शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जावई-मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लावला १०० कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:18 IST

Nagpur News अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनौ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटीने फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे.

ठळक मुद्देलाॅकडाऊन लागताच झाले गायब अगरबत्ती व्यवसायाच्या नावाने देशभरात फसवणूक

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनौ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटीने फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. पाॅश हाॅटेल्समध्ये सेमिनार आयाेजित करून या जाेडीने लाेकांना चुना लावला.

या फसवणुकीचा सूत्रधार गिरीशचंद्र गुप्ता व त्याचा मेव्हणा राजेशकुमार गुप्ता हाेय. दाेघांनी जीबीएस कंपनी सुरू करून अनिल सिबे संचालक, अजगर अलीला कंपनीचा प्रमाेटर व नागपूरचे राज शर्मा व प्रेम पुरके यांना एजंट म्हणून नियुक्त केले. ठगांनी शिताफीने अली, शर्मा व पुरके यांना समाेर केले. त्यांनी २०१९ मध्ये नागपूरच्या गुंतवणूकदारांशी संपर्क केला. त्यांना चर्चेसाठी मुंबईच्या पाॅश हाॅटेलमध्ये बाेलाविले. विमानाची तिकिटेही करून दिली. त्यानुसार वर्धेच्या सुनील जायसवाल यांच्यासह चार लाेक २६ मार्च राेजी मुंबईला गेले. अलीने जावई व मेव्हण्याच्या कंपनीला १० वर्षापासून ओळखत असल्याचे सांगितले. त्यांचा अगरबत्ती निर्मितीचा माेठा कारभार असून १०५०० रुपये गुंतवणूक केल्यास २०००० चा माल देण्यात येणार असल्याचे सांगितले. विक्री करण्याची इच्छा नसल्यास स्वत: कंपनी ते विकून १५००० रुपये परत करेल, असे आमिष दाखविले.

मुंबईमध्ये अलीने जायसवाल व साेबत्यांना नागपूरच्या एका महिलेशी ओळख करून दिली. त्या महिलेस ७० हजार रुपयाचा चेक देण्यात आला. कंपनीने दाेन महिन्यात दीडपट दिल्याचे त्या महिलेने सांगितले. जायसवालसह इतर १०-१२ लाेकांनी कंपनीमध्ये प्रत्येकी एक ते दाेन लाखांची गुंतवणूक केली. त्यांना दाेन महिन्यातच दीडपट रक्कम परत करण्यात आली. पुन्हा पैसा देण्याऐवजी गुंतवणूक करण्याचे आवाहन जावई-मेव्हण्याने केले. चार महिने नफा दिल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. मग पैसा परत करण्यास टाळाटाळ सुरू झाली. दरम्यान २२ मार्च २०२० राेजी जनता कर्फ्यू व २४ मार्चला लाॅकडाऊन लावण्यात आला. लाॅकडाऊन लागताच गुप्ता जाेडीने कंपनीची वेबसाईट बंद करून टाकली आणि दाेघेही पसार झाले. गिरीश गुप्ताने स्वत:च्या मृत्यूचा खाेटा व्हिडीओ बनविला. जाेडीला शाेधण्यासाठी पीडित लखनौपर्यंत गेले. तेथे त्याचे चार बंगले असल्याची बाब समजली. गुंतवणूकदार तेथे पाेहचताच दाेघांनी पळ काढला. या जाेडीने अलाहाबादमधल्या वकिलांचे ६.५० काेटी लंपास केले. याशिवाय लखनौ, कानपूर, मुंबईसह अनेक शहरात फसवणुकीचे सत्र चालवून अनेकांना लुटले.

नागपुरातून लुटले २० काेटी

आर्थिक गुन्हे शाखेने ६ जुलै राेजी ३.३३ काेटीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र नागपूर व आसपासच्या शहरातून २० काेटीहून अधिकची फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे. त्यातील २५० लाेकांची नावे समाेर आली असून फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पीडितांची स्थिती अतिशय वाईट

ठग जाेडीच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. काहींनी तर त्यांचे नातेवाईक व मित्रांनाही गुंतवणूक करायला भाग पाडले. आता ते मित्र व नातेवाईक पैशासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्यासारखी स्थिती आल्याचे सांगितले आहे. पीडितांनी पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यावर पाेलीस कारवाईसाठी तत्पर झाले.

टॅग्स :fraudधोकेबाजी