शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वजन वाढतंय? रात्रीचे जेवण बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 20:23 IST

Nagpur News रात्री कमी प्रमाणात जेवण केल्याने वजन योग्य राहते, रक्तातील साखरेची पातळी योग्य होते, चयापचय किंवा पचनशक्ती वाढते.

नागपूर : प्रत्येक व्यक्तीने खाण्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे. न्याहारी आणि रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर खावे. बऱ्याच जणांना कामानिमित्त रात्री घरी उशिरा यावे लागते. अशा परिस्थितीत त्यांनी रात्रीच्या जेवणाआधी हलके खाल्ले पाहिजे. रात्रीचे जेवण अर्धपोटी केलेलेच बरे. रात्री कमी प्रमाणात जेवण केल्याने वजन योग्य राहते, रक्तातील साखरेची पातळी योग्य होते, चयापचय किंवा पचनशक्ती वाढते.

रात्री जेवण कसे असावे?

- रात्रीचे जेवण हलके-फुलके घ्यावे, जेवणात मसाल्यांचे प्रमाण खूप कमी असावेत. रात्रीच्या वेळी जेवणात नियमितपणे सलाडचा समावेश करावा. सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार करण्यात आलेले सूप घेणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अधिक तेलाचा वापर करू नये. मसालेदार जेवण रात्रीच्या आहारात घेतल्यास ढेकर येणे, पोटात दाह होणे आणि गॅसेसचा त्रास होतो. रात्रीच्या जेवणात मांसाहारी पदार्थांचा समावेश करू नये. कारण, मांसाहारी पदार्थ पचण्यास खूप जड असतात. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिक रेट दिवसाच्या तुलनेत मंद असल्याने रात्री कधीही पोटभर जेवण करू नये.

दुपारचे जेवण कसे असावे?

- दुपारच्या जेवणात चौरस आहार; म्हणजे कोशिंबीर, पोळी-भाजी, वरण-भात असे सर्व पदार्थ असावे. अशा पारंपरिक चौरस आहारात सर्व अन्नगटांचा समावेश असतो व आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात.

दुपारचे जेवण सुमारे १ ते २ या दुपारच्या वेळी घ्या. वजन संतुलित किंवा वजन कमी करू इच्छित असल्यास आपण चपाती किंवा तांदळाची, ज्वारीची भाकरी तसेच कमी प्रमाणत भात खाऊ शकता.

ब्रेकफास्टला काय खावे?

- आहारचक्रात सकाळच्या नास्त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सकाळी उठून रिकाम्या पोटी, नास्त्याच्या आधी किंवा चहा पिण्यापूर्वी, एक, दोन ग्लास पाणी नक्की प्या. सकाळी १० ते ११ न्याहारी (ब्रेकफास्ट) करा. नंंतर सुमारे दोन ते तीन तासांनी हलका नास्ता केलाच पाहिजे. फळ, अंडी, दूूध याचा समावेश असावा. तेलकट पदार्थ टाळावे. अन्यथा, दुपारच्या जेवणाची भूक जास्त वाढेल.

खाण्याच्या वेळा काय असाव्यात ?

- दुपारचे जेवण सुमारे १ ते २ या दुपारच्या वेळी घ्या.

- सकाळी १० ते ११ न्याहारी (ब्रेकफास्ट) नंंतर सुमारे दोन ते तीन तासांनी हलका नास्ता केलाच पाहिजे.

- रात्रीचे जेवण शक्य तेवढ्या लवकर केले बरे. शक्यतो रात्री ८ ते ९ च्या आत जेवण करावे.

व्यायामही महत्त्वाचा

- नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. रक्तदान, ब्लड शुगर व रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणास मदत होते. व्यायाम केल्याने माणसाला नवीन ऊर्जा प्राप्त होते. अन्न पचनास मदत होते. व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केली तर पचनास फायदा होतो.

आहारचक्राचे पालन करा 

- निरोगी आयुष्यासाठी पौष्टिक आहार घेणे व आहारचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यापूर्वी आपण काय खाणार यावर नियंत्रण ठेवा व जितके जमेल तितके खा, अतिसेवन टाळा. पचनास जड असलेले अन्न खाऊन झोपल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पोट जड वाटणे किंवा मलावरोध असे त्रास या आहारामुळे होतात. शिवाय, असा आहार घेतल्याने झोपही व्यवस्थित पूर्ण होत नाही.

- डॉ. अभिजित देशमुख,

प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य