शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

परराष्ट्र धोरणात राष्ट्रहिताशी तडजोड नाही : सुषमा स्वराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:19 IST

हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देराष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या शिल्पाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले. 

राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या चाळिसाव्या स्मृतिप्रीत्यर्थ रामनगर येथील श्रीशक्तिपीठ येथे नूतनीकृत शिल्पाच्या लोकार्पणप्रसंगी सुषमा स्वराज बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का,कार्यवाहिका स्मिता केळकर व अध्यक्षा डॉ. गरिमा सप्रे आदी उपस्थित होत्या. 
युनोतील १९१ देशांपैकी अनेक देशांचे आपसात पटत नाही. अमेरिका-रशिया, सौदी अरब-इराण यांच्यात वाद आहेत. परंतु भारताने जागतिक संबंधांच्या संतुलनाचे प्रयोग केले; म्हणूनच आपसात पटत नसलेल्या अनेक देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत. परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक केली जाते. चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून विदेशात नेले जाते. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळत नाही. त्यांना विदेशातून परतही येता येत नाही. एनडीए सरकारच्या काळात अशी फसवणूक झालेल्या २ लाख २ हजार ६६६ लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. 
मावशी केळकर यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न होते. त्यानुसार पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’,पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना हाती घेतल्या आहेत. महिला सशक्त झाली तर देश सशक्त होईल. या हेतूने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी लघु व मध्यम उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध केली जाते. यात तीन टक्के महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेला माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुलींचा जन्मदर वाढल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी यावेळी केला. 
शांतक्का म्हणाल्या, मावशी केळकर यांच्या प्रेरणेतून श्रीशक्तिपीठाचे कार्य सुरू आहे. शिल्पाच्या माध्यमातून यापुढेही प्रेरणा मिळणार आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन मेघा नांदेकर यांनी केले. यावेळी श्रीशक्तिपीठाच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजnagpurनागपूर