शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

‘ईव्हीएम’ला तीव्र विरोध : नागपूरनजीकच्या वानाडोंगरीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:39 IST

हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.

ठळक मुद्देसर्वपक्षीय एकवटले, बसेस अडविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.‘ईव्हीएम’चा विरोध करीत बॅलेट पेपरनेच निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी नगर परिषद आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी ७ वाजतापासून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी सर्व व्यापारी प्रतिष्ठानच्या मालकांना आवाहन करीत प्रतिष्ठाने बंद केले.बंददरम्यान जिल्हा परिषदेची शाळा वगळता इतर सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी राजीवनगरात दाखल होऊन नागपूर महापालिकेची ‘आपली बस’सह स्कूल बस अडविल्या. एवढेच काय तर वायसीसीई कॅम्पससमोर एका स्कूलबसवर दगड भिरकावला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले. त्यामुळे अनर्थ टळला. बर्डी ते हिंगणा जाणाऱ्या बसेस वानाडोंगरीपर्यंत येऊन परत गेल्या. यामुळे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मात्र सुरू होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नगर परिषदेकडे येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालय कुलूपबंद करून ते घराकडे गेले. त्यामुळे तेथेही अनुचित प्रकार होण्यापासून टळले. सर्वपक्षीयांनी पुकारलेला हा बंद कडकडीत पाळण्यात येऊन व्यापाऱ्यांनीही त्यांच्या हाकेला साद घातली.तेव्हा ‘ईव्हीएम’ सेट नव्हती काय?वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन उतरलो. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदार राजा हा हुशार आहे. तो कसल्याही भूलथापांना बळी पडला नाही. विरोधकांना मात्र आता पराभव पचनी पडत नाही म्हणून त्यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणे सुरू केले आहे. ‘ईव्हीएम’ सेट करून निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्यांनी पारशिवनी येथील निवडणूक डोळ्यासमोर ठेवावी. तेथेही आम्ही ईव्हीएम सेट केले होते काय. एवढेच काय तर रायपूर ग्रामपंचायत आणि हिंगणा नगर पंचायतमध्येही गत काळात निवडणूक होऊन भाजपचा पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम सेट नव्हते काय, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत केले.‘ईव्हीएम’वर पराभवाचे खापर फोडणे कितपत योग्य : समीर मेघेवानाडोंगरी नगर परिषदेत भाजपचा झालेला विजय हा जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. मात्र विरोधक आता पराभवाचे खापर हे ‘ईव्हीएम’वर फोडत आहे. त्यांनी पराभव स्वीकार करावा. लोकांना भडकवून आंदोलनाचा मार्ग पत्करणे ही कृती दिशाभूल करणारी आहे. विरोधकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. मात्र त्यांनी बंददरम्यान स्कूल बसवर दगडफेक केली. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर दोन दिवसांत गुन्हे दाखल करावे. अन्यथा भाजपही रविवारपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल, असे हिंगण्याचे आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.वानाडोंगरी परिसरात मागील तीन वर्षांत १६ कोटींची विकास कामे झाली. लवकरच आणखी विकास कामांचा धडाका लागणार आहे. या परिसरातील प्रस्तावित ‘कोल बेल्ट’ रद्द व्हावा, यासाठी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला. असे असताना केवळ तहसीलदारांना निवेदन दिले म्हणून कोळसा खाण रद्द झाली, असा प्रचार करीत आहे. या भूलथापांना येथील जनता बळी पडली नाही. या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात लढले. या विरोधकांना त्यांचे सर्वमिळून २१ उमेदवार निवडणुकीत उभे करता आले नाही. पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता येत नाही, ते येथील विकास काय करणार, असा प्रश्न उपस्थित करीत मेघे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :nagpurनागपूर