शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:07 IST

आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देगुंतवणुकीच्या नावावर फसवणुकीचा आरोप : कोतवाली ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.ताजे प्रकरण हे गणेशनगर तुकडोजी चौक येथील जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आहे. या सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे रा. रमना मारुती आहे तर मॅनेजर सुनीता पाल आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही पतसंस्था कार्यरत आहे. येथे फिक्स डिपॉझिट, डेली कलेक्शनसह ग्राहकांची बचत खातेही आहेत. फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना १२ टक्के तर इतर ग्राहकांना ११ टक्के व्याज दिले जात होते. गुंतवणूकदारांना पतसंस्थेशी जोडण्यासाठी एजंट नियुक्त करण्यात आले होते. त्यांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बोनससुद्धा दिला जात होता. पतसंस्थेच्या आकर्षक योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने या पतसंस्थेशी जुळले.सूत्रानुसार गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पतसंस्थेची स्थिती चांगली नाही. मेहरकुरे यांनी काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असे सांगितल्याने गुंतवणूकदारांनी याला गंभीरतेने घेतले नाही. जानेवारीमध्ये पतसंस्थेची परिस्थिती आणखीनच बिघडली. गुंतवणूकदारांना त्यांनी जमा केलेली रक्कम मिळणे बंद झाले. मेहरकुरे वेगवेगळी कारणे देऊ लागला. गुंतवणूकदार आपल्या पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावू लागले. दबाब टाकू लागले. तेव्हा थोडे दिवस थांबण्यास सांगण्यात आले. यादरम्यान अचानक पतसंस्थेचे गणेशनगर येथील कार्यालय बंद झाले. यामुळे गुंतवणूकदारंमध्ये खळबळ उडाली. म्हाळगीनगर आणि हुडकेश्वर येथील कार्यालयसुद्धा बंद करण्यात आले. तेव्हा पतसंस्थेत मोठी गडबड झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. ते मेहरकुरे आणि पाल यांच्याकडे चकरा मारू लागले. सुनीता यांनी आपण आजारी असल्याचे सांगत पतसंस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले तर मेहरकुरे हे बोलण्याचे टाळू लागले. दोन महिने चकरा लावल्यानंतर अखेरगुंतवणूकदारांनी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. तपासानंतर कारवाई करण्याचे सांगण्यात आले. तेव्हा गुंतवणूकदार संतापले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच विरोध दर्शविला.यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली.त्यांनी मेहरकुरे आणि पंतसंस्थेच्या एजंटला बोलावले. मेहरकुरे पोलिसांच्या हाती लागला नाही तर एजंटने पतसंस्था बंद असल्याने पैसे वितरित करण्यात आले नसल्याचे सांगितले. कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले यांनी लोकमतला सांगितले, १२ ते १५ लोकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची ५० ते ६० लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली आहे. तपासात इतर पीडितही समोर आल्यास ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.७० गुंतवणूकदार आले समोरसूत्रानुसार मंगळवारी एजंटसह ७० गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली. शासकीयस्तरावर फसवणुकीची रक्कम कोट्यवधी आहे. इतर शहरातील लोकांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ते अजूनपर्यंत समोर आलेले नाहीत. कोतवाली पोलीस या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. मेहरकुरे आणि त्याच्या साथीदाराची शिक्षा एजंटला मिळत आहे. गुंतवणूकदार त्यांना त्रास देत आहेत.आर्थिक शाखेचाही परिणाम नाहीशहरात पतसंस्थेद्वारा फसवणूक करण्यात आल्याच्या घटना नेहमीच होत असतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा गठित करण्यात आली आहे. त्यानंतरही असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे आर्थिक शाखेचा पाहिजे तसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक