शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर मृत्यूचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये ...

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु, दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागातून अधिकृतपणे येणारा मृत्यूचा आकडा ४० पर्यंत पोहोचला असला तरी, घरातच होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागात वाढली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला दोनशे ते अडीचशे लोकांच्या रांगा लागायच्या. आता १५ ते २० लोकही लस घेण्यासाठी येत नाही.

- लस घेतल्यानंतर येतोय ताप

लस घेतल्यानंतर ताप येतो, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाच ते सहा दिवस लोटल्यानंतर ते कोरोना टेस्ट करतात आणि त्यात ते पॉझिटिव्ह निघतात. तोपर्यंत कोरोनाचे इन्फेक्शन वाढून जाते. पुढे उपचारात होत असलेल्या अडचणींमुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटना दररोज ग्रामीण भागात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

- लसीकरणानंतर मृत्यू होतो, ही भीती ग्रामीण भागात आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. असे का होतेय, याचा शोध आरोग्य विभागाने घेतला पाहिजे. किमान लस देण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करवून घेणे गरजेचे आहे. लसीमुळे कोरोनाला अटकाव घालता येतो. त्यामुळे जास्तीतजास्त लसीकरण झालेच पाहिजे. त्यामुळे लसीकरणानंतर मृत्यू होतो, हा भ्रम काढून टाकणे गरजेचे आहे.

व्यंकट कारेमोरे, सदस्य, जि.प.

- लसीकरणाबाबतची भीती लोकांमध्ये आहे. पण, ही भीती दूर करण्यासाठी आरोग्याच्या सुविधाही वाढविणे गरजेचे आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. त्याला ऑपरेट करणारी यंत्रणा नाही. कोरोना केअर सेंटर ग्रामीण भागात वाढविणे गरजेचे आहे. सोबतच आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळसुद्धा वाढविण्याची गरज आहे. पारशिवनी, रामटेक तालुक्यात परिस्थिती भीषण आहे.

गज्जू यादव, महासचिव, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी

- प्रशासन, पदाधिकारी मूकदर्शक

लसीकरणाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात प्रतिसाद अत्यल्प आहे. जिल्ह्याचे प्रशासन आणि राजकीय पदाधिकारीही याबाबत मूकदर्शक आहे. मृत्यूच्या मागची कारणे काय, ते कसे सोडविता येईल, याबाबतही भाष्य करण्यास कुणी तयार नाही.