शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

By कमलेश वानखेडे | Updated: December 15, 2023 17:31 IST

फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नागपूर: ‘आगीच्या घटना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) इमारतींचे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सोबतच फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आ. विद्या ठाकूर यांनी  लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, जय भवानी एस.आर.ए गृहनिर्माण संस्था गोरेगाव या सोसायटीला ऑक्टोबर २०२३ मध्ये आग लागली. सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक रहिवासी जखमी झाले. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मात्र प्रत्यक्षात पूर्ण मदत अद्याप मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले. यावर मंत्री सावे म्हणाले, आगीची घटना घडल्यानंतर तातडीने बैठक घेतली. या इमारतीला फायर ऑडिट करून अग्निशमन उपकरणे अनिवार्य करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

 आ. रवींद्र वायकर यांनी मुंबई शहरात एसआरएची स्थिती वाईट असून पुनर्वसन म्हणून बांधलेल्या इमारतीत पुरेशा सुविधा नसल्याचे सांगितले. विकासकाला अतिरिक्त एफएसआय देतो. फायर ऑडिट करणार तर केव्हा करणार हे सांगण्यात यावे. यापूर्वीही असेच आश्वासन दिले, मात्र फायर ऑडिट झालेच नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बिल्डरांच्या घशात जात आहे, यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली.

अवैध रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करणार- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘रूफ टॉफ हॉटेलमध्ये आगी लागतात. तक्रार आल्यानंतर पुण्यातील रूफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला.तोडपाणी करून पुन्हा हे हॉटेल सुरू करण्यात आले, असा दावा त्यांनी केला. अग्निशमनची परवानगी नाही तरीही असे हॉटेल सुरू आहेत. अवैध रूफ टॉप हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर ‘रूफ टॉप हॉटेलचा मुद्दा नगर विकास विभागाला पाठविण्यात येईल. अवैध हॉटेलवर बंदी आणू’, असे आश्वासन अतुल सावे यांनी दिले.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर