शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

वर्षभरात विदर्भातील पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांचा आत्महत्या

By सुमेध वाघमार | Updated: December 10, 2023 19:24 IST

मानसिक तणावाचे निराकरण कोण करणार? आरोग्य विद्यापीठाच्या निर्देशाला गंभीरतेने घेणे गरजेचे

सुमेध वाघमारे, नागपूर :  गोंदिया मेडिकल कॉलेजचा प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनेला एक महिना होत नाही तोच शनिवारी नागपूर मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महात्या केली. या वर्षातील विदर्भातील मेडिकल कॉलेजमधील ही पाचवी आत्महत्या आहे. विशेष म्हणजे, राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशीकने दर सहा महिन्यांनी विद्यार्थी व निवासी डॉक्टरांच्या मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत. परंतु त्या नंतरही आत्महत्याचे सत्र सुरूच आहे.

बहुतांश मेडिकलमध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या, वसतिगृहातील सोयींचा अभाव,  वाढलेले कामाचे तास, त्यातून येणारा ताण, वेळी-अवेळी झोप, वरीष्ठांची मर्जी यामुळे निवासी डॉक्टर विविध विकारांनी ग्रासले आहेत. अशीच काहीशी स्थिती एमबीबीएस विद्यार्थ्यांची आहे. साडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम, घरच्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यात अभ्यासाचा ताण आणि यातून येणारे नैराश्याचा विळख्यात विद्यार्थी सापडत आहे. औरंगाबाद येथील एका विद्यार्थ्याने एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या काही दिवसांतच त्याला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. याची दखल तत्कालिन सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंधडा यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशीकला दर सहा महिन्यातून एकदा निवासी डॉक्टरांची मानसिक व शारिरीक आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. हा प्रस्ताव वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चेस्तव ठेवण्यात आला.

यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे, व प्रत्येक सहा महिन्यात आवश्यक्तेनुसार संबंधित निवासी डॉक्टराची शारिरीक व मानसिक आरोग्य तपासणी करावी व त्यास अनुसरून समुपदेशन करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला. परंतु राज्यभरातील अनेक मेडिकल कॉलेजेस्नी याला गंभीरतेने घेतले नसल्याचे चित्र आहे. माानसिक तणावाचे निराकरण होत नसल्याने विद्यार्थी, इंटर्न डॉक्टर व निवासी डॉक्टर मृत्यूला कवटाळत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :nagpurनागपूर