शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर...

By नरेश डोंगरे | Updated: June 22, 2024 20:19 IST

कंपनीत मानवी मुल्य अन् किमान वेतन कायद्याच्याही चिंधड्या...

नरेश डोंगरे -

''पेट की आग किस तरह मजबूर कर देती है...माैत सामने खडी है, दिखाकर उसको भी नजरअंदाज करवा देती है'' !

पोटाची आग विझविण्यासाठी व्यक्ती ईतका विवश असतो की मृत्यू समोर दिसत असूनही तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कुण्या एका कवीने उपरोक्त ओळीतून भुकेमागे जगण्या-मरण्याच्या दरम्यानचा संघर्ष स्पष्ट केला आहे. नागपूर जिल्ह्यातील धामना लिंगा गावातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शोकविव्हळ कुटुंबियांनी मृतांची अकरावी, तेरवी करण्याची तयारी चालविली आहे. आक्रोशही सुरूच आहे अन् आक्रोशातून मृतकांच्या आठवणी तसेच खंतही ते व्यक्त करीत आहेत.

१३ जून २०२४ ला तेथे झालेल्या भीषण स्फोटात तब्बल ९ जणांचा बळी गेला. या स्फोटाच्या घटनेची पार्श्वभूमी आता तपास यंत्रणा तपासत आहेत. कशामुळे ही घटना घडली, कोण दोषी त्याचा अहवाल तपास करणारी मंडळी सादर करेल. तिकडे ज्या गावांतील कुटुंबांनी जीव गमावले त्या कुटुंबातील सदस्य राहून राहून हंबरडा फोडत आहे, आक्रोश करत आहेत. या आक्रोशातून पुढे आलेले वास्तव अत्यंत जळजळीत आहे. मृत्यू म्हटला की भल्या-भल्याच्या काळजात चर्रर होते. शेकडो कोटी रुपये देऊ केले तरी कुणी मृत्यूच्या जबड्यात जाण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. कारण जीव अमुल्य असतो. त्याचे मोल ठरविता येत नाही, हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, धामन्याच्या कंपनीत जीव गमावणाऱ्या प्रांजली किसन मोंदरे (२२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्राची श्रीकांत फलके (१९), मोनाली शंकरराव अलोने (२५), शीतल आशिष चटप (३०) श्रद्धा वनराज पाटील (२२ सर्व रा. धामना), पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी), प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) आणि दानसा मरसकोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश) हे बहाद्दर केवळ काही रुपयांसाठी रोज चक्क आठ तास काळाच्या जबड्यात शिरून मृत्यूशी लपवाछपवी करीत होते. आपण जे काम करतो, ते प्रचंड धोक्याचे आहे, तेथे काही झाले तर भयंकर परिणाम होऊ शकतो, याची त्यांना कल्पना होती. मात्र, घरातील परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे आणि स्वत:सोबत कुटुंबातील सदस्यांच्या पोटातील आग विझवायची असल्यामुळे हे सर्वच्या सर्व जण तो धोका पत्करत होते. केवळ २०० ते २५० रुपयांच्या बदल्यात ते रोज तब्बल ८ तास मृत्यशी दोन हात करीत होते. मृत्यूला आजुबाजुला नव्हे तर चक्क हातात खेळवत होते. अखेर ज्याची भीती होती तेच झाले अन् काळाने डाव साधला. त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून हिरावून नेले.

मानवी मुल्यांचे हननया कंपनी प्रशसानाच्या असंवेदनशिलतेचे अनेक संतापजनक पैलू आता तपास करणाऱ्यांच्या नजरेस आले आहेत. येथे मानवी मुल्य पायदळी तुडविले जात होते, तेसुद्धा स्पष्ट झाले होते. धोक्याच्या ठिकाणी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मोबदला द्यावा, एवढेही भान कंपनी प्रशासनाने ठेवले नव्हते. मृतांच्या 'रोजीरोटीचे'मागचे हे धक्कादायक वास्तव सर्वसामान्यांनाच नव्हे तर तपास करणाऱ्यांपैकीही अनेकांना हलवून सोडणारे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEmployeeकर्मचारीBlastस्फोटDeathमृत्यू