शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या, अनिल देशमुख यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: May 24, 2024 19:22 IST

राज्यात मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील तलावामध्ये सध्याच्या परिस्थीतीमध्ये केवळ ८ ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

नागपूर : राज्यात मोठया प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व चारा टंचाई निर्माण झाली आहे. परंतु लोकसभेची आचारसंहीता असल्याने प्रशासनाला काम करता येत नाही. यामुळे राज्य सरकारने आचारसंहीता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची चिंता न करता राज्यातील पाणी टंचाईसह इतर महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

राज्यात मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील तलावामध्ये सध्याच्या परिस्थीतीमध्ये केवळ ८ ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक तलावाने तळ गाठला असुन केवळ मृतसाठा हा शिल्लक राहला आहे. पिण्याच्या पाणीच नाही तर फळबागांना सुध्दा टँकरने पाणी देण्यात येत आहे. राज्यात जेव्हा आमचे सरकार होते त्यावेळी फळबागांसाठी जर टँकरने पाणी देण्याची वेळ आली तर त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातुन अनुदान देण्यात येत होते. तसेच अनुदान आता सुध्दा देण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

राज्यात पाणी टंचाईसोबतच चारा टंचाईचा प्रश्न सुध्दा निर्माण झाला आहे. यामुळे गोपालक सुध्दा अडचणीत सापडले आहे. अश्या परिस्थीतीमध्ये चारा छावण्या सुरु करण्याची सुध्दा मागणी मोठया प्रमाणात होत आहे. पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असली तरी लोकसभेची आचारसंहीता सुरु असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणुक प्रक्रिया ही पुर्ण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने आचारसंहीता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

पालकमंत्री गंभीर नाहीत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी नगर येथे मराठवाडाच्या पाणी टंचाईची आढावा बैठक ठेवली होती. यात पाच पालकमंत्री हे गैरहजर होते. यावरुन हे सरकार सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर गंभीर नाही हे दिसुन येते, अशी टीकाही देशमुख यांनी केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखwater scarcityपाणी टंचाई