शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र धोरणात राष्ट्रहिताशी तडजोड नाही : सुषमा स्वराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:19 IST

हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देराष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या शिल्पाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले. 

राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या चाळिसाव्या स्मृतिप्रीत्यर्थ रामनगर येथील श्रीशक्तिपीठ येथे नूतनीकृत शिल्पाच्या लोकार्पणप्रसंगी सुषमा स्वराज बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का,कार्यवाहिका स्मिता केळकर व अध्यक्षा डॉ. गरिमा सप्रे आदी उपस्थित होत्या. 
युनोतील १९१ देशांपैकी अनेक देशांचे आपसात पटत नाही. अमेरिका-रशिया, सौदी अरब-इराण यांच्यात वाद आहेत. परंतु भारताने जागतिक संबंधांच्या संतुलनाचे प्रयोग केले; म्हणूनच आपसात पटत नसलेल्या अनेक देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत. परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक केली जाते. चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून विदेशात नेले जाते. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळत नाही. त्यांना विदेशातून परतही येता येत नाही. एनडीए सरकारच्या काळात अशी फसवणूक झालेल्या २ लाख २ हजार ६६६ लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. 
मावशी केळकर यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न होते. त्यानुसार पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’,पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना हाती घेतल्या आहेत. महिला सशक्त झाली तर देश सशक्त होईल. या हेतूने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी लघु व मध्यम उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध केली जाते. यात तीन टक्के महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेला माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुलींचा जन्मदर वाढल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी यावेळी केला. 
शांतक्का म्हणाल्या, मावशी केळकर यांच्या प्रेरणेतून श्रीशक्तिपीठाचे कार्य सुरू आहे. शिल्पाच्या माध्यमातून यापुढेही प्रेरणा मिळणार आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन मेघा नांदेकर यांनी केले. यावेळी श्रीशक्तिपीठाच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजnagpurनागपूर