शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींसाठी पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प उपराजधानीत; समाजकल्याण विभागाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 14:45 IST

नासुप्रच्या १५० सदनिका वाटपाकरिता सज्ज

नागपूर : समाजाकडून सतत अवमान, तिरस्कार, निंदा होत असलेल्या तृतीयपंथींना सन्मानाने जगता यावे, याकरिता समाजकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. उपराजधानीमध्ये तृतीयपंथींचा स्वतंत्र गृह प्रकल्प स्थापित करण्याकरिता राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास हा तृतीयपंथींचा पहिला स्वतंत्र गृह प्रकल्प ठरणार आहे. या योजनेमुळे तृतीयपंथींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सुधार प्रन्यासकडे सध्या ४५० चौरस फुटांच्या १५० सदनिका उपलब्ध आहेत. सर्व सदनिका स्वतंत्र इमारतीत आहेत. नासुप्रने या सदनिका विकण्यासाठी समाजकल्याण विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ओळखपत्र आणि तृतीयपंथी असल्याचे सरकारी प्रमाणपत्र असणाऱ्या तृतीयपंथींना योजनेतील घरे सवलतीच्या दरात वाटप केले जातील. प्रत्येक तृतीयपंथीला एक घर दिले जाईल. त्यासाठी त्यांना घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागेल. उर्वरित रक्कम प्रधानमंत्री आवास योजना व राज्य सरकारच्या निधीतून भरली जाईल. तृतीयपंथीयांना १० टक्के रकमेसाठी बँकेचे कर्जही उपलब्ध करून दिले जाईल.

बैठकीत मांडली होती व्यथा

समाजकल्याण विभागाच्या वतीने तृतीयपंथींच्या समस्या जाणून घेतल्या जातात. दरम्यान, तृतीयपंथींनी घराविषयी व्यथा मांडली होती. तृतीयपंथींकडे समाज सन्मानाने पाहत नाही. त्यामुळे तृतीयपंथींना पैसे असतानाही चांगल्या रहिवासी भागामध्ये घरे खरेदी करता येत नाही व कोणी घर भाड्याने देत नाही. त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. समाजकल्याण विभागाने ही समस्या लक्षात घेता तृतीयपंथींसाठी स्वतंत्र गृह योजना उभारण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळे तृतीयपंथींची रहिवासाची समस्या सुटेल. ते घराचे मालक होतील. त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल.

तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील

तृतीयपंथींच्या अधिकारांसाठी लढणारे बिंदू माधव खिरे यांनी या योजनेचे स्वागत केले. या योजनेमुळे तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले, तसेच त्यांनी काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले. राज्यात सुमारे २० हजार तृतीयपंथी आहेत. याशिवाय अनेक बोगस तृतीयपंथी आहेत. बोगस तृतीयपंथींना योजनेचा लाभ मिळायला नको. अनेक तृतीयपंथी कमी रकमेत घरे खरेदी करतील व त्यानंतर ते जास्त रकमेत घरे विकून पुन्हा जुन्या ठिकाणी राहायला जातील. योजना अमलात आणताना यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनTransgenderट्रान्सजेंडरnagpurनागपूरGovernmentसरकार