शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यांमुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 21:52 IST

Forests fire जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आणि पक्ष्यांचे नुकसान होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आणि पक्ष्यांचे नुकसान होते. वनस्पतीही नष्ट होतात. मात्र दरवर्षी घडणाऱ्या या घटना टाळण्यात वनविभागाला यश आलेले नाही.

उन्हाळ्याच्या तोंडावरच जंगलांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. या काळात तेंदूपत्ता हंगाम सुरू होतो. त्यामुळे कचरा जाळण्यासाठी ठेकेदारांकइून मुद्दाम आगी लावल्या जातात, असा आरोप फार पूर्वीपासून होत आहे. अशा घटना घडल्यावर केवळ गुन्हे दाखल होतात, आरोपी सापडतच नाही. यामुळे वन विभागाचा वचक नसल्यासारखी काही ठिकाणी स्थिती असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडृन होत आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळ, प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव अभयारण्य अशा तीन प्रकारच्या जंगलात वनांची विभागणी होत असली तरी समस्या सर्व ठिकाणी सारख्याच आहेत. या वर्षी जाळ रेषा नियंत्रणासाठी निधी विलंबाने आला. त्याचाही परिणाम कामावर झाला आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर मोहाफुले वेचण्याचा हंगाम सुरू होतो. या वन उपजातून उत्पन्न मिळत असल्याने कुटूंबेच्या कुटूंबे या कामी असतात. तेंदुपत्ता तोडाईसाठी कोवळ्या पानांची गरज असते. आगीनंतर नवी पालवी फुटते. यानंतर झाडावर येणारी कोवळी पाने बिडी तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याने तेंदूपत्ता ठेकेदारांकडूनच आगींचे प्रकार घडत असल्याचे अनेकदा सांगितले जाते.

वीज वाहिन्यांचे स्पार्किंग

जंगलामधून जाणाऱ्या ११ केव्हीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळेही आगी लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपुरातील अंबाझरी लगतच्या जंगलामध्ये मागील वर्षी दोन वेळा आगीच्या घटना घडल्या होत्या. अलिकडे जानेवारी महिन्यातही या जंगलाला विद्यापीठाच्या मागील बाजूने आग लागली होती. ती पसरत जाऊन जंगलात पोहचल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले होते.

ज्या जंगलात आगी लागतात, तेथील अधिकाऱ्यांना आगीच्या घटनांसाठी जबाबदार धरले जावे. जाळ रेषा आखताना होणाऱ्या दुर्लक्षामुळेही आग रोखली जाऊ शकत नाही. यातील तांत्रिकता तपासली जावी. वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगसारख्या घटनांचीही वन विभागाने दखल घ्यावी.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.

टॅग्स :forestजंगलfireआगwildlifeवन्यजीव