शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

फुटाळा, सक्करदरा सलाईनवर : गणपती विसर्जनानंतर तलावाची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:31 PM

विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवादी संस्थेने केले तलावातील पाण्याचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तलाव हा शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. पूर्वी तलावाचा उपयोग व्हायचा. मात्र आता तलाव हे फक्त धार्मिक विसर्जनासाठी वापरले जातात. विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत असल्याने महापालिकेने यावर्षी फुटाळा सोडल्यास चार तलावावर निर्बंध घातले. विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. तर सोनेगाव व गांधीसागर तलावाची अवस्था ठिकठाक असल्याचे दिसते आहे.‘अर्थ इको इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मिळून ग्रीन व्हिजिल संस्थेने गणपती विसर्जनानंतर शहरातील चार मुख्य तलावांचे निरीक्षण केले. संस्थेने गणपती विसर्जनापूर्वीसुद्धा तलावाचे निरीक्षण केले होते. विसर्जनानंतर केलेल्या निरीक्षणात फुटाळा व सक्करदरा तलावाच्या पाण्यात प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आले. या निरीक्षणात त्यांनी तलावातील पाण्याचे पीएच, गढुळपणा व पाण्यात मिसळलेले ऑक्सिजन याचे परीक्षण केले. या परीक्षणात गणपती विसर्जनाचा सर्वाधिक फटका फुटाळा तलावाला बसल्याचे दिसून आले. गणपती विसर्जनापूर्वी फुटाळ्यात ऑक्सिजनची मात्रा ४ ते ४.५ मिलीग्रॅम होती. विसर्जनानंतर ३ ते ३.५ मिलीग्रॅम नोंदविण्यात आली. तलावाच्या पाण्यात गढुळपणासुद्धा वाढल्याचेही दिसून आले. तलावातील पाण्याचा पीएच मात्र कायम होता. सक्करदरा तलावात गणपती विसर्जनावर निर्बंध घातले होते. परंतु तलावात मोठ्या प्रमाणात जलकुंभ आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या मात्रेवर परिणाम झाला आहे. तलावातील पाण्यात गढुळपणा वाढला असून, पीएच कायम आहे.गांधीसागर व सोनेगावची स्थिती बरीमनपाने गांधीसागर व सोनेगाव तलावात गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या होत्या. येथे विसर्जन झाले नाही. त्यामुळे या दोन्ही तलावाच्या पाण्याच्या ऑक्सिजनच्या मात्रेत फारसा फरक पडला नाही. गढुळपणाही कमी आढळून आला. तलावातील पीएच बऱ्यापैकी आहे. तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणामतलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड ऑक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रॅमपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते. तसेच सक्करदरा तलावातील जलकुंभ साफ करणे गरजेचे आहे.सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन व्हिजिल

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावpollutionप्रदूषण