शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

वनांसकट प्राण्यांच्याही जीवावर उठला ‘वणवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:37 IST

राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील एकूण ६१ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्राचा विचार करता हे नुकसान ०.५ टक्के म्हणता येईल. वनविभागाच्या दृष्टीने हे अत्यल्प असले तरी वृक्ष लागवडीसाठी व वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे होणाऱ्या प्रयत्नांना यामुळे नक्कीच खीळ बसत आहे.

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वनक्षेत्रात एकीकडे सातत्याने घट होत असताना दुसरीकडे वारंवार वणवा लागण्याच्या घटनांमुळे जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण होत असून अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागातर्फे सातत्याने होत असलेले प्रयत्नही निष्फळ ठरताना दिसत आहेत.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ २०१७ मध्ये राज्यातील जंगलात ५८४४ लहान मोठ्या आगी लागण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे २०१८ साली जानेवारीपासून आतापर्यंत जंगलक्षेत्र व इतर भागात लहानमोठ्या ३००० च्यावर आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०१३ पासून वणवा लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याची नोंद आहे. २०१३ मध्ये २९२८ घटना, २०१४ मध्ये २६८३ घटना, २०१५ मध्ये १८८० घटना व २०१६ मध्ये ४६४१ घटना घडल्या व यामध्ये ३५,८३८ हेक्टर जंगल प्रभावित झाले. पाच वर्षात १ लाख १६,६९२ हेक्टर जंगलाचे क्षेत्र वणव्यांमुळे जळून खाक झाले आहे. या घटनांमध्ये १३५ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान मोजण्यात आले असले तरी वनांतील जैवविविधता अधिक प्रभावित झाली आहे.

वणव्याची अनेक कारणेजंगलात आग लागण्याच्या घटनांमागे अनेक प्रकारची कारणे आहेत. मात्र या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहेत, यावर अनेकांचे एकमत आहे. अनेक वेळा तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून जंगल परिसरात राहणारे व तेंदूपत्ता गोळा करणारे लोकच जंगलामध्ये आग लावतात. वनविभागाद्वारे अवैध कारभार करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने आणि जंगलामध्ये जाण्यास मनाई केल्यामुळे सूड घेण्यासाठीही वनांमध्ये आगी लावल्या जात असल्याची शक्यता वनविभागातर्फे व्यक्त केली जाते. नक्षलवादी सहसा वनांमध्ये आग लावत नसले तरी, कधी कधी मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य केले जाते. दुसरीकडे मोहफूल स्पष्ट दिसावे, मध मिळविण्यासाठी मधमाशांचे पोळे जाळणे, चांगला चारा निर्माण व्हावा म्हणून, अशी लहान मोठी कारणे यामागे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

आग लागण्याच्या घटनांमध्ये घट होत आहे. यापूर्वी घटना निदर्शनास येत नव्हत्या, मात्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाने प्रत्येक घटना समोर येत असल्याने आकडे मोठे वाटतात. असे असले तरी वणव्यावर नियंत्रणासाठी विभागातर्फे सातत्याने उपाय केले जात आहेत. आग लागू नये म्हणून प्रिव्हेन्टीव्ह मेजर अवलंबिले आहेत. यामध्ये विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच छोट्या छोट्या परिसरात फायर लाईन तयार केली जाते. शिवाय प्रत्येक रेंजमध्ये फायर वॉचरची स्ट्राईक फोर्स तयार केली असून ती सातत्याने लक्ष देत असते. आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी उपाय होत आहेत. ११ फायर फायटिंग युनिट्स तसेच १२७६ पोर्टेबल फायर ब्लोअर उपलब्ध केले आहेत. स्मार्ट फोन, वाहनांची उपलब्धता वाढविली आहे. आपत्ती निवारणासाठी आरक्षित पोलीस दलाच्या तीन बटालियन व आगीवर नियंत्रणासाठी दरवर्षी ३० कोटींचे प्रावधान केले आहे.- आर. एस. यादव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकवणवा लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी मोठे प्राणी बाहेर पळूनही जातात, मात्र जंगलातून बाहेर पडल्यावर वन्यजीव-मानव संघर्षही यामुळे निर्माण होतो. दुसरीकडे जंगलात वावरणारे लहानमोठे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात आणि विविध प्रकारचे वृक्ष व अनेक जैवविविधतेच्या घटकांचे मोठे नुकसान होत आहे. वनसंपदा बचावासाठी यावर नियंत्रण आवश्यक आहे.- कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :forest departmentवनविभाग