शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

मत्स्योत्पादन कास्तकार व बेरोजगारांसाठी ठरू शकते संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:56 IST

शेतकऱ्यांसाठी व ज्यांच्याजवळ हक्काची जमीन आहे, अशांसाठी मत्स्योत्पादन संजीवनी ठरणार आहे.

ठळक मुद्देविदर्भाला खुणावतोय व्यवसायमागणीपेक्षा केवळ एक तृतीयांश पुरवठाच

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजघडीला एक रुपया गुंतवणुकीतून दोन रुपये शुद्ध नफा देईल, असा कोणताच व्यवसाय नाही. देशात बेरोजगारीचा प्रश्न कायमचाच आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था सगळ्यांना अवगत आहे. त्यात कोरोना संसर्गाने भारताचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकरी असो वा कामगारवर्ग सगळेच दैनावस्थेत आले आहेत. अशास्थितीत शेतकऱ्यांसाठी व ज्यांच्याजवळ हक्काची जमीन आहे, अशांसाठी मत्स्योत्पादन संजीवनी ठरणार आहे. एक रुपयाचे दोन रुपये शुद्ध नफा देणारा हा व्यवसाय आहे. नियोजनबद्धता असल्यास, या व्यवसायातून कास्तकार व बेरोजगारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

जगाची वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी कारगर उपाययोजनांच्या अनुषंगाने झालेल्या एका खासगी सर्वेक्षणातून मत्स्योत्पादन हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय ठरणार असल्याचे भाकीत पुढे आले आहे. भारतातील बहुसंख्य समाज हा शाकाहारी असला तरी मांसाहाराकडे वळणाºयांची संख्या मोठी आहे. भविष्यात जनसंख्या स्फोटाच्या काळात जमीन अन् पालेभाज्यांच्या उत्पादनाचे परिमाण विचारात घेता भूक भागविण्याकरिता मांसाहार हा सर्वात मोठा पर्याय असणार, हे निश्चित. त्याच कारणाने भविष्यात मत्स्योत्पादन हा सर्वसामान्यांना रोजगार देण्यासोबतच अर्थव्यवस्थेचा कणा होणारा व्यवसाय ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या हा व्यवसाय अत्यंत संकुचित असल्याचे दिसून येते आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीला पुरवठा कमी आहे.

एकट्या विदर्भाचा विचार केला तर एका वर्षाला चार लाख हजार मेट्रिक टन इतक्या मत्स्योत्पादनाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आज ६० कोटी मत्स्यबीजा(सीड्स)ची गरज आहे. मात्र, मत्स्यबीजाअभावी वर्तमानात विदर्भातून केवळ १ लाख २५ हजार मेट्रिक टन मत्स्योत्पादनच होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कोकण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून मासोळ्यांची आयात केली जाते. त्यातून विदर्भातूनही निर्यात होत असलेल्या मासोळ्यांचीच तूट भरून काढली जाते. हा सगळा विचार करता, बहुसंख्यक बेरोजगार व कास्तकारांना आत्मनिर्भर होण्यासाठी हा व्यवसाय टर्निंग पॉर्इंट ठरणार आहे.जोडधंदाच नव्हे तर प्रमुख व्यवसाय म्हणून मोठी संधी - प्रभाकर मांढरे: विदर्भात ४२ हजार तलाव आहेत आणि त्यातील बहुतांश तलावामध्ये पारंपरिकरीत्या मत्स्योत्पादन केले जाते. यात नियोजनबद्धता आल्यास उत्पादनात आणखी वाढ करता येऊ शकते. महाराष्ट्रात भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर येथे पाण्याची पातळी सर्वोत्तम असल्याने तलावांव्यतिरिक्त मत्स्योत्पादन करणे शक्य आहे. त्या अनुषंगाने विचार केल्यास प्रत्येक शेतकरी कृषीसोबतच एक जोडधंदा म्हणून आपल्याच जमिनीच्या एका तुकड्यात मत्स्योत्पादन करू शकतो. यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनुदान योजनाही आहेत. सुरुवातीला सुरू झालेला हाच जोडधंदा नंतर प्रमुख व्यवसायात रूपांतरित होण्याची क्षमता या व्यवसायात असल्याचे विदर्भ मच्छिमार संघटनेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर मांढरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :fishermanमच्छीमारFarmerशेतकरी