शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वनांसकट प्राण्यांच्याही जीवावर उठला ‘वणवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:37 IST

राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील एकूण ६१ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्राचा विचार करता हे नुकसान ०.५ टक्के म्हणता येईल. वनविभागाच्या दृष्टीने हे अत्यल्प असले तरी वृक्ष लागवडीसाठी व वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे होणाऱ्या प्रयत्नांना यामुळे नक्कीच खीळ बसत आहे.

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वनक्षेत्रात एकीकडे सातत्याने घट होत असताना दुसरीकडे वारंवार वणवा लागण्याच्या घटनांमुळे जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण होत असून अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागातर्फे सातत्याने होत असलेले प्रयत्नही निष्फळ ठरताना दिसत आहेत.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ २०१७ मध्ये राज्यातील जंगलात ५८४४ लहान मोठ्या आगी लागण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे २०१८ साली जानेवारीपासून आतापर्यंत जंगलक्षेत्र व इतर भागात लहानमोठ्या ३००० च्यावर आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०१३ पासून वणवा लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याची नोंद आहे. २०१३ मध्ये २९२८ घटना, २०१४ मध्ये २६८३ घटना, २०१५ मध्ये १८८० घटना व २०१६ मध्ये ४६४१ घटना घडल्या व यामध्ये ३५,८३८ हेक्टर जंगल प्रभावित झाले. पाच वर्षात १ लाख १६,६९२ हेक्टर जंगलाचे क्षेत्र वणव्यांमुळे जळून खाक झाले आहे. या घटनांमध्ये १३५ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान मोजण्यात आले असले तरी वनांतील जैवविविधता अधिक प्रभावित झाली आहे.

वणव्याची अनेक कारणेजंगलात आग लागण्याच्या घटनांमागे अनेक प्रकारची कारणे आहेत. मात्र या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहेत, यावर अनेकांचे एकमत आहे. अनेक वेळा तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून जंगल परिसरात राहणारे व तेंदूपत्ता गोळा करणारे लोकच जंगलामध्ये आग लावतात. वनविभागाद्वारे अवैध कारभार करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने आणि जंगलामध्ये जाण्यास मनाई केल्यामुळे सूड घेण्यासाठीही वनांमध्ये आगी लावल्या जात असल्याची शक्यता वनविभागातर्फे व्यक्त केली जाते. नक्षलवादी सहसा वनांमध्ये आग लावत नसले तरी, कधी कधी मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य केले जाते. दुसरीकडे मोहफूल स्पष्ट दिसावे, मध मिळविण्यासाठी मधमाशांचे पोळे जाळणे, चांगला चारा निर्माण व्हावा म्हणून, अशी लहान मोठी कारणे यामागे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

आग लागण्याच्या घटनांमध्ये घट होत आहे. यापूर्वी घटना निदर्शनास येत नव्हत्या, मात्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाने प्रत्येक घटना समोर येत असल्याने आकडे मोठे वाटतात. असे असले तरी वणव्यावर नियंत्रणासाठी विभागातर्फे सातत्याने उपाय केले जात आहेत. आग लागू नये म्हणून प्रिव्हेन्टीव्ह मेजर अवलंबिले आहेत. यामध्ये विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच छोट्या छोट्या परिसरात फायर लाईन तयार केली जाते. शिवाय प्रत्येक रेंजमध्ये फायर वॉचरची स्ट्राईक फोर्स तयार केली असून ती सातत्याने लक्ष देत असते. आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी उपाय होत आहेत. ११ फायर फायटिंग युनिट्स तसेच १२७६ पोर्टेबल फायर ब्लोअर उपलब्ध केले आहेत. स्मार्ट फोन, वाहनांची उपलब्धता वाढविली आहे. आपत्ती निवारणासाठी आरक्षित पोलीस दलाच्या तीन बटालियन व आगीवर नियंत्रणासाठी दरवर्षी ३० कोटींचे प्रावधान केले आहे.- आर. एस. यादव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकवणवा लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी मोठे प्राणी बाहेर पळूनही जातात, मात्र जंगलातून बाहेर पडल्यावर वन्यजीव-मानव संघर्षही यामुळे निर्माण होतो. दुसरीकडे जंगलात वावरणारे लहानमोठे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात आणि विविध प्रकारचे वृक्ष व अनेक जैवविविधतेच्या घटकांचे मोठे नुकसान होत आहे. वनसंपदा बचावासाठी यावर नियंत्रण आवश्यक आहे.- कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :forest departmentवनविभाग