शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अग्निशमन प्रशिक्षण केंद्राला सुरुवात

By admin | Updated: November 9, 2016 03:10 IST

राज्याच्या नगरविकास विभागाने नागपूर शहरात विभागीय अग्निशमन प्रशिक्षण कें द्र सुरू करण्याला मंजुरी दिली होती.

महापौरांच्या हस्ते शुभारंभ : पहिल्या तुकडीत २७ प्रशिक्षणार्थीनागपूर : राज्याच्या नगरविकास विभागाने नागपूर शहरात विभागीय अग्निशमन प्रशिक्षण कें द्र सुरू करण्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कळमना केंद्रातील या प्रशिक्षण केंद्र्राला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन प्रसंगी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख, झोन सभापती कांता लारोकर, नगरसेवक जगतराम सिन्हा, उपायुक्त रवींद्र देवतळे, अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके, स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे आदी उपस्थित होते. नागपूरसह विदर्भातील इच्छुक उमेदवारांना अग्निशमन प्रशिक्षणासाठी मुंबई, पुणे व ठाणे शहरात जावे लागत लागत होते. परंतु आता नागपुरातच प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्याने या भागातील उमेदवारांची सुविधा झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून उत्कृष्ट आग्निक निर्माण व्हावे. प्रशिक्षण केंद्राचा दर्जा राष्ट्रीय स्तरावरील असावा, असे मत प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केले. दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कळमना येथील अग्निशमन केंद्राच्या इमारतीत यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रात २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सहा महिन्यांनी ही संख्या ५० पर्र्यत वाढविण्यात येईल. येथे प्रशिक्षणार्थींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५२,६०० रुपये खर्च येणार आहे.प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी कळमना केंद्रावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्राचार्य, प्रशिक्षक व सहायक अशा १० जणांची गरज भासणार आहे. भविष्यात अग्निशमन विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तोपर्यंत अग्निशमन विभागाच्या कळमना व इतर केंद्रातील अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिल्या तुकडीत प्रामुख्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयांंतर्गत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवड केली जाते. यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व १८ वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना खासगी व औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन विभागात भरती करताना प्राधान्य दिले जाते. अशी माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.(प्रतिनिधी)