शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 10:52 IST

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची माैनीबाबांची भूमिका

नरेश डोंगरे - कमल शर्मा

नागपूर : लॉयडस् अर्थात उत्तम गलवा कंपनीच्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या प्रदूषणाचा त्रास वाढत असला आणि नागरिकांच्याही तक्रारी असल्या तरी प्रशासन मात्र आंधळे बनल्यासारखे वागत आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर परिणाम दिसले तर त्याला जबाबदार उत्तम गलवाच असणार आहे.

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कंपनीशी साटेलोटे असल्याने अनेक अधिकारी खुलून बोलत नाहीत. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.

कंपनीने आपले पाप झाकण्यासाठी आणि कोट्यवधींची मलाई लाटण्यासाठी अनेकांची तोंडं बंद केलीत. त्यामुळे प्रदूषणाच्या रुपातून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ संबंधित यंत्रणांना दिसत असूनही बहुतांश मंडळी तोंडावर बोट ठेवून बसली आहे. त्यामुळेच काळे थर असलेल्या विहिरी बघायला अधिकारी तयार नाहीत.

विहिरी, हातपंपांमधून दूषित पाणी येऊनही त्याबाबत कुणी कंपनीला जाब विचारायला तयार नाहीत. नाईलाजाने हेच आरोग्यास घातक पाणी गावकऱ्यांना प्यावे लागत आहे. स्वयंपाकासाठी आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरावे लागत असल्याचे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

तेच पाणी, त्याच भाज्या ?

या दूषित पाण्यावर शेतमाल आणि भाजीपाला पिकवला जातो. लोहयुक्त पाण्याचे सत्व यात उमटत असले तरी जनतेला पर्याय नाही.

बेबंदशाही टोकाला

शेतजमीन धोक्यात आणून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, विषारी धूर ओकून प्रदूषण निर्माण करतानाच जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आणि बेरोजगारांवर सूड उगविणाऱ्या लॉयडस् -उत्तम गलवा कंपनीची बेबंदशाही टोकाला पोहचली आहे. कोट्यवधी रुपयांचा नफा ओरबाडून घेणाऱ्या या कंपनीच्या पापाची लक्तरे ‘लोकमत’ने वेशीवर टांगल्याने जनतेच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. वारंवार मागण्या, निवेदने यांना केराच्या टोपल्या दाखविल्या जात आहे. चापलुसी करणाऱ्या लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना ताटाखालचे मांजर बनवून कामगारांच्या तसेच त्यांच्यासाठी लढू पाहणाऱ्या नेत्यांचा आवाजही या कंपनीने चिरडला आहे.

जनआंदोलन भडकणार

लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केल्यामुळे आपला आवाज बुलंद केल्याची भावना जनतेची झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या विरोधात जोरदार जनआंदोलन चालविण्याचा निर्णय विविध संघटना आणि युवक नेत्यांनी घेतला आहे.

... तरीही शेती फुलविण्याचे प्रयत्न

जमीन आणि पिकाची अवस्था वाईट असताना शेतजमीन पडीक ठेवणे परवडणारे नाही. जमीन वाहिली नाही तर ती पडीक होण्याचा धोका असल्याने दोन्हीकडची कोंडी पचवत शक्य तेवढे काबाडकष्ट करून शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीenvironmentपर्यावरण