शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन वाढीसाठी स्वदेशीवर भर

By admin | Updated: December 6, 2014 02:45 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे.

नागपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे. देशातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनच ते विकसित करण्यावर अधिक भर दिला जावा, असा सूर देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
सध्या जगभारत नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. दररोज नवनवी यंत्रसामग्री येत आहे. भारतातही काही प्रमाणावर त्याचा वापर होतो आहे, परंतु या यंत्रसामग्रीचा वापर करावा किंवा नाही, यावर वाद सुरू आहेत. यावर चर्चा व्हावी, आणि यातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस मार्ग निघावा, या उद्देशाने रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘अ‍ॅग्रोव्हिजन-२०१४’ मध्ये शुक्रवारी ‘आधुनिक यंत्रसामग्रीतून कृषी उत्पादन वाढ आणि पर्यावरणाचा संबंध’ या विषयावर देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात शेती व पर्यावरणावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे खरंच हित होत असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शविली. परंतु आपल्याच देशातील संशोधकांनी संशोधन केल्यास ते येथील शेतकरी व एकूण परिस्थिती लक्षात घेऊन केले असेल. तसेच त्यातून खर्च कमी येईल. तेव्हा स्वदेशी संशोधनावर भर देण्यात यावा. यासाठी शासनाने संशोधनासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करावी, असेही सांगण्यात आले. केंद्रीय वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या चर्चासत्रात आयसीएआर (सिड्स)चे डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ. स्वरुप दत्ता, स्वदेशी जागरण मंचचे अश्विनी महाजन, नॅशनल ब्युरो आॅफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसचे डायरेक्टर डॉ. के.सी. बंसल, भारतीय किसान संघाचे सचिव प्रभाकर केळकर, फाऊंडेशन फॉर बायोटेक्नोलॉजी अव्हर्नेस अ‍ॅण्ड एज्युकेशन प्रो. सी. कामेश्वर राव, विजन्ना भारतीचे जनरल सेक्रेटरी जयकुमार, पंजाब विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. आय.एस. दुआ, कॉटन इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. के.आर. क्रांती, भारतीय किसान समाजचे डॉ. क्रिष्णबीर चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बायोटेक्नोलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमेस्ट्री विभागाचे विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोरे, मायकोचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र बारवाले, रासी सीडस् प्रा.लि.चे डॉ. अरविंद कपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रिशनचे डॉ. बी. दिनेशकुमार, महाराष्ट्र कृषी विभागाचे जॉर्इंट डायरेक्टर व्ही.एन. घवाते प्रामुख्याने सहभागी झाले होते. डॉ. सी.डी. मायी यांनी प्रास्ताविक सादर केले. बायोस्प्रेक्ट्रमचे ग्रुप एडिटर नारायणन सुरेश यांनी ओळख करून दिली. आयोजन समितीचे रवी बोरटकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)