शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

वनांसकट प्राण्यांच्याही जीवावर उठला ‘वणवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:37 IST

राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील एकूण ६१ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्राचा विचार करता हे नुकसान ०.५ टक्के म्हणता येईल. वनविभागाच्या दृष्टीने हे अत्यल्प असले तरी वृक्ष लागवडीसाठी व वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे होणाऱ्या प्रयत्नांना यामुळे नक्कीच खीळ बसत आहे.

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वनक्षेत्रात एकीकडे सातत्याने घट होत असताना दुसरीकडे वारंवार वणवा लागण्याच्या घटनांमुळे जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण होत असून अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागातर्फे सातत्याने होत असलेले प्रयत्नही निष्फळ ठरताना दिसत आहेत.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ २०१७ मध्ये राज्यातील जंगलात ५८४४ लहान मोठ्या आगी लागण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे २०१८ साली जानेवारीपासून आतापर्यंत जंगलक्षेत्र व इतर भागात लहानमोठ्या ३००० च्यावर आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०१३ पासून वणवा लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याची नोंद आहे. २०१३ मध्ये २९२८ घटना, २०१४ मध्ये २६८३ घटना, २०१५ मध्ये १८८० घटना व २०१६ मध्ये ४६४१ घटना घडल्या व यामध्ये ३५,८३८ हेक्टर जंगल प्रभावित झाले. पाच वर्षात १ लाख १६,६९२ हेक्टर जंगलाचे क्षेत्र वणव्यांमुळे जळून खाक झाले आहे. या घटनांमध्ये १३५ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान मोजण्यात आले असले तरी वनांतील जैवविविधता अधिक प्रभावित झाली आहे.

वणव्याची अनेक कारणेजंगलात आग लागण्याच्या घटनांमागे अनेक प्रकारची कारणे आहेत. मात्र या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहेत, यावर अनेकांचे एकमत आहे. अनेक वेळा तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून जंगल परिसरात राहणारे व तेंदूपत्ता गोळा करणारे लोकच जंगलामध्ये आग लावतात. वनविभागाद्वारे अवैध कारभार करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने आणि जंगलामध्ये जाण्यास मनाई केल्यामुळे सूड घेण्यासाठीही वनांमध्ये आगी लावल्या जात असल्याची शक्यता वनविभागातर्फे व्यक्त केली जाते. नक्षलवादी सहसा वनांमध्ये आग लावत नसले तरी, कधी कधी मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य केले जाते. दुसरीकडे मोहफूल स्पष्ट दिसावे, मध मिळविण्यासाठी मधमाशांचे पोळे जाळणे, चांगला चारा निर्माण व्हावा म्हणून, अशी लहान मोठी कारणे यामागे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

आग लागण्याच्या घटनांमध्ये घट होत आहे. यापूर्वी घटना निदर्शनास येत नव्हत्या, मात्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाने प्रत्येक घटना समोर येत असल्याने आकडे मोठे वाटतात. असे असले तरी वणव्यावर नियंत्रणासाठी विभागातर्फे सातत्याने उपाय केले जात आहेत. आग लागू नये म्हणून प्रिव्हेन्टीव्ह मेजर अवलंबिले आहेत. यामध्ये विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच छोट्या छोट्या परिसरात फायर लाईन तयार केली जाते. शिवाय प्रत्येक रेंजमध्ये फायर वॉचरची स्ट्राईक फोर्स तयार केली असून ती सातत्याने लक्ष देत असते. आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी उपाय होत आहेत. ११ फायर फायटिंग युनिट्स तसेच १२७६ पोर्टेबल फायर ब्लोअर उपलब्ध केले आहेत. स्मार्ट फोन, वाहनांची उपलब्धता वाढविली आहे. आपत्ती निवारणासाठी आरक्षित पोलीस दलाच्या तीन बटालियन व आगीवर नियंत्रणासाठी दरवर्षी ३० कोटींचे प्रावधान केले आहे.- आर. एस. यादव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकवणवा लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी मोठे प्राणी बाहेर पळूनही जातात, मात्र जंगलातून बाहेर पडल्यावर वन्यजीव-मानव संघर्षही यामुळे निर्माण होतो. दुसरीकडे जंगलात वावरणारे लहानमोठे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात आणि विविध प्रकारचे वृक्ष व अनेक जैवविविधतेच्या घटकांचे मोठे नुकसान होत आहे. वनसंपदा बचावासाठी यावर नियंत्रण आवश्यक आहे.- कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :forest departmentवनविभाग