शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 20:22 IST

Nagpur News सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा मिळाली असती तर वेदांचे ज्ञान पूर्णत: संग्रहित झाले असते. मात्र, असे न झाल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर पडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ठळक मुद्दे वेदांना नाकारणे हा अतिवादीपणाच

 

नागपूर : वेद आपल्या परंपरेतील मौलिक ठेवा असून, त्यात भौतिक व आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार आहे. वस्तुत: हे ज्ञान सुरुवातीपासूनच सर्वांसाठी वाटायला हवे होते. मात्र, या ज्ञानाची सूत्रे मर्यादित वर्गाच्या हातात होती. त्यांच्या हाती आले तेवढे ज्ञान वाचले. जर तेव्हाच सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा मिळाली असती तर वेदांचे ज्ञान पूर्णत: संग्रहित झाले असते. मात्र, असे न झाल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर पडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. धात्रे नम: ट्रस्टतर्फे आयोजित ‘वेदिक फिलॉसॉफिकल रेमिडिज’ या पुस्तक प्रकाशनादरम्यान ते गुरुवारी बोलत होते.

अहल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, लेखक डॉ. चेन्ना केशव शास्त्री प्रामुख्याने उपस्थित होते. जे मुळात वैज्ञानिक आहेत, त्यांना विज्ञानापलीकडेदेखील जगात खूप काही आहे याची जाणी आहे. काही लोक वेदांना नाकारतात, तर काही विज्ञानाला नाकारतात. मात्र, हे दोन्ही अतिवादी प्रयोग आहेत. असे केल्याने असंतुलन निर्माण होते व त्यातून विकृती निर्माण होते. याचे परिणाम समाजासाठी घातक असतात. आपल्या परंपरेतील ज्ञानाचे अंश अतिवादीपणामुळे नाकारले गेले. आपणदेखील त्यांना मान्य केले. त्यामुळे बरेचसे पारंपरिक ज्ञान लुप्त झाले. परकीय शक्तींना याचा फायदा घेतला व आपल्या मनात आपल्याच ज्ञानाबाबत न्यूनगंड निर्माण झाला, असे सरसंघचालक म्हणाले.

शेकडो वर्षांच्या परंपरा नाकारू शकत नाही

विज्ञान व अध्यात्म हे परस्परविरोधी आहे हा अतिवादी दृष्टिकोन अयोग्य आहे. या दोन्ही बाब परस्परपूरक असू शकतात. विज्ञानातून या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वेदांमधील वर्णनातून ड्राय सेलची निर्मिती

आपले वेद ज्ञानाचे भंडार आहेत. आत्मसाक्षात्कारापासून ते अगदी शिल्पकलेपर्यंतची सूत्रे त्यात आहे. वेदिक गणित आज जगातील मोठ्या विद्यापीठांमध्ये शिकविले जात आहे. विज्ञान भारतीच्या काही संशोधकांनी वेदांमधील वर्णनातून ड्राय सेल तयार केले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.आजचे जग ज्या भाषेत समजते, त्या भाषेत ती मांडायला हवी.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत