शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वनांसकट प्राण्यांच्याही जीवावर उठला ‘वणवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:37 IST

राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील एकूण ६१ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्राचा विचार करता हे नुकसान ०.५ टक्के म्हणता येईल. वनविभागाच्या दृष्टीने हे अत्यल्प असले तरी वृक्ष लागवडीसाठी व वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे होणाऱ्या प्रयत्नांना यामुळे नक्कीच खीळ बसत आहे.

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वनक्षेत्रात एकीकडे सातत्याने घट होत असताना दुसरीकडे वारंवार वणवा लागण्याच्या घटनांमुळे जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण होत असून अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागातर्फे सातत्याने होत असलेले प्रयत्नही निष्फळ ठरताना दिसत आहेत.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ २०१७ मध्ये राज्यातील जंगलात ५८४४ लहान मोठ्या आगी लागण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे २०१८ साली जानेवारीपासून आतापर्यंत जंगलक्षेत्र व इतर भागात लहानमोठ्या ३००० च्यावर आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०१३ पासून वणवा लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याची नोंद आहे. २०१३ मध्ये २९२८ घटना, २०१४ मध्ये २६८३ घटना, २०१५ मध्ये १८८० घटना व २०१६ मध्ये ४६४१ घटना घडल्या व यामध्ये ३५,८३८ हेक्टर जंगल प्रभावित झाले. पाच वर्षात १ लाख १६,६९२ हेक्टर जंगलाचे क्षेत्र वणव्यांमुळे जळून खाक झाले आहे. या घटनांमध्ये १३५ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान मोजण्यात आले असले तरी वनांतील जैवविविधता अधिक प्रभावित झाली आहे.

वणव्याची अनेक कारणेजंगलात आग लागण्याच्या घटनांमागे अनेक प्रकारची कारणे आहेत. मात्र या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहेत, यावर अनेकांचे एकमत आहे. अनेक वेळा तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून जंगल परिसरात राहणारे व तेंदूपत्ता गोळा करणारे लोकच जंगलामध्ये आग लावतात. वनविभागाद्वारे अवैध कारभार करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने आणि जंगलामध्ये जाण्यास मनाई केल्यामुळे सूड घेण्यासाठीही वनांमध्ये आगी लावल्या जात असल्याची शक्यता वनविभागातर्फे व्यक्त केली जाते. नक्षलवादी सहसा वनांमध्ये आग लावत नसले तरी, कधी कधी मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य केले जाते. दुसरीकडे मोहफूल स्पष्ट दिसावे, मध मिळविण्यासाठी मधमाशांचे पोळे जाळणे, चांगला चारा निर्माण व्हावा म्हणून, अशी लहान मोठी कारणे यामागे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

आग लागण्याच्या घटनांमध्ये घट होत आहे. यापूर्वी घटना निदर्शनास येत नव्हत्या, मात्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाने प्रत्येक घटना समोर येत असल्याने आकडे मोठे वाटतात. असे असले तरी वणव्यावर नियंत्रणासाठी विभागातर्फे सातत्याने उपाय केले जात आहेत. आग लागू नये म्हणून प्रिव्हेन्टीव्ह मेजर अवलंबिले आहेत. यामध्ये विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच छोट्या छोट्या परिसरात फायर लाईन तयार केली जाते. शिवाय प्रत्येक रेंजमध्ये फायर वॉचरची स्ट्राईक फोर्स तयार केली असून ती सातत्याने लक्ष देत असते. आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी उपाय होत आहेत. ११ फायर फायटिंग युनिट्स तसेच १२७६ पोर्टेबल फायर ब्लोअर उपलब्ध केले आहेत. स्मार्ट फोन, वाहनांची उपलब्धता वाढविली आहे. आपत्ती निवारणासाठी आरक्षित पोलीस दलाच्या तीन बटालियन व आगीवर नियंत्रणासाठी दरवर्षी ३० कोटींचे प्रावधान केले आहे.- आर. एस. यादव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकवणवा लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी मोठे प्राणी बाहेर पळूनही जातात, मात्र जंगलातून बाहेर पडल्यावर वन्यजीव-मानव संघर्षही यामुळे निर्माण होतो. दुसरीकडे जंगलात वावरणारे लहानमोठे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात आणि विविध प्रकारचे वृक्ष व अनेक जैवविविधतेच्या घटकांचे मोठे नुकसान होत आहे. वनसंपदा बचावासाठी यावर नियंत्रण आवश्यक आहे.- कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :forest departmentवनविभाग