शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर...

By नरेश डोंगरे | Updated: June 22, 2024 20:19 IST

कंपनीत मानवी मुल्य अन् किमान वेतन कायद्याच्याही चिंधड्या...

नरेश डोंगरे -

''पेट की आग किस तरह मजबूर कर देती है...माैत सामने खडी है, दिखाकर उसको भी नजरअंदाज करवा देती है'' !

पोटाची आग विझविण्यासाठी व्यक्ती ईतका विवश असतो की मृत्यू समोर दिसत असूनही तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कुण्या एका कवीने उपरोक्त ओळीतून भुकेमागे जगण्या-मरण्याच्या दरम्यानचा संघर्ष स्पष्ट केला आहे. नागपूर जिल्ह्यातील धामना लिंगा गावातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शोकविव्हळ कुटुंबियांनी मृतांची अकरावी, तेरवी करण्याची तयारी चालविली आहे. आक्रोशही सुरूच आहे अन् आक्रोशातून मृतकांच्या आठवणी तसेच खंतही ते व्यक्त करीत आहेत.

१३ जून २०२४ ला तेथे झालेल्या भीषण स्फोटात तब्बल ९ जणांचा बळी गेला. या स्फोटाच्या घटनेची पार्श्वभूमी आता तपास यंत्रणा तपासत आहेत. कशामुळे ही घटना घडली, कोण दोषी त्याचा अहवाल तपास करणारी मंडळी सादर करेल. तिकडे ज्या गावांतील कुटुंबांनी जीव गमावले त्या कुटुंबातील सदस्य राहून राहून हंबरडा फोडत आहे, आक्रोश करत आहेत. या आक्रोशातून पुढे आलेले वास्तव अत्यंत जळजळीत आहे. मृत्यू म्हटला की भल्या-भल्याच्या काळजात चर्रर होते. शेकडो कोटी रुपये देऊ केले तरी कुणी मृत्यूच्या जबड्यात जाण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. कारण जीव अमुल्य असतो. त्याचे मोल ठरविता येत नाही, हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, धामन्याच्या कंपनीत जीव गमावणाऱ्या प्रांजली किसन मोंदरे (२२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्राची श्रीकांत फलके (१९), मोनाली शंकरराव अलोने (२५), शीतल आशिष चटप (३०) श्रद्धा वनराज पाटील (२२ सर्व रा. धामना), पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी), प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) आणि दानसा मरसकोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश) हे बहाद्दर केवळ काही रुपयांसाठी रोज चक्क आठ तास काळाच्या जबड्यात शिरून मृत्यूशी लपवाछपवी करीत होते. आपण जे काम करतो, ते प्रचंड धोक्याचे आहे, तेथे काही झाले तर भयंकर परिणाम होऊ शकतो, याची त्यांना कल्पना होती. मात्र, घरातील परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे आणि स्वत:सोबत कुटुंबातील सदस्यांच्या पोटातील आग विझवायची असल्यामुळे हे सर्वच्या सर्व जण तो धोका पत्करत होते. केवळ २०० ते २५० रुपयांच्या बदल्यात ते रोज तब्बल ८ तास मृत्यशी दोन हात करीत होते. मृत्यूला आजुबाजुला नव्हे तर चक्क हातात खेळवत होते. अखेर ज्याची भीती होती तेच झाले अन् काळाने डाव साधला. त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून हिरावून नेले.

मानवी मुल्यांचे हननया कंपनी प्रशसानाच्या असंवेदनशिलतेचे अनेक संतापजनक पैलू आता तपास करणाऱ्यांच्या नजरेस आले आहेत. येथे मानवी मुल्य पायदळी तुडविले जात होते, तेसुद्धा स्पष्ट झाले होते. धोक्याच्या ठिकाणी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मोबदला द्यावा, एवढेही भान कंपनी प्रशासनाने ठेवले नव्हते. मृतांच्या 'रोजीरोटीचे'मागचे हे धक्कादायक वास्तव सर्वसामान्यांनाच नव्हे तर तपास करणाऱ्यांपैकीही अनेकांना हलवून सोडणारे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEmployeeकर्मचारीBlastस्फोटDeathमृत्यू