शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

नागपूर जिल्ह्यातील केळवदमध्ये गॅस्ट्रोचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:30 IST

केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले.

ठळक मुद्देदूषित पाणीपुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात २० रुग्णांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.केळवदला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ही नळयोजना ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. नळयोजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तसेच पर्यायी व्यवस्था नसल्याने गावाला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तोही पुरेसा नसतो. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींचे तसेच हॅण्डपंपचे पाणी वापरावे लागते. ते पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासण्याची व त्याबाबतची माहिती नागरिकांना सांगण्याची तसदी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नाही. परिणामी, गावातील पहलेपार भागात राहणाऱ्या नागरिकांना मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण व्हायला सुरुवात झाली. सहा रुग्णांची स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली असून, त्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांवर वेळीच औषधोपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे यांनी दिली.गावात गॅस्ट्रोचे यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गरीब नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असून, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते केळवद व सावनेर येथील खासगी डॉक्टरांकडे उपचाराला जातात. त्यामुळे गावात नेमक्या किती नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली, हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही ठोस उपाययोजना करायला सुरुवात केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.पाण्याच्या ‘क्लोरिनेशन’कडे दुर्लक्षगावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिक गावातील तसेच परिसरातील सार्वजनिक व खासगी विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र, प्रशासनाने या विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकण्याची तसदी घेतली नाही. मग, या जलस्रोतातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे, त्या जलस्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासणे, पिण्यायोग्य नसल्यास तिथे सूचना फलक लावून नागरिकांना माहिती देणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे, गावातील विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकणे सुरू असल्याची माहिती ग्रामसेवक बांबल यांनी दिली. वास्तवात, ही प्रक्रिया गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर सुरू करण्यात आली आहे. काही विहिरींमध्ये अद्यापही ‘ब्लिचिंग पावडर’ टाकली नाही, असे नागरिकांनी सांगितले.ग्रामपंचायतला लेखी सूचनागॅस्ट्रो दूषित पाण्यामुळे होतो. नळयोजनेसह गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकण्याची लेखी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला पूर्वीच दिली होती. काही शेतातील विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी कुठल्याही विहिरीचे अथवा हॅण्डपंपचे पाणी पिणे टाळावे. नागरिकांनी ‘ब्लिचिंग पावडर’ टाकलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. प्रसंगी उकळून थंड केलेले पाणी प्यावे.- डॉ. निशा पांडे,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवद..

टॅग्स :Healthआरोग्य