाण्यांवरील संशोधनाला परवानगी द्या.
  • शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोअरची अट तातडीने रद्द करा.
  • कापसावरील ११ टक्के आयात शुल्क पुन्हा लागू करा आणि संपूर्ण कापूस बिनशर्त खरेदी करा.
  • बाजार समित्यांत व खरेदी केंद्रांत नोंदणी सुविधा सुरू करा.
  • तेल, वाटाणा, तूर व कडधान्यावरील आयात शुल्क वाढवा.
  • वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान शासनाने भरून द्यावे.
  • सर्प दंशामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई द्या.
टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूर