शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

वणव्यांमुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 21:52 IST

Forests fire जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आणि पक्ष्यांचे नुकसान होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आणि पक्ष्यांचे नुकसान होते. वनस्पतीही नष्ट होतात. मात्र दरवर्षी घडणाऱ्या या घटना टाळण्यात वनविभागाला यश आलेले नाही.

उन्हाळ्याच्या तोंडावरच जंगलांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. या काळात तेंदूपत्ता हंगाम सुरू होतो. त्यामुळे कचरा जाळण्यासाठी ठेकेदारांकइून मुद्दाम आगी लावल्या जातात, असा आरोप फार पूर्वीपासून होत आहे. अशा घटना घडल्यावर केवळ गुन्हे दाखल होतात, आरोपी सापडतच नाही. यामुळे वन विभागाचा वचक नसल्यासारखी काही ठिकाणी स्थिती असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडृन होत आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळ, प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव अभयारण्य अशा तीन प्रकारच्या जंगलात वनांची विभागणी होत असली तरी समस्या सर्व ठिकाणी सारख्याच आहेत. या वर्षी जाळ रेषा नियंत्रणासाठी निधी विलंबाने आला. त्याचाही परिणाम कामावर झाला आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर मोहाफुले वेचण्याचा हंगाम सुरू होतो. या वन उपजातून उत्पन्न मिळत असल्याने कुटूंबेच्या कुटूंबे या कामी असतात. तेंदुपत्ता तोडाईसाठी कोवळ्या पानांची गरज असते. आगीनंतर नवी पालवी फुटते. यानंतर झाडावर येणारी कोवळी पाने बिडी तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याने तेंदूपत्ता ठेकेदारांकडूनच आगींचे प्रकार घडत असल्याचे अनेकदा सांगितले जाते.

वीज वाहिन्यांचे स्पार्किंग

जंगलामधून जाणाऱ्या ११ केव्हीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळेही आगी लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपुरातील अंबाझरी लगतच्या जंगलामध्ये मागील वर्षी दोन वेळा आगीच्या घटना घडल्या होत्या. अलिकडे जानेवारी महिन्यातही या जंगलाला विद्यापीठाच्या मागील बाजूने आग लागली होती. ती पसरत जाऊन जंगलात पोहचल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले होते.

ज्या जंगलात आगी लागतात, तेथील अधिकाऱ्यांना आगीच्या घटनांसाठी जबाबदार धरले जावे. जाळ रेषा आखताना होणाऱ्या दुर्लक्षामुळेही आग रोखली जाऊ शकत नाही. यातील तांत्रिकता तपासली जावी. वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगसारख्या घटनांचीही वन विभागाने दखल घ्यावी.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.

टॅग्स :forestजंगलfireआगwildlifeवन्यजीव