शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

वजन वाढतंय? रात्रीचे जेवण बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 20:23 IST

Nagpur News रात्री कमी प्रमाणात जेवण केल्याने वजन योग्य राहते, रक्तातील साखरेची पातळी योग्य होते, चयापचय किंवा पचनशक्ती वाढते.

नागपूर : प्रत्येक व्यक्तीने खाण्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे. न्याहारी आणि रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर खावे. बऱ्याच जणांना कामानिमित्त रात्री घरी उशिरा यावे लागते. अशा परिस्थितीत त्यांनी रात्रीच्या जेवणाआधी हलके खाल्ले पाहिजे. रात्रीचे जेवण अर्धपोटी केलेलेच बरे. रात्री कमी प्रमाणात जेवण केल्याने वजन योग्य राहते, रक्तातील साखरेची पातळी योग्य होते, चयापचय किंवा पचनशक्ती वाढते.

रात्री जेवण कसे असावे?

- रात्रीचे जेवण हलके-फुलके घ्यावे, जेवणात मसाल्यांचे प्रमाण खूप कमी असावेत. रात्रीच्या वेळी जेवणात नियमितपणे सलाडचा समावेश करावा. सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार करण्यात आलेले सूप घेणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अधिक तेलाचा वापर करू नये. मसालेदार जेवण रात्रीच्या आहारात घेतल्यास ढेकर येणे, पोटात दाह होणे आणि गॅसेसचा त्रास होतो. रात्रीच्या जेवणात मांसाहारी पदार्थांचा समावेश करू नये. कारण, मांसाहारी पदार्थ पचण्यास खूप जड असतात. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिक रेट दिवसाच्या तुलनेत मंद असल्याने रात्री कधीही पोटभर जेवण करू नये.

दुपारचे जेवण कसे असावे?

- दुपारच्या जेवणात चौरस आहार; म्हणजे कोशिंबीर, पोळी-भाजी, वरण-भात असे सर्व पदार्थ असावे. अशा पारंपरिक चौरस आहारात सर्व अन्नगटांचा समावेश असतो व आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात.

दुपारचे जेवण सुमारे १ ते २ या दुपारच्या वेळी घ्या. वजन संतुलित किंवा वजन कमी करू इच्छित असल्यास आपण चपाती किंवा तांदळाची, ज्वारीची भाकरी तसेच कमी प्रमाणत भात खाऊ शकता.

ब्रेकफास्टला काय खावे?

- आहारचक्रात सकाळच्या नास्त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सकाळी उठून रिकाम्या पोटी, नास्त्याच्या आधी किंवा चहा पिण्यापूर्वी, एक, दोन ग्लास पाणी नक्की प्या. सकाळी १० ते ११ न्याहारी (ब्रेकफास्ट) करा. नंंतर सुमारे दोन ते तीन तासांनी हलका नास्ता केलाच पाहिजे. फळ, अंडी, दूूध याचा समावेश असावा. तेलकट पदार्थ टाळावे. अन्यथा, दुपारच्या जेवणाची भूक जास्त वाढेल.

खाण्याच्या वेळा काय असाव्यात ?

- दुपारचे जेवण सुमारे १ ते २ या दुपारच्या वेळी घ्या.

- सकाळी १० ते ११ न्याहारी (ब्रेकफास्ट) नंंतर सुमारे दोन ते तीन तासांनी हलका नास्ता केलाच पाहिजे.

- रात्रीचे जेवण शक्य तेवढ्या लवकर केले बरे. शक्यतो रात्री ८ ते ९ च्या आत जेवण करावे.

व्यायामही महत्त्वाचा

- नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. रक्तदान, ब्लड शुगर व रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणास मदत होते. व्यायाम केल्याने माणसाला नवीन ऊर्जा प्राप्त होते. अन्न पचनास मदत होते. व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केली तर पचनास फायदा होतो.

आहारचक्राचे पालन करा 

- निरोगी आयुष्यासाठी पौष्टिक आहार घेणे व आहारचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यापूर्वी आपण काय खाणार यावर नियंत्रण ठेवा व जितके जमेल तितके खा, अतिसेवन टाळा. पचनास जड असलेले अन्न खाऊन झोपल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पोट जड वाटणे किंवा मलावरोध असे त्रास या आहारामुळे होतात. शिवाय, असा आहार घेतल्याने झोपही व्यवस्थित पूर्ण होत नाही.

- डॉ. अभिजित देशमुख,

प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य