शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अर्थसंकल्पात गडकरींच्या मंत्रालयांची छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:34 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांची छाप दिसून येत आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारीची समस्या दूर होऊ शकते असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या नेत्यांचे मत आहे. अर्थसंकल्पात या मंत्रालयाच्या तरतुदींवर भर देण्यात आला आहे.

ठळक मुद्देई-वाहने, वाहतुकीवर भर : सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांवरदेखील लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांची छाप दिसून येत आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारीची समस्या दूर होऊ शकते असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या नेत्यांचे मत आहे. अर्थसंकल्पात या मंत्रालयाच्या तरतुदींवर भर देण्यात आला आहे.अर्थसंकल्पात सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्ट-अप्स’साठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या उद्योगांमध्ये गुंतवणूकदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. जीएसटी नोंदणीकृत सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी दोन टक्के व्याजावर कर्जासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देयकांचा भरणा करण्यासाठी ‘प्लॅटफॉर्म’ बनविण्यात येईल. सरकारी ‘पेमेन्ट’मध्ये होत असलेला विलंब दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून जीडीपी वाढावा व रोजगारनिर्मिती व्हावी, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.याशिवाय अर्थसंकल्पात वाहतूक क्षेत्रावरदेखील लक्ष ठेवण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी दीड लाखांपर्यंतच्या वाहनांना खरेदीवर आयकर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहनांच्या सुट्या भागांवर लागणाऱ्या सीमा शुल्कातदेखील सूट देण्याची बाब प्रस्तावित आहे. चार्जिंग आणि इतर पायाभूत रचनेला सशक्त करण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकारे ‘एनसीएसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मानकांवर आधारित वाहतूक प्रणालीला विकसित करण्यात येईल. रुपे कार्डवर चालणारे इंटर ऑपरेबल वाहतूक कार्डधारकांना बसमध्ये प्रवास करणे, टोलटॅक्स देणे, पार्किंग शुल्क भरणे तसेच रिटेल शॉपिंगचा परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान ग्रामरस्ते योजना, भारतमाता योजनेच्या दुसºया टप्प्यात राज्य रस्ते नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकारे राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रमाची परत रचना करून राष्ट्रीय महामार्ग ग्रीड तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.नवीन भारताचा पाया रचणारा अर्थसंकल्पअर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वांना डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आला आहे. नवीन भारताचा पाया रचणारा हा अर्थसंकल्प आहे. ग्रामविकास ते नगरविकास, पायाभूत सुविधा ते स्टार्टअप्स, शिक्षण ते उद्योग या सर्वांनाच चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. देशातील १२५ कोटी जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेले ‘व्हिजन’ यातून दिसून येत आहे. तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट देश नक्कीच गाठेल व त्यात सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगांचा वाटा अर्ध्याहून अधिक असेल. इलेक्ट्रिक वाहने व संबंधित पायाभूत सुविधांसंदर्भात घेतलेले धोरण हे ‘लॉजिस्टिक’ क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे ठरेल. प्रदूषणापासून मुक्तीसाठी हे सर्वात मोठे पाऊल असून शाश्वत विकासाकडे नेणारे आहे.नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री

 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Nitin Gadkariनितीन गडकरी