शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2022 11:12 IST

दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पौषवैद्य संकष्टी चतुर्थीला येथे यात्रा भरते.

विजय नागपुरे

कळमेश्वर (नागपूर) :विदर्भातील अष्टविनायकांपैकी पहिला मान असलेला गणपती म्हणजे श्रीक्षेत्र अदासा येथील शमी विघ्नेश्वर. नागपूरहून ४० कि.मी., तर श्रीक्षेत्र धापेवाडा येथून ४ कि.मी.वर अदासा हे छोटंसं गाव वसलेलं आहे. मनोकामना पूर्ण करणाऱ्या विघ्नेश्वरावर भाविकांची असिम श्रद्धा आहे. पुराणातील उल्लेखाप्रमाणे या ठिकाणाचं नाव अदोषक्षेत्र. बोलीभाषेत त्याचा अपभ्रंश होऊन पुढे अदासा असे नाव पडले.

संगमरवर दगडापासून निर्मित ११ फूट उंच व ७ फूट रुंद असलेली ही गणेशाची मूर्ती भक्तांचे संकट दूर करत असल्याने वर्षभर येथे मोठी गर्दी असते. गणपती देवस्थानाचा परिसर २० एकरांत आहे.

मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील शिल्पकला, उंच कळस, फुलांची बाग, सभागृह यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते. मंदिराच्या वरील भागाला दुर्गा देवीचे मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, कालभैरव मंदिर, जंबुमाळी मारोती ही देवस्थाने आहेत. त्याचबरोबर, महारुद्र हनुमानाचे मोठे मंदिर आहे. सुर-असुरांच्या युद्धात देवांचा विजय झाल्यानंतर हनुमान येथे विश्रांतीसाठी आले होते, अशी आख्यायिका आहे.

मंदिराच्या पायथ्याशी येथे पाय बावली आहे. रस्त्याच्या पलीकडे असे गणेश कुंड आहे. पूर्वी गणपतीच्या अंघोळीसाठी या गणेश कुंडातून पाणी नेत असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या वरच्या बाजूला एक भुयार असून, तिथे महादेवाची पिंड आहे. या भुयारातून एक गुप्त मार्ग असून, तो नागद्वार व रामटेकपर्यंत गेला असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे बांधकाम जवळपास पाच हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते.

अशी आहे आख्यायिका

देव आणि असुर यांच्यात झालेल्या समुद्रमंथनानंतर देवांना अमृत प्राप्त झाले. असुरांचा पराभव झाला, तेव्हा इंद्राचे स्थान प्राप्त करण्यासाठी व स्वर्गावर आधिपत्य निर्माण करण्यासाठी गुरू शुक्राचार्यांनी बळीराजाला १०० अश्वमेध यज्ञ करायला सांगितले. बळीराजाला यज्ञ करण्यास रोखण्यासाठी भगवान विष्णूने देवमाता अदितीच्या गर्भातून वामन अवतारात जन्म घेतला. त्यानंतर, वामन अवतारातील भगवान विष्णूने याच ठिकाणी शमी वृक्षाखाली अदास्याला गणेशाची उपासना केली. उपासनेने प्रसन्न होऊन गणेशाने शमी वृक्षातून प्रकट होत विष्णूला आशीर्वाद दिला. त्यामुळेच या गणेशाला ‘शमी विघ्नेश्वर’ नावानेही ओळखले जाते. यावेळीच वामन अवतारानेच या मूर्तीची स्थापना केल्याचे मानले जाते. दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पौषवैद्य संकष्टी चतुर्थीला येथे यात्रा भरते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवSocialसामाजिकVidarbhaविदर्भganpatiगणपती