शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात निधीचा खडखडाट; अनेकांचे वेतन, मजुरी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 11:19 IST

विदर्भातील या चारही प्रकल्पांमिळून ४४८ जवान कार्यरत आहेत. या सर्वांचा मिळून जवळपास ६ कोटी रुपयांचा पगार थकीत आहे. येथे काम करणाऱ्या मजुरांचीही हीच अवस्था असून त्यांची जवळपास ११ कोटी रुपये मजुरी थकीत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देजवानांचे ६ महिन्यांचे पगार थकीत, मजुरांचेही ११ कोटी थकले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वन संवर्धन आणि व्याघ्र संवर्धनात मोलाची भूमिका बजावणारे विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान मागील एप्रिल-२०२१ पासून वेतनाविना आहेत. एवढेच नाही तर प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठीही प्रकल्पाकडे पैसा नाही. वेतनाची रक्कमच न आल्याने तोंडावर आलेली दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता अधिक आहे.

ताडोबा, पेंच, नवेगाव, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान कार्यरत आहेत. या प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात ११२ पदे असून त्यात एसीएफ दर्जाचे एक पद, ३ रेंज ऑफिसर्स आणि अन्य वनरक्षक आहेत. विदर्भातील या चारही प्रकल्पांमिळून ४४८ जवान कार्यरत आहेत. या सर्वंचा मिळून जवळपास ६ कोटी रुपयांचा पगार थकलेला आहे.

व्याघ्र प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचीही हीच अवस्था आहे. त्यांचीही मजुरी एप्रिल महिन्यापासून थांबली आहे. देण्यासाठी पैसाच नाही. एकट्या पेंच प्रकल्पात दर महिन्याला सुमारे ३०० ते ४०० मजूर कामाला असतात. रोजीने काम करणाऱ्या या मजुरांची मजुरी देण्यासाठी पेंचकडे पैसा नाही. दिवाळी तोंडावर आल्याने आणि मजुरांची ओरड वाढल्याने फाऊंडेशनमधून रक्कम काढून मजुरी देण्याची वेळ आली आहे. मजुरांच्या थकबाकीची अशीच स्थिती अन्य प्रकल्पातही आहे. सुमारे ११ कोटी रुपयांच्या जवळपास मजुरी थकीत असल्याची माहिती आहे.

डीबीएस प्रणालीमुळे विलंब

विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानांचे वेतन मागील वर्षीही ४ ते ५ महिने थांबलेले होते. त्यासाठी कोरोनाचे कारण सांगितले जात होते. यंदाही विलंबाची स्थिती आहे. मात्र, यावेळी कोरोनाचे कारण नसून डीबीएस (बजेट डिस्ट्रिब्युशन सिस्टिम) प्रणालीचे कारण पुढे आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून ५० टक्के निधी मिळतो. राज्य सरकारने आरबीआयच्या निर्देशानुसार या वर्षीपासून नोडल एजन्सीमार्फत व्याघ्र प्रकल्पांना निधी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एकाच ऑनलाईन लिंकवर या माध्यमातून प्रकल्पांना निधी दिला जाणार आहे. या प्रक्रियेतील विलंबामुळे जवानांच्या वेतनातही विलंब झाला आहे.

पीक नुकसान, मनुष्यहानीची रक्कम थांबली

प्रकल्पालगतच्या गावकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी यापूर्वी तातडीने पैसा दिला जायचा. मात्र, अलीकडे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही वेळवर मिळत नसल्याची स्थिती आहे. मनुष्यहानीची नुकसानभरपाईदेखील विनाविलंब मिळायची. आता ती सुद्धा विलंबाने मिळत आहे. प्रकल्पांना नेगेटिव्ह डीबीएसमधून ही रक्कम देण्याची मुभा होती. कोरोनानंतर ही प्रक्रियाच बंद पडली. परिणामत: शेतकरी संतप्त आहेत.

प्रकल्पाकडे निधी न आल्याने जवानांचे वेतन आणि मजुरी थांबली आहे. अलीकडेच आम्ही पेंच फाउंडेशनमधून मजुरांच्या मजुरीची रक्कम दिली. नेगेटिव्ह डीबीएसचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चेला आला होता. त्याला पुन्हा मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

- डॉ. रविकिरण गोवेकर, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरण