शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

लसीकरणानंतर मृत्यूचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये ...

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु, दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागातून अधिकृतपणे येणारा मृत्यूचा आकडा ४० पर्यंत पोहोचला असला तरी, घरातच होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागात वाढली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला दोनशे ते अडीचशे लोकांच्या रांगा लागायच्या. आता १५ ते २० लोकही लस घेण्यासाठी येत नाही.

- लस घेतल्यानंतर येतोय ताप

लस घेतल्यानंतर ताप येतो, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाच ते सहा दिवस लोटल्यानंतर ते कोरोना टेस्ट करतात आणि त्यात ते पॉझिटिव्ह निघतात. तोपर्यंत कोरोनाचे इन्फेक्शन वाढून जाते. पुढे उपचारात होत असलेल्या अडचणींमुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटना दररोज ग्रामीण भागात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

- लसीकरणानंतर मृत्यू होतो, ही भीती ग्रामीण भागात आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. असे का होतेय, याचा शोध आरोग्य विभागाने घेतला पाहिजे. किमान लस देण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करवून घेणे गरजेचे आहे. लसीमुळे कोरोनाला अटकाव घालता येतो. त्यामुळे जास्तीतजास्त लसीकरण झालेच पाहिजे. त्यामुळे लसीकरणानंतर मृत्यू होतो, हा भ्रम काढून टाकणे गरजेचे आहे.

व्यंकट कारेमोरे, सदस्य, जि.प.

- लसीकरणाबाबतची भीती लोकांमध्ये आहे. पण, ही भीती दूर करण्यासाठी आरोग्याच्या सुविधाही वाढविणे गरजेचे आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. त्याला ऑपरेट करणारी यंत्रणा नाही. कोरोना केअर सेंटर ग्रामीण भागात वाढविणे गरजेचे आहे. सोबतच आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळसुद्धा वाढविण्याची गरज आहे. पारशिवनी, रामटेक तालुक्यात परिस्थिती भीषण आहे.

गज्जू यादव, महासचिव, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी

- प्रशासन, पदाधिकारी मूकदर्शक

लसीकरणाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात प्रतिसाद अत्यल्प आहे. जिल्ह्याचे प्रशासन आणि राजकीय पदाधिकारीही याबाबत मूकदर्शक आहे. मृत्यूच्या मागची कारणे काय, ते कसे सोडविता येईल, याबाबतही भाष्य करण्यास कुणी तयार नाही.