शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. हरिभाऊ केदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 7:19 PM

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. हरिभाऊ केदार यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील ता. चिखली येथील गुंजाळा येथे शेतकरी कुटुंबात २९ मे १९३५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बुलडाणा जिल्ह्यात, तर पदवीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाले आणि नागपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. त्यानंतर नागपूर नागरी शिक्षण मंडळाच्या शाळेत काही वर्षे शिक्षकी नोकरी गेली आणि पुढे ते ईश्वरबाबू शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक झाले.

१९६० ते १९९५ पर्यंत ते याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दीर्घकाळ सेवेत राहिले. क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयात त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. शारीरिक शिक्षणाच्या उच्च शिक्षणासाठी काही वर्षे ते डेन्मार्क व नार्वे येथे राहिले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कारही प्राप्त झाला. भारतीय स्काऊटचे मानद आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

१९८९ ते ९० या काळात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दोन वेळा पदभार सांभाळला. काही काळ ते नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष होते. ते नागपूर काँग्रेसचे काही काळ अध्यक्षही होते. ते नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातही सक्रिय राहिले आणि काही वर्षे ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. डॉ. हरिभाऊ केदार यांचा गांधी-आंबेडकर विचारांवर प्रचंड विश्वास होता. नागपुरातील सर्वच पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींना त्यांचा भक्कम आधार होता. त्यांची विवेकनिष्ठा आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होती. ते आपल्या सामाजिक व वैचारिक बांधीलकीपासून कधीही परावृत्त झाले नाहीत.

मूलतत्त्ववाद आणि कट्टर धार्मिकतेला त्यांनी प्राणपणापासून विरोध केला. नागपुरातील दक्षिणायन चळवळीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात महात्मा गांधी यांचा पुतळा हटविल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते पुढे आले. संविधान चौकात झालेल्या अनेक सभांमध्ये त्यांनी हजेरी लावली. याच वर्षी ७ फेब्रुवारीला त्यांच्या ‘स्नेहबंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते.

..............

टॅग्स :Deathमृत्यू