शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्योत्पादन कास्तकार व बेरोजगारांसाठी ठरू शकते संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:56 IST

शेतकऱ्यांसाठी व ज्यांच्याजवळ हक्काची जमीन आहे, अशांसाठी मत्स्योत्पादन संजीवनी ठरणार आहे.

ठळक मुद्देविदर्भाला खुणावतोय व्यवसायमागणीपेक्षा केवळ एक तृतीयांश पुरवठाच

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजघडीला एक रुपया गुंतवणुकीतून दोन रुपये शुद्ध नफा देईल, असा कोणताच व्यवसाय नाही. देशात बेरोजगारीचा प्रश्न कायमचाच आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था सगळ्यांना अवगत आहे. त्यात कोरोना संसर्गाने भारताचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकरी असो वा कामगारवर्ग सगळेच दैनावस्थेत आले आहेत. अशास्थितीत शेतकऱ्यांसाठी व ज्यांच्याजवळ हक्काची जमीन आहे, अशांसाठी मत्स्योत्पादन संजीवनी ठरणार आहे. एक रुपयाचे दोन रुपये शुद्ध नफा देणारा हा व्यवसाय आहे. नियोजनबद्धता असल्यास, या व्यवसायातून कास्तकार व बेरोजगारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

जगाची वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी कारगर उपाययोजनांच्या अनुषंगाने झालेल्या एका खासगी सर्वेक्षणातून मत्स्योत्पादन हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय ठरणार असल्याचे भाकीत पुढे आले आहे. भारतातील बहुसंख्य समाज हा शाकाहारी असला तरी मांसाहाराकडे वळणाºयांची संख्या मोठी आहे. भविष्यात जनसंख्या स्फोटाच्या काळात जमीन अन् पालेभाज्यांच्या उत्पादनाचे परिमाण विचारात घेता भूक भागविण्याकरिता मांसाहार हा सर्वात मोठा पर्याय असणार, हे निश्चित. त्याच कारणाने भविष्यात मत्स्योत्पादन हा सर्वसामान्यांना रोजगार देण्यासोबतच अर्थव्यवस्थेचा कणा होणारा व्यवसाय ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या हा व्यवसाय अत्यंत संकुचित असल्याचे दिसून येते आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीला पुरवठा कमी आहे.

एकट्या विदर्भाचा विचार केला तर एका वर्षाला चार लाख हजार मेट्रिक टन इतक्या मत्स्योत्पादनाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आज ६० कोटी मत्स्यबीजा(सीड्स)ची गरज आहे. मात्र, मत्स्यबीजाअभावी वर्तमानात विदर्भातून केवळ १ लाख २५ हजार मेट्रिक टन मत्स्योत्पादनच होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कोकण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून मासोळ्यांची आयात केली जाते. त्यातून विदर्भातूनही निर्यात होत असलेल्या मासोळ्यांचीच तूट भरून काढली जाते. हा सगळा विचार करता, बहुसंख्यक बेरोजगार व कास्तकारांना आत्मनिर्भर होण्यासाठी हा व्यवसाय टर्निंग पॉर्इंट ठरणार आहे.जोडधंदाच नव्हे तर प्रमुख व्यवसाय म्हणून मोठी संधी - प्रभाकर मांढरे: विदर्भात ४२ हजार तलाव आहेत आणि त्यातील बहुतांश तलावामध्ये पारंपरिकरीत्या मत्स्योत्पादन केले जाते. यात नियोजनबद्धता आल्यास उत्पादनात आणखी वाढ करता येऊ शकते. महाराष्ट्रात भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर येथे पाण्याची पातळी सर्वोत्तम असल्याने तलावांव्यतिरिक्त मत्स्योत्पादन करणे शक्य आहे. त्या अनुषंगाने विचार केल्यास प्रत्येक शेतकरी कृषीसोबतच एक जोडधंदा म्हणून आपल्याच जमिनीच्या एका तुकड्यात मत्स्योत्पादन करू शकतो. यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनुदान योजनाही आहेत. सुरुवातीला सुरू झालेला हाच जोडधंदा नंतर प्रमुख व्यवसायात रूपांतरित होण्याची क्षमता या व्यवसायात असल्याचे विदर्भ मच्छिमार संघटनेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर मांढरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :fishermanमच्छीमारFarmerशेतकरी