शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’ला तीव्र विरोध : नागपूरनजीकच्या वानाडोंगरीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:39 IST

हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.

ठळक मुद्देसर्वपक्षीय एकवटले, बसेस अडविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.‘ईव्हीएम’चा विरोध करीत बॅलेट पेपरनेच निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी नगर परिषद आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी ७ वाजतापासून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी सर्व व्यापारी प्रतिष्ठानच्या मालकांना आवाहन करीत प्रतिष्ठाने बंद केले.बंददरम्यान जिल्हा परिषदेची शाळा वगळता इतर सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी राजीवनगरात दाखल होऊन नागपूर महापालिकेची ‘आपली बस’सह स्कूल बस अडविल्या. एवढेच काय तर वायसीसीई कॅम्पससमोर एका स्कूलबसवर दगड भिरकावला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले. त्यामुळे अनर्थ टळला. बर्डी ते हिंगणा जाणाऱ्या बसेस वानाडोंगरीपर्यंत येऊन परत गेल्या. यामुळे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मात्र सुरू होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नगर परिषदेकडे येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालय कुलूपबंद करून ते घराकडे गेले. त्यामुळे तेथेही अनुचित प्रकार होण्यापासून टळले. सर्वपक्षीयांनी पुकारलेला हा बंद कडकडीत पाळण्यात येऊन व्यापाऱ्यांनीही त्यांच्या हाकेला साद घातली.तेव्हा ‘ईव्हीएम’ सेट नव्हती काय?वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन उतरलो. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदार राजा हा हुशार आहे. तो कसल्याही भूलथापांना बळी पडला नाही. विरोधकांना मात्र आता पराभव पचनी पडत नाही म्हणून त्यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणे सुरू केले आहे. ‘ईव्हीएम’ सेट करून निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्यांनी पारशिवनी येथील निवडणूक डोळ्यासमोर ठेवावी. तेथेही आम्ही ईव्हीएम सेट केले होते काय. एवढेच काय तर रायपूर ग्रामपंचायत आणि हिंगणा नगर पंचायतमध्येही गत काळात निवडणूक होऊन भाजपचा पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम सेट नव्हते काय, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत केले.‘ईव्हीएम’वर पराभवाचे खापर फोडणे कितपत योग्य : समीर मेघेवानाडोंगरी नगर परिषदेत भाजपचा झालेला विजय हा जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. मात्र विरोधक आता पराभवाचे खापर हे ‘ईव्हीएम’वर फोडत आहे. त्यांनी पराभव स्वीकार करावा. लोकांना भडकवून आंदोलनाचा मार्ग पत्करणे ही कृती दिशाभूल करणारी आहे. विरोधकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. मात्र त्यांनी बंददरम्यान स्कूल बसवर दगडफेक केली. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर दोन दिवसांत गुन्हे दाखल करावे. अन्यथा भाजपही रविवारपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल, असे हिंगण्याचे आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.वानाडोंगरी परिसरात मागील तीन वर्षांत १६ कोटींची विकास कामे झाली. लवकरच आणखी विकास कामांचा धडाका लागणार आहे. या परिसरातील प्रस्तावित ‘कोल बेल्ट’ रद्द व्हावा, यासाठी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला. असे असताना केवळ तहसीलदारांना निवेदन दिले म्हणून कोळसा खाण रद्द झाली, असा प्रचार करीत आहे. या भूलथापांना येथील जनता बळी पडली नाही. या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात लढले. या विरोधकांना त्यांचे सर्वमिळून २१ उमेदवार निवडणुकीत उभे करता आले नाही. पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता येत नाही, ते येथील विकास काय करणार, असा प्रश्न उपस्थित करीत मेघे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :nagpurनागपूर