शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

निवडणुकीच्या तोंडावर मासेमाऱ्यांना चॉकलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 9:31 PM

३० जून २०१७ ला सरकारने जीआर काढून नवीन तलाव ठेका धोरण आखले होते. यात तलावाची लीज प्रति हेक्टर १८०० रुपये केली होती. या धोरणाला मासेमाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे दोन वर्षापासून तलावात मत्स्य उत्पादन बंद होते. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ फेब्रुवारीला जीआर काढून ५०० हेक्टरपेक्षा कमी तलावाची लीज काढून ठेवली. पण हा निर्णय जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांच्या बाबत घेण्यात आला. जलसंपदा विभागाच्या तलावाची संख्या कमी असल्याने याचा फायदा २० टक्केही मासेमाऱ्यांना होणार नसल्यामुळे मासेमाऱ्यांनी सरकारच्या नवीन तलाव ठेका धोरणावर आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मासेमाऱ्यांना चॉकलेट दिल्याचे मासेमाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनव्या तलाव ठेका धोरणावर मासेमाऱ्यांचा आक्षेप : जिल्हा परिषद व पंचायत समिती तलावांची लीज कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३० जून २०१७ ला सरकारने जीआर काढून नवीन तलाव ठेका धोरण आखले होते. यात तलावाची लीज प्रति हेक्टर १८०० रुपये केली होती. या धोरणाला मासेमाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे दोन वर्षापासून तलावात मत्स्य उत्पादन बंद होते. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ फेब्रुवारीला जीआर काढून ५०० हेक्टरपेक्षा कमी तलावाची लीज काढून ठेवली. पण हा निर्णय जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांच्या बाबत घेण्यात आला. जलसंपदा विभागाच्या तलावाची संख्या कमी असल्याने याचा फायदा २० टक्केही मासेमाऱ्यांना होणार नसल्यामुळे मासेमाऱ्यांनी सरकारच्या नवीन तलाव ठेका धोरणावर आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मासेमाऱ्यांना चॉकलेट दिल्याचे मासेमाऱ्यांचे म्हणणे आहे.महाराष्ट्रात २५१०७ तलाव आहे. यापैकी जलसंपदा विभागाचे २५७९ तलाव आहे. उर्वरित तलाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अखत्यारितील आहे. विदर्भात सर्वाधिक २० हजारावर तलाव आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मासेमार संस्था विदर्भात आहे. शासनाने ३० जून २०१७ ला जीआर काढून तलावाच्या लीजचे दर वाढविले होते. त्यामुळे पूर्व विदर्भात मासेमाऱ्यांनी या धोरणाऱ्या विरोधात आंदोलन छेडले होते. त्याचे पडसाद भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून आले. या भागात मोठ्या संख्येने मासेमार असल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात निवडणुकीत प्रचार केला आणि सरकारला एक जागा गमवावी लागली. त्याचा धसका घेऊन सरकारने २२ फेब्रुवारीला नवीन जीआर काढून शून्य ते ५०० हेक्टरपर्यंतच्या तलावाची लीज माफ केली. मात्र हा निर्णय जलसंपदा विभागाच्या तलावापर्यंत सिमित ठेवला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मोठ्या संख्येने तलाव आहे. त्या तलावांच्या बाबतीत कुठलाच निर्णय घेतला नाही. या जीआरच्या संदर्भात संघर्ष वाहिनीने एका परिषदेचे आयोजन केले होते. त्यात जीआर संदर्भातील अनेक त्रुटी काढण्यात आल्या.मत्स्यबीजाचे पैसे मत्स्य आयुक्तालयात जमा करावेमत्स्य संस्थांना जे मत्स्यबीज तलावात टाकायचे आहे, ते बीज सरकार देणार आहे. त्यासाठी मासेमार संस्थांना त्याचे पैसे मत्स्य आयुक्तालयात जमा करायचे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारचे ४६ मत्स्यबीज केंद्र आहेत. त्यातील २६ केंद्रे बंद पडलेली आहे. त्यातून केवळ २५ कोटी मत्स्यबीजाचा पुरवठा होऊ शकतो. पण २५००० तलावांसाठी १२५ कोटी मत्स्यबीजाची आवश्यकता आहे. त्यामुळे मत्स्यबीज सरकार कुठून आणणार, ते वेळेत मिळणार का? ते दर्जेदार राहणार का? असाही सवाल मासेमाऱ्यांनी केला आहे.परिषदेतून जीआरच्या काही त्रुटी काढल्या आहे. त्याची पूर्तता सरकारकडून करण्याची अपेक्षा आहे. निवडणुका तोंडावर असल्याने मासेमाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे नवीन तलाव ठेका धोरण आहे. या चुकीच्या धोरणासंदर्भात मासेमाऱ्यांमध्ये आम्ही जनजागृती करीत आहोत.दीनानाथ वाघमारे, समन्वयक, संघर्ष वाहिनी

 

 

टॅग्स :fishermanमच्छीमारVidarbhaविदर्भ