शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींसाठी पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प उपराजधानीत; समाजकल्याण विभागाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:45 IST

नासुप्रच्या १५० सदनिका वाटपाकरिता सज्ज

नागपूर : समाजाकडून सतत अवमान, तिरस्कार, निंदा होत असलेल्या तृतीयपंथींना सन्मानाने जगता यावे, याकरिता समाजकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. उपराजधानीमध्ये तृतीयपंथींचा स्वतंत्र गृह प्रकल्प स्थापित करण्याकरिता राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास हा तृतीयपंथींचा पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प ठरणार आहे. या योजनेमुळे तृतीयपंथींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सुधार प्रन्यासकडे सध्या ४५० चौरस फुटांच्या १५० सदनिका उपलब्ध आहेत. सर्व सदनिका स्वतंत्र इमारतीत आहेत. नासुप्रने या सदनिका विकण्यासाठी समाजकल्याण विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ओळखपत्र आणि तृतीयपंथी असल्याचे सरकारी प्रमाणपत्र असणाऱ्या तृतीयपंथींना योजनेतील घरे सवलतीच्या दरात वाटप केले जातील. प्रत्येक तृतीयपंथीला एक घर दिले जाईल. त्यासाठी त्यांना घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागेल. उर्वरित रक्कम प्रधानमंत्री आवास योजना व राज्य सरकारच्या निधीतून भरली जाईल. तृतीयपंथीयांना १० टक्के रकमेसाठी बँकेचे कर्जही उपलब्ध करून दिले जाईल.

बैठकीत मांडली होती व्यथा

समाजकल्याण विभागाच्या वतीने तृतीयपंथींच्या समस्या जाणून घेतल्या जातात. दरम्यान, तृतीयपंथींनी घराविषयी व्यथा मांडली होती. तृतीयपंथींकडे समाज सन्मानाने पाहत नाही. त्यामुळे तृतीयपंथींना पैसे असतानाही चांगल्या रहिवासी भागामध्ये घरे खरेदी करता येत नाही व कोणी घर भाड्याने देत नाही. त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. समाजकल्याण विभागाने ही समस्या लक्षात घेता तृतीयपंथींसाठी स्वतंत्र गृह योजना उभारण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळे तृतीयपंथींची रहिवासाची समस्या सुटेल. ते घराचे मालक होतील. त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल.

तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील

तृतीयपंथींच्या अधिकारांसाठी लढणारे बिंदू माधव खिरे यांनी या योजनेचे स्वागत केले. या योजनेमुळे तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले, तसेच त्यांनी काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले. राज्यात सुमारे २० हजार तृतीयपंथी आहेत. याशिवाय अनेक बोगस तृतीयपंथी आहेत. बोगस तृतीयपंथींना योजनेचा लाभ मिळायला नको. अनेक तृतीयपंथी कमी रकमेत घरे खरेदी करतील व त्यानंतर ते जास्त रकमेत घरे विकून पुन्हा जुन्या ठिकाणी राहायला जातील. योजना अमलात आणताना यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनTransgenderट्रान्सजेंडरnagpurनागपूरGovernmentसरकार