शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 10:52 IST

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची माैनीबाबांची भूमिका

नरेश डोंगरे - कमल शर्मा

नागपूर : लॉयडस् अर्थात उत्तम गलवा कंपनीच्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या प्रदूषणाचा त्रास वाढत असला आणि नागरिकांच्याही तक्रारी असल्या तरी प्रशासन मात्र आंधळे बनल्यासारखे वागत आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर परिणाम दिसले तर त्याला जबाबदार उत्तम गलवाच असणार आहे.

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कंपनीशी साटेलोटे असल्याने अनेक अधिकारी खुलून बोलत नाहीत. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.

कंपनीने आपले पाप झाकण्यासाठी आणि कोट्यवधींची मलाई लाटण्यासाठी अनेकांची तोंडं बंद केलीत. त्यामुळे प्रदूषणाच्या रुपातून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ संबंधित यंत्रणांना दिसत असूनही बहुतांश मंडळी तोंडावर बोट ठेवून बसली आहे. त्यामुळेच काळे थर असलेल्या विहिरी बघायला अधिकारी तयार नाहीत.

विहिरी, हातपंपांमधून दूषित पाणी येऊनही त्याबाबत कुणी कंपनीला जाब विचारायला तयार नाहीत. नाईलाजाने हेच आरोग्यास घातक पाणी गावकऱ्यांना प्यावे लागत आहे. स्वयंपाकासाठी आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरावे लागत असल्याचे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

तेच पाणी, त्याच भाज्या ?

या दूषित पाण्यावर शेतमाल आणि भाजीपाला पिकवला जातो. लोहयुक्त पाण्याचे सत्व यात उमटत असले तरी जनतेला पर्याय नाही.

बेबंदशाही टोकाला

शेतजमीन धोक्यात आणून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, विषारी धूर ओकून प्रदूषण निर्माण करतानाच जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आणि बेरोजगारांवर सूड उगविणाऱ्या लॉयडस् -उत्तम गलवा कंपनीची बेबंदशाही टोकाला पोहचली आहे. कोट्यवधी रुपयांचा नफा ओरबाडून घेणाऱ्या या कंपनीच्या पापाची लक्तरे ‘लोकमत’ने वेशीवर टांगल्याने जनतेच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. वारंवार मागण्या, निवेदने यांना केराच्या टोपल्या दाखविल्या जात आहे. चापलुसी करणाऱ्या लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना ताटाखालचे मांजर बनवून कामगारांच्या तसेच त्यांच्यासाठी लढू पाहणाऱ्या नेत्यांचा आवाजही या कंपनीने चिरडला आहे.

जनआंदोलन भडकणार

लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केल्यामुळे आपला आवाज बुलंद केल्याची भावना जनतेची झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या विरोधात जोरदार जनआंदोलन चालविण्याचा निर्णय विविध संघटना आणि युवक नेत्यांनी घेतला आहे.

... तरीही शेती फुलविण्याचे प्रयत्न

जमीन आणि पिकाची अवस्था वाईट असताना शेतजमीन पडीक ठेवणे परवडणारे नाही. जमीन वाहिली नाही तर ती पडीक होण्याचा धोका असल्याने दोन्हीकडची कोंडी पचवत शक्य तेवढे काबाडकष्ट करून शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीenvironmentपर्यावरण