शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील केळवदमध्ये गॅस्ट्रोचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:30 IST

केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले.

ठळक मुद्देदूषित पाणीपुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात २० रुग्णांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.केळवदला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ही नळयोजना ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. नळयोजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तसेच पर्यायी व्यवस्था नसल्याने गावाला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तोही पुरेसा नसतो. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींचे तसेच हॅण्डपंपचे पाणी वापरावे लागते. ते पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासण्याची व त्याबाबतची माहिती नागरिकांना सांगण्याची तसदी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नाही. परिणामी, गावातील पहलेपार भागात राहणाऱ्या नागरिकांना मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण व्हायला सुरुवात झाली. सहा रुग्णांची स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली असून, त्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांवर वेळीच औषधोपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे यांनी दिली.गावात गॅस्ट्रोचे यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गरीब नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असून, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते केळवद व सावनेर येथील खासगी डॉक्टरांकडे उपचाराला जातात. त्यामुळे गावात नेमक्या किती नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली, हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही ठोस उपाययोजना करायला सुरुवात केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.पाण्याच्या ‘क्लोरिनेशन’कडे दुर्लक्षगावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिक गावातील तसेच परिसरातील सार्वजनिक व खासगी विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र, प्रशासनाने या विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकण्याची तसदी घेतली नाही. मग, या जलस्रोतातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे, त्या जलस्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासणे, पिण्यायोग्य नसल्यास तिथे सूचना फलक लावून नागरिकांना माहिती देणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे, गावातील विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकणे सुरू असल्याची माहिती ग्रामसेवक बांबल यांनी दिली. वास्तवात, ही प्रक्रिया गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर सुरू करण्यात आली आहे. काही विहिरींमध्ये अद्यापही ‘ब्लिचिंग पावडर’ टाकली नाही, असे नागरिकांनी सांगितले.ग्रामपंचायतला लेखी सूचनागॅस्ट्रो दूषित पाण्यामुळे होतो. नळयोजनेसह गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकण्याची लेखी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला पूर्वीच दिली होती. काही शेतातील विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी कुठल्याही विहिरीचे अथवा हॅण्डपंपचे पाणी पिणे टाळावे. नागरिकांनी ‘ब्लिचिंग पावडर’ टाकलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. प्रसंगी उकळून थंड केलेले पाणी प्यावे.- डॉ. निशा पांडे,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवद..

टॅग्स :Healthआरोग्य