शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पहिल्या नगरपालिकेत होते २५ पदाधिकारी

By admin | Updated: September 14, 2015 03:11 IST

पहिल्या नगरपालिकेत २५ जणांचा समावेश होता. यात नागपूरचे कमिश्नर, डेप्युटी कमिश्नर, असिस्टंट एक्स्ट्रा असिस्टंट कमिश्नर,...

महापालिकेचा गौरवशाली इतिहासनागपूर : पहिल्या नगरपालिकेत २५ जणांचा समावेश होता. यात नागपूरचे कमिश्नर, डेप्युटी कमिश्नर, असिस्टंट एक्स्ट्रा असिस्टंट कमिश्नर, सिव्हिल सर्जन, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, स्पेशल असिस्टंट इंजिनिअर आणि डिव्हिजनल सुपरिंटेंडंट आॅफ पोलीस अशा आठ सरकारी अधिकाऱ्यांची पदसिद्ध सदस्य या नात्याने नेमणूक करण्यात आली. नगरपालिका कायद्यानुसार उरलेल्या १७ गैरसरकारी सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. या सदस्यांची निवडणूक शहरातील रहिवाशांतून करण्यात आली. १८८४ साली लॉर्ड रिपनच्या संकल्पानंतर देशातील नगरपालिकांच्या घटनेत बदल करण्यात आला. यात सदस्यांना अधिकार देण्यात आले; सोबतच त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. सरकारी हिताच्या गोष्टी वगळून स्थानिक प्रशासनाच्या इतर सर्व बाबी जनतेवर सोपविण्यात आल्या. त्यांना अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचे अधिकार देण्यात आले. नगरपालिकेच्या रचनेत बदल करण्यात आला. सदस्यसंख्या २५ पर्यंत वाढविण्यात आली. यात २० सदस्य निवडून तर ५ स्वीकृत सदस्यांचा समावेश होता. मतदानाच्या अधिकारात बदल करून संपत्ती व कर हे तत्त्व मान्य करण्यात आले.दहा चौकात होते फवारे नागपूर शहराची दीडशे वर्षांपूर्वी भरभराट झाली होती. १८६४ साली शहरातील दहा चौकात फवारे होते. यात संविधान चौक, मेडिकल चौक, गांधीबाग, मेयो हॉस्पिटल चौक, गांधी चौक सदर, लकडगंज चौक, हरिहर मंदिर समोर, कमाल टॉकीज चौक, नवी शुक्रवारी व निकालस मंदिर आदींचा यात समावेश होता. यावर १ लाख २० हजारांचा खर्च करण्यात आला होता.शहरात पहिला केरोसीन दिवादीडशे वर्षांपूर्वी विजेचे दिवे नव्हते. भोसलेंच्या काळात १८६५ साली शहरात पहिला केरोसीन दिवा लावण्यात आला. नंतर रात्रीच्या सुमारास शहरातील महत्त्वाच्या चौकात केरोसीन दिवे लावायला सुरुवात झाली. रस्त्यांवर सिंचन१८६७ च्या सुमारास शहरात कच्चे रस्ते होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वर्दळीमुळे धूळ उडत असे. यावर उपाय म्हणून रस्त्यांवर पाणी शिंपले जात होते. शंभर वर्षापूर्वीचे संत्रा मार्केटनागपूर शहराला संत्रानगरी म्हणून ओळखले जाते. १९१० मध्ये संत्रा मार्केट सुरू करण्यात आले. त्यावेळी मार्केटमध्ये दररोज पाच ते सहा हजार संत्र्यांच्या बंड्या येत होत्या. पुढे मार्केटचा विकास करण्यात आला. दारूबंदीचा ठरावसर्वत्र दारूबंदी करण्यात यावी असा राष्ट्रीय पक्षाचा (काँग्रेसचा)कार्यक्र म होता. यासाठी म्युनिसिपल सदस्यांनी पुढाकार घेतला. १९२० च्या फेब्रुवारी महिन्यात नागपुरात दारूबंदीच्या विरोधात मोठी चळवळ उभी राहिली. यात शाळा -कॉलेजातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. आंदोलनावर १४४ कलमाखाली ब्रिटिश सरकारने बंधने लादली आणि त्यांच्यावर खटला चालविला. आंदोलनात पाच लोकांचा बळी गेला होता.म्युनिसिपल पोलीसशहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच नगरपालिकेकडे संरक्षणाचीही जबाबदारी होती. यासाठी पोलीस यंत्रणा उभारण्यात आली होती. आजही मनपा प्रशासनाला विविध कामासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते. आज मनपाकडे पोलीस पथक नाही. परंतु त्याची गरज आहे. तलावातून पाणीपुरवठानागपूर शहराला अंबाझरी, तेलंगखेडी व गांधीसागर तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली होती. १९१० मध्ये गोरेवाडा प्रकल्प तर १९२९ साली कन्हान प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आजही गोरेवाडा व कन्हान येथून पाणीपुरवठा होतो.नासुप्रची स्थापना१९३७ साली नागपूर सुधार प्रन्यासची स्थापना करण्यात आली. शहरातील नाल्या, नाले विकासाची जबाबदारी नासुप्रकडे आली. तसेच मनपाची मलवाहिन्याची योजना नासुप्रच्या सहभागातून राबविण्यात आली. मोफत व सक्तीचे शिक्षणनागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने १९५४ साली ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज हीच योजना कें द्र सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे. शहरात होते ८ वॉर्ड (डिव्हिजन)१८६४ ते १८७३ या कालावधीत शहरात ७ वॉर्ड होते. वॉर्ड १ मध्ये शनिचरा बाजार, गणेशपेठ, जौहरीपुरा, वॉर्ड २ मध्ये टिळक मार्गाच्या उत्तरेकडील भाग, वॉर्ड ३ मध्ये देसनापुरा, टिमकी बाजार, चिमणाबाई पेठ, वॉर्ड ४ मध्ये गोसाईपुरा, मस्कामंडी, बाबापेठ, अयाचित मंदिर, वॉर्ड ५ मध्ये कुंभारपुरा, लकडगंज, तेलंगपुरा, सतरंजीपुरा, जुनापुरा व नागोटालीचा बगीचा, वॉर्ड ६ मध्ये बारईपुरा, लालगंज, बस्तरवारी मसानगंज, नयापुरा व गोसावीपुरा, वॉर्ड ७ मध्ये गुलकीपेठ, वकीलपेठ, सिरसपेठ व नवी शुक्रवारी आणि वॉर्ड क्र. ८ मध्ये सीताबर्डी व टाकळीच्या उपनगराचा समावेश होता. १९४२ मध्ये झाले ४२ वॉर्ड १९४२ साली शहरात ४२ वॉर्ड तयार करण्यात आले. प्रत्येक वॉर्डातून एक नगरसेवक अशाप्रकारे ४२ सदस्य निवडून दिले जात होते, तसेच ६ सदस्य नामनिर्देशित होते. पुढे ते १९६२ सालापर्यंत कायम होते. त्यावेळी शहरात ३,४१,०४१ मतदार होते. शहरातील लोकसंख्या ४,८९,००० इतकी होती.