शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नागपूर ग्रामीण भागात टंचाई निवारण्यासाठी पहिल्यांदाच होणार बोअरवेलचे फ्लशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:29 IST

ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने यावर्षी पहिल्यांना जि.प.ने टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलपेक्षा फ्लशिंगवर जास्त फोकस केले आहे.

ठळक मुद्दे६५० बोअरवेलचे टार्गेट : ८६०० बोअरवेलची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने यावर्षी पहिल्यांना जि.प.ने टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलपेक्षा फ्लशिंगवर जास्त फोकस केले आहे. यंदा ६५० बोअरवेलच्या फ्लशिंगचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.फ्लशिंग म्हणजे बंद पडलेल्या बोअरवलेला रिचार्ज करून वापर करणे. नवीन बोअर खोदण्यापेक्षा फ्लशिंगला कमी खर्च लागतो. अनेकदा पाणी पुरवठा विभागाने फ्लशिंगचा प्रस्तावही पदाधिकाऱ्यांकडे ठेवला, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यंदा प्रथमच जिल्ह्यातील टंचाईच्या कामात ६५० बोअरवेलच्या फ्लशिंगला मंजुरी दिली आहे. यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनर्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार आहे. टंचाई आराखड्याच्या झालेल्या आढवा बैठकीत निरुपयोगी बोअर निर्लेखित करणे, जिल्ह्यात बोअरवेलचे प्रमाण कमी करणे, ज्या गावात पाण्याचे स्रोत बाधित आहे, त्याचा अभ्यास करुन फिल्टर प्लँट (आरओ) प्रस्तावित करणे आदी सूचना देण्यात आल्या. ज्या कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही निर्देश वरिष्ठांनी दिले. यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात १०७२ गावांमधील कामासाठी ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर