शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

दहापट कमाई विसरून झालो न्यायमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:38 IST

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद स्वीकारले त्यावेळी मासिक वेतन केवळ आठ हजार रुपये होते. त्या काळात वकिली व्यवसायातून या वेतनाच्या दहापट कमाई करीत होतो. असे असताना न्यायमूर्ती झालो, पण त्या निर्णयाचा आयुष्यात कधीच पश्चाताप वाटला नाही. उलट हे सर्वोच्च पद भूषवून मनाला शांतीच लाभली, असे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी सोमवारी प्रकट मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले.

ठळक मुद्देविकास सिरपूरकर यांची प्रकट मुलाखत : सर्वोच्च पद भूषवून मनाला लाभली शांती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद स्वीकारले त्यावेळी मासिक वेतन केवळ आठ हजार रुपये होते. त्या काळात वकिली व्यवसायातून या वेतनाच्या दहापट कमाई करीत होतो. असे असताना न्यायमूर्ती झालो, पण त्या निर्णयाचा आयुष्यात कधीच पश्चाताप वाटला नाही. उलट हे सर्वोच्च पद भूषवून मनाला शांतीच लाभली, असे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी सोमवारी प्रकट मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ‘असा मी घडलो’ या शीर्षकाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात ही मुलाखत घेण्यात आली. दरम्यान, सिरपूरकर यांनी त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला. सिरपूरकर यांची १९९२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. १९९७ मध्ये त्यांची मद्रास उच्च न्यायालयात बदली झाली. २००४ मध्ये त्यांना उत्तरांचल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी कार्य केले. २००७ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. तेथून ते २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची न्यायमूर्तीपदावरील कारकीर्द यशस्वी राहिली. त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकरणांवर प्रभावशाली निर्णय दिले. कलकत्ता येथील कालीमाता मंदिरामध्ये त्यांच्या निर्णयामुळे शिस्त लागली. काही लोकांच्या तीव्र विरोधामुळे ते प्रकरण बरेच गाजले होते.विविध न्यायालयांत कार्य करण्याचा अनुभव असलेले सिरपूरकर यांनी नागपुरातील वकिलांच्या गुणवत्तेचा गौरव केला. असे अभ्यासू वकील कुठेच आढळून आले नाहीत, असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्तींच्या कार्यकुशलतेमध्ये मुंबई उच्च न्यायालय तर, न्यायिक कर्मचाऱ्यांच्या सेवावृत्तीमध्ये मद्रास उच्च न्यायालय चांगले असल्याची माहिती त्यांनी दिली.वकील म्हणून यशस्वी होण्यात आई-वडील, अ‍ॅड. सखाराम खेर्डेकर, अ‍ॅड. सरंजामे, बॅरि. बाबासाहेब फडके, वरिष्ठ अधिवक्ता अरविंद बोबडे, वरिष्ठ अधिवक्ता बाबासाहेब मनोहर, वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे व मित्रांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांकडून काही ना काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा वकिली करताना झाला. परंतु, पहिले गुरू आई-वडीलच होते असे सिरपूरकर यांनी सांगितले. अ‍ॅड. गौरी वेंकटरामन यांनी त्यांची मुलाखत घेतली. व्यासपीठावर वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गोरडे व संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.लॉयर बाय चॉईसआई-वडील दोघेही वकील असले तरी त्यांनी आपल्यावर वकील होण्याचा दबाव कधीच आणला नाही. आठवीमध्ये शिकत असताना वकील होण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार पुढील मार्गक्रमण केले, अशी माहिती सिरपूरकर यांनी दिली.कोर्टातच केले प्रपोजपत्नीला कोर्टातच लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर तिने उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा वेळ घेतला होता. ती आई-वडिलांच्या संमतीनेच लग्न करणार होती. त्यामुळे होकाराची प्रतीक्षा करावी लागली होती, असे सिरपूरकर यांनी सांगितले.पहिली केस हरलोउच्च न्यायालयातील पहिली केस हरलो होतो. ती दिवाणी पुनर्विचार याचिका होती. त्या केसकरिता २५ रुपये फी मिळाली होती. ती केस आजही विसरलो नाही, असा पहिल्या प्रकरणाचा अनुभव सिरपूरकर यांनी सांगितला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर