शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

‘त्या’ शेकडाे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेतून वंचित राहण्याची भीती

By निशांत वानखेडे | Updated: September 18, 2025 20:20 IST

नवीन शाळांचे मंडळ मान्यतेचे प्रस्ताव रखडले : शिक्षण उपसंचालक कार्यालयात फाईल्सचा डाेंगर

नागपूर : दहावी किंवा बारावीची पहिली बॅच असलेल्या शाळांनाशिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रथम मंडळ मान्यता घेणे अनिवार्य आहे आणि अशा अनेक शाळांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात पडले आहेत. येत्या १० दिवसात कार्यालयाची मान्यता मिळाली नाही, तर संबंधित शाळेचे बारावीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शालार्थ आयडी घाेटाळ्याचे प्रकरण समाेर आल्यापासून नागपूरच्या शिक्षण विभागाची अवस्था वाईट झाली आहे. या प्रकरणामुळे इतर कामांचा खाेळंबा हाेत असून भीतीच्या सावटात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव वाढला आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षण उपंसचालक कार्यालयात अशाप्रकारे शाळा व शिक्षकांशी संबंधित कामे रखडली आहेत. शाळांच्या मंडळ मान्यतेचा विषयही असाच रखडून पडला आहे.

ज्या शाळांमध्ये दहावी किंवा बारावीची पहिली बॅच असते, त्या शाळांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रथम मंडळ मान्यता घेणे आवश्यक असते. येथून मंडळ मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव शाळांद्वारे बाेर्डाकडे सादर केला जाताे. नंतरच त्यांना बाेर्डाची मंजूरी मिळते व पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फार्म भरता येताे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक शाळांनी मंडळ मान्यतेसाठी उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. अनेक शाळांचे दाेन-तीन महिन्यापासून दिलेले प्रस्ताव रखडलेले आहेत.

विशेष म्हणजे राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज करण्यासाठी ८ ते ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे, तरच त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल. मात्र पहिल्या बॅचच्या शाळांना मंडळ मान्यता मिळाल नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्जच करता येणार नाही. त्यांच्याकडे आता अर्ज करण्यासाठी केवळ १० दिवस उरले आहेत. या कमी कालावधीत शेकडाे शाळांचे मंडळ मान्यतेचे प्रस्ताव कसे मंजूर हाेतील, हा प्रश्न आहे. अशावेळी ते विद्यार्थी परीक्षेपासून वंचित तर राहणार नाही, ही गंभीर भीती निर्माण झाली आहे.

मनुष्यबळाची कमतरता, कामाचा ताण

एकिकडे शालार्थ घाेटाळ्याने परिस्थिती चिघळली असताना शिक्षण उपसंचालक कार्यालय सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हतबल झालेले दिसते. एकिकडे सध्या शालार्थ प्रकरणातील संशयित शिक्षकांची सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे विभागातील सहाही जिल्ह्यात शाळांच्या अनुदानासंबंधी शिबिरे सुरू आहेत. या दाेन्हीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कर्मचारी लागले आहेत. वरून सहा जिल्ह्यातील शाळांच्या मान्यतेचे, शिक्षकांच्या पेन्शनचे, मेडिकलची कामे लागलीच आहेत. अशात शाळांच्या मंडळ मान्यतेच्या फाईल्स दाेन-तीन महिन्यांपासून येऊन पडल्या आहेत. या दबावामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे.

"कामाचा दबाव असला तरी मंडळ मान्यतेचे प्रस्ताव प्राधान्याने निपटविले जातील. कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान हाेणार नाही, याची काळजी आम्ही घेताेय."- माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर.

 

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणAdmissionप्रवेश प्रक्रियाSchoolशाळा