शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

तृतीयपंथींसाठी पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प उपराजधानीत; समाजकल्याण विभागाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:45 IST

नासुप्रच्या १५० सदनिका वाटपाकरिता सज्ज

नागपूर : समाजाकडून सतत अवमान, तिरस्कार, निंदा होत असलेल्या तृतीयपंथींना सन्मानाने जगता यावे, याकरिता समाजकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. उपराजधानीमध्ये तृतीयपंथींचा स्वतंत्र गृह प्रकल्प स्थापित करण्याकरिता राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास हा तृतीयपंथींचा पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प ठरणार आहे. या योजनेमुळे तृतीयपंथींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सुधार प्रन्यासकडे सध्या ४५० चौरस फुटांच्या १५० सदनिका उपलब्ध आहेत. सर्व सदनिका स्वतंत्र इमारतीत आहेत. नासुप्रने या सदनिका विकण्यासाठी समाजकल्याण विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ओळखपत्र आणि तृतीयपंथी असल्याचे सरकारी प्रमाणपत्र असणाऱ्या तृतीयपंथींना योजनेतील घरे सवलतीच्या दरात वाटप केले जातील. प्रत्येक तृतीयपंथीला एक घर दिले जाईल. त्यासाठी त्यांना घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागेल. उर्वरित रक्कम प्रधानमंत्री आवास योजना व राज्य सरकारच्या निधीतून भरली जाईल. तृतीयपंथीयांना १० टक्के रकमेसाठी बँकेचे कर्जही उपलब्ध करून दिले जाईल.

बैठकीत मांडली होती व्यथा

समाजकल्याण विभागाच्या वतीने तृतीयपंथींच्या समस्या जाणून घेतल्या जातात. दरम्यान, तृतीयपंथींनी घराविषयी व्यथा मांडली होती. तृतीयपंथींकडे समाज सन्मानाने पाहत नाही. त्यामुळे तृतीयपंथींना पैसे असतानाही चांगल्या रहिवासी भागामध्ये घरे खरेदी करता येत नाही व कोणी घर भाड्याने देत नाही. त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. समाजकल्याण विभागाने ही समस्या लक्षात घेता तृतीयपंथींसाठी स्वतंत्र गृह योजना उभारण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळे तृतीयपंथींची रहिवासाची समस्या सुटेल. ते घराचे मालक होतील. त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल.

तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील

तृतीयपंथींच्या अधिकारांसाठी लढणारे बिंदू माधव खिरे यांनी या योजनेचे स्वागत केले. या योजनेमुळे तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले, तसेच त्यांनी काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले. राज्यात सुमारे २० हजार तृतीयपंथी आहेत. याशिवाय अनेक बोगस तृतीयपंथी आहेत. बोगस तृतीयपंथींना योजनेचा लाभ मिळायला नको. अनेक तृतीयपंथी कमी रकमेत घरे खरेदी करतील व त्यानंतर ते जास्त रकमेत घरे विकून पुन्हा जुन्या ठिकाणी राहायला जातील. योजना अमलात आणताना यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनTransgenderट्रान्सजेंडरnagpurनागपूरGovernmentसरकार