शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 10:52 IST

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची माैनीबाबांची भूमिका

नरेश डोंगरे - कमल शर्मा

नागपूर : लॉयडस् अर्थात उत्तम गलवा कंपनीच्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या प्रदूषणाचा त्रास वाढत असला आणि नागरिकांच्याही तक्रारी असल्या तरी प्रशासन मात्र आंधळे बनल्यासारखे वागत आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर परिणाम दिसले तर त्याला जबाबदार उत्तम गलवाच असणार आहे.

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कंपनीशी साटेलोटे असल्याने अनेक अधिकारी खुलून बोलत नाहीत. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.

कंपनीने आपले पाप झाकण्यासाठी आणि कोट्यवधींची मलाई लाटण्यासाठी अनेकांची तोंडं बंद केलीत. त्यामुळे प्रदूषणाच्या रुपातून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ संबंधित यंत्रणांना दिसत असूनही बहुतांश मंडळी तोंडावर बोट ठेवून बसली आहे. त्यामुळेच काळे थर असलेल्या विहिरी बघायला अधिकारी तयार नाहीत.

विहिरी, हातपंपांमधून दूषित पाणी येऊनही त्याबाबत कुणी कंपनीला जाब विचारायला तयार नाहीत. नाईलाजाने हेच आरोग्यास घातक पाणी गावकऱ्यांना प्यावे लागत आहे. स्वयंपाकासाठी आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरावे लागत असल्याचे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

तेच पाणी, त्याच भाज्या ?

या दूषित पाण्यावर शेतमाल आणि भाजीपाला पिकवला जातो. लोहयुक्त पाण्याचे सत्व यात उमटत असले तरी जनतेला पर्याय नाही.

बेबंदशाही टोकाला

शेतजमीन धोक्यात आणून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, विषारी धूर ओकून प्रदूषण निर्माण करतानाच जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आणि बेरोजगारांवर सूड उगविणाऱ्या लॉयडस् -उत्तम गलवा कंपनीची बेबंदशाही टोकाला पोहचली आहे. कोट्यवधी रुपयांचा नफा ओरबाडून घेणाऱ्या या कंपनीच्या पापाची लक्तरे ‘लोकमत’ने वेशीवर टांगल्याने जनतेच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. वारंवार मागण्या, निवेदने यांना केराच्या टोपल्या दाखविल्या जात आहे. चापलुसी करणाऱ्या लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना ताटाखालचे मांजर बनवून कामगारांच्या तसेच त्यांच्यासाठी लढू पाहणाऱ्या नेत्यांचा आवाजही या कंपनीने चिरडला आहे.

जनआंदोलन भडकणार

लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केल्यामुळे आपला आवाज बुलंद केल्याची भावना जनतेची झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या विरोधात जोरदार जनआंदोलन चालविण्याचा निर्णय विविध संघटना आणि युवक नेत्यांनी घेतला आहे.

... तरीही शेती फुलविण्याचे प्रयत्न

जमीन आणि पिकाची अवस्था वाईट असताना शेतजमीन पडीक ठेवणे परवडणारे नाही. जमीन वाहिली नाही तर ती पडीक होण्याचा धोका असल्याने दोन्हीकडची कोंडी पचवत शक्य तेवढे काबाडकष्ट करून शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीenvironmentपर्यावरण