शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

फरार ठगबाजाने अनेकांना लावला कोट्यवधीचा चुुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 02:44 IST

कुख्यात सुभाष बंजाराचे नवीन कृत्य : २ हजार टॅक्सी मालकांना गंडा

जगदीश जोशी

नागपूर : टॅक्सी भाड्यावर चालवण्याचे आमिष दाखवून नागपुरात अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या सुभाष बंजाराने दिल्लीतही जवळपास दोन हजार टॅक्सी मालकांना कोट्यवधीचा चुना लावला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात साडेपाच महिन्यांपासून फरार असूनही पोलीस त्याला शोधण्यासाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाहीत. यामुळेच बंजारा चार महिन्यांतच दिल्लीतूनही कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला. हा प्रकार उघडकीस येताच शहरातील पीडितही संताप व्यक्त करत आहेत.

बंजारपा मूळचा जळगावचा आहे. त्याने कोरोना संसर्गादरम्यान एलआयसी चौकाजवळ कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. टॅक्सी मालकांना त्याच्याशी जुळल्यास टॅक्सीच्या मोबदल्यात दर महिन्याला एक ठरावीक रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. रजिस्ट्रेशनच्या नावावर शहरात ७५०० आणि शहराबाहेरसाठी १७,५०० रुपये घेतले होते. जुलैमध्ये टॅक्सी सर्व्हिस सुरू केली. ऑगस्टमध्ये रोख रक्कम अदा केली; परंतु सप्टेंबरमध्ये धनादेश दिले. त्यानंतर ते धनादेश बाऊन्स झाल्यावर तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिनेश मिश्रा यांच्या तक्रारीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सूत्रानुसार तपासात जवळपास ४५० टॅक्सी मालकांकडून ४.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी २५० पेक्षा अधिक लोकांची साक्षही नोंदवून घेतली.

नागपुरातून फरार झाल्यानंतर बंजारा मुंबई मार्गे दिल्लीत पोहोचला. दिल्लीच्या वजीरपूर येथे नेताजी सुभाष पॅलेस येथे त्याने योयो टॅक्सी सर्व्हिस सुरू केली. तिथेही त्याने नागपूरच्या धर्तीवर टॅक्सी मालकांना आपल्या जाळ्यात अडकविले. डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत २ हजार टॅक्सी मालक बंजाराच्या योयो सर्व्हिसशी जुळले. त्याने ६५ ते ३५ हजार रुपये रजिस्ट्रेशनच्या नावावर घेतले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. टॅक्सी मालकांनी वजीरपूर ठाण्यात, डीसीपी आणि ईडीकडे त्याची तक्रार केली. 

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह   बंजारा नागपुरातील एका पीडित टॅक्सी मालकाची कार घेऊन फरार झाला होता. त्या कारला ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत दंड झाला. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी दिल्लीतील काश्मिरी गेट, ८ डिसेंबर रोजी वजिराबाद आणि १३ जानेवारी २०२१ रोजी कॅम्प चौक येथे दंड झाला. कार मालकास मोबाइलवर ई-चालान झाल्याचा एसएमएस आला. त्याने लगेच सदर पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा आरोपीला सहजपणे शोधता आले असते; परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी