शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

तृतीयपंथींसाठी पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प उपराजधानीत; समाजकल्याण विभागाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:45 IST

नासुप्रच्या १५० सदनिका वाटपाकरिता सज्ज

नागपूर : समाजाकडून सतत अवमान, तिरस्कार, निंदा होत असलेल्या तृतीयपंथींना सन्मानाने जगता यावे, याकरिता समाजकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. उपराजधानीमध्ये तृतीयपंथींचा स्वतंत्र गृह प्रकल्प स्थापित करण्याकरिता राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास हा तृतीयपंथींचा पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प ठरणार आहे. या योजनेमुळे तृतीयपंथींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सुधार प्रन्यासकडे सध्या ४५० चौरस फुटांच्या १५० सदनिका उपलब्ध आहेत. सर्व सदनिका स्वतंत्र इमारतीत आहेत. नासुप्रने या सदनिका विकण्यासाठी समाजकल्याण विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ओळखपत्र आणि तृतीयपंथी असल्याचे सरकारी प्रमाणपत्र असणाऱ्या तृतीयपंथींना योजनेतील घरे सवलतीच्या दरात वाटप केले जातील. प्रत्येक तृतीयपंथीला एक घर दिले जाईल. त्यासाठी त्यांना घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागेल. उर्वरित रक्कम प्रधानमंत्री आवास योजना व राज्य सरकारच्या निधीतून भरली जाईल. तृतीयपंथीयांना १० टक्के रकमेसाठी बँकेचे कर्जही उपलब्ध करून दिले जाईल.

बैठकीत मांडली होती व्यथा

समाजकल्याण विभागाच्या वतीने तृतीयपंथींच्या समस्या जाणून घेतल्या जातात. दरम्यान, तृतीयपंथींनी घराविषयी व्यथा मांडली होती. तृतीयपंथींकडे समाज सन्मानाने पाहत नाही. त्यामुळे तृतीयपंथींना पैसे असतानाही चांगल्या रहिवासी भागामध्ये घरे खरेदी करता येत नाही व कोणी घर भाड्याने देत नाही. त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. समाजकल्याण विभागाने ही समस्या लक्षात घेता तृतीयपंथींसाठी स्वतंत्र गृह योजना उभारण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळे तृतीयपंथींची रहिवासाची समस्या सुटेल. ते घराचे मालक होतील. त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल.

तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील

तृतीयपंथींच्या अधिकारांसाठी लढणारे बिंदू माधव खिरे यांनी या योजनेचे स्वागत केले. या योजनेमुळे तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले, तसेच त्यांनी काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले. राज्यात सुमारे २० हजार तृतीयपंथी आहेत. याशिवाय अनेक बोगस तृतीयपंथी आहेत. बोगस तृतीयपंथींना योजनेचा लाभ मिळायला नको. अनेक तृतीयपंथी कमी रकमेत घरे खरेदी करतील व त्यानंतर ते जास्त रकमेत घरे विकून पुन्हा जुन्या ठिकाणी राहायला जातील. योजना अमलात आणताना यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनTransgenderट्रान्सजेंडरnagpurनागपूरGovernmentसरकार